Wednesday, May 21, 2008

नाटक ही गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे-डॉ.लागू

केवळ करमणूक हा नाटकाचा उद्देश नाही. ती एक गंभीर बाब आहे. माणसातल्या सुप्त संवेदनांना जाग आणणारी ही कला आहे. थिल्लरपणे करण्याची ही गोष्ट नाही. कालिदासाने म्हटल्याप्रमाणे शब्द आणि स्वरांनी करायचा तो यज्ञ आहे. आज तेवढ्या गांर्भीयाने या कलेकडे पाहिले जात नाही . अशी विविध मते डॉ. श्रीराम लागू यांनी सकाळ ने प्रकाशित केलेल्या नाट्यरंग आणि स्वरविहार या दोन त्रैमासिकाचे प्रकाशन करताना काढले. आपण आज शारीरीक दृष्टया नाटक करू शकत नसलो तरी नाटक हा आपल्या जिवनाचा आमिभाज्य भाग आसल्याचे सांगत " मी नाटके पहातो. त्याविषयीच्या चर्चा करतो. कलावंताशी-दिग्दर्शकांशी बोलतो रंगभूमीवर काय चालले आहे याची मला जाणीव आहे." असे डॉ. सांगतात.


हे संपूर्ण भाषणच तुम्ही इथे पाहू-ऐकू शकता.

No comments: