Monday, February 4, 2008

तू फक्त लढ म्हण..

दिलास एक मुद्दा आणि लावलास एक ठोका
परप्रांतियांना झोंबला आणि झाला एकच ठेका
दगड उचलले ,काचा फुटल्या
हाताला काम,पोलिसांचा घाम
थोडी दहशत, थोडा हंगामा
झोबलेल्यांचा झाला,एकच गलका
वाहतूक रखडली,थोडी ठप्प
सगळीकडेच झाले सारे चिडीचूप्प
कधीतरी जागा होणारा वाघ होता
का वाघाचे रूपात आलेला एक भास होता
कांही झाले तरी गडबड मात्र झाली
पहाता पहाता तांरांबळही झाली
मराठी माणूस आता तरी जागा झाला
उप्रत थंडी पण मुंबईत तो लढता झाला
झाले आता ते पुरे झाले
नाही तरी आता होणार काय म्हणाले ?


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com

2 comments:

Anonymous said...

atishay chaan ani preranaadaayi

mahendra phate said...

kavita aavdali. kalche vatavaran tasech hote. kal kothrud madhe anubhavale. tyachi prachiti kavita
vachtana aali