Wednesday, July 2, 2008

तीन दिवस कीर्तनाचा गजर

आबासाहेब पटवर्धन स्मृती समितीच्या वतीने होत असलेल्या तीन दिवसांच्या कीर्तन महोत्सवाचे उद्‌घाटन वासुदेवानंद स्वामी महाराज (फुरसुंगी) यांच्या हस्ते मंगळवारी भरत नाट्यमंदिरात झाले. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा. कीर्तन पद्धतीचा वापर व्यवस्थापनशास्त्रात केला, तर विद्यार्थ्यांना अभ्यास लगेच लक्षात राहील, असे मत व्यवस्थापन क्षेत्रातले दीपक आपटे यांनी मांडले. आज शुद्ध मराठी वापरले जात नाही. मराठीचा स्वाभिमान केवळ घोषणांपुरता होता. मराठीची ही अवस्था; तर देव भाषा म्हणजे संस्कृतची काय अवस्था होईल, याची कल्पनाच केलेली बरी, अशी चिंता वासुदेवानंद स्वामी महाराज यांनी व्यक्त केली. तीन दिवस होणाऱ्या या कीर्तन महोत्सवात रोज एक कीर्तन आणि कीर्तनकाराचा सत्कार केला जाणार आहे. पुण्यात देवळा-देवळांत कीर्तनांचा गजर होत असतो. पण आज नाट्यमंदिरात तो होत आहे, हे विशेष.

1 comment:

Anonymous said...

я вот что скажу: отлично... а82ч