Friday, June 6, 2008

तुझा विसर न व्हावा- किर्तन परंपरेचा जागर

बालगंधर्व रंगमंदिरात नाटके होतात, लावण्यांचे कार्यक्रम रंगतात तशी आज बुधवारी रंगली कीर्तनाची जुगलंबंदी. तीही पिता-पुत्रांची.
मिलींदबुवा बडवे आणि श्रेयसबुवा बडवे यांनी कीर्तनाचा आनंद भाविकांनी भरभरून दिला. हाऊसफुल्लचा बोर्डही झळकला.


जुगलबंदीची व्हिडीओ पाहण्यासाठी इथे किलक करा.


योगिराज महाराज दंडवते हे गाणगापूर मठाचे मठाधिपती या कीर्तनाच्या जुगलबंदीच्या दीडशेव्या कार्यक्रमाला आशिर्वाद देण्यासाठी आले होते.
नारदीय परंपरेचे हे कीर्तन बडवे पिता-पुत्रांनी आजच्या काळाचे दाखले देऊन रंजक केले. वयाच्या सातव्या वर्षापासून मिलिंदबुवा बडवे यांनी कीर्तनाची दिक्षा मुलाला दिली. आज मुलासोबत पहिल्यांदाच बालगंधर्वात उभे राहताना झालेला सार्थ अभिमान बोलूनही व्यक्त केला.

Wednesday, June 4, 2008

आला पाऊस पुण्यात "झिम्मड'ही रंगत गेली ....

"शब्दमेघ' या युवा कलावंतांनी पावसाच्या कवितांचा कार्यक्रमही सुदर्शन रंगमंचावर आजच साकारला. "झिम्मड' या पावसाच्या कवितांना नाट्यमय रूपात त्यांनी साकारले.
स्वानंद बर्वे, श्रीकांत भिडे, मुग्धाली जातेगावकर, प्राची मते, अनुजा कोल्हटकर यांनी त्यांना रंगमंचावर सादरीकरण केले. याची संकल्पना,संकलन आणि दिग्दर्शक होते स्वानंद बर्वे .

याचा व्हिडाओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
आला पाऊस पुण्यात

नागरही खुश झाले
ओल्या मातीच्या गंधाने
तृप्त माझे मन झाले
झाले कुंद हवा इथे
झाले आकाशही काळे
निळ्या नभी ग जाहली
काळ्या ढगांचीही दाटी
ऊर भरून गेला आता
मन माझे चिंब झाले
पहिल्या या पावसाने
न्हाली धरणीच सारी

Monday, June 2, 2008

नट हाच नाटकाला संजीवनी देतोः पणशीकर

"मराठी नाटक - नाटककार ः काळ आणि कर्तृत्व' या त्रिखंडात्मक ग्रंथांच्या प्रकाशन समारंभात प्रभाकर पणशीकरांनी हे विधान केले.

या कार्यक्रमाची ही ध्वनिचित्रफित.

पणशीकर म्हणाले, ""नट हाच नाटकाला संजीवनी देत असतो. नाटककाराचे शब्द नट रक्तात मिसळून घेत असतो. नटाचा आपल्या भूमिकेविषयीचा विचार काय आहे, ती भूमिका त्याला कशी सापडली, त्यालाच का मिळाली, या अनुभवांचे लेखन नटाने केले पाहिजे. नाटक म्हणजे शेवटी माणूस वाचणे असते. मानवी संबंध, विचार, विकार यांचे संबंध नाटकांतून प्रकट होत असतात.
मनोगतात डॉ. देशपांडे म्हणाले, सुमारे ४०० नाटके आणि चार हजार प्रयोग पाहून नाटकाचे साहित्य आणि प्रयोग म्हणून मूल्य काय, याची चिकित्सा करण्याचा प्रयत्न या लेखनातून केला आहे.'' माझे हे लेखन म्हणजे नाट्यवाङ्‌मयाचा इतिहास नाही, असेही त्यांनी सांगितले.
""नाटकांकडे केवळ मनोरंजन करणारे म्हणून न पाहता त्याचा साहित्यिक दृष्टिकोनातून अभ्यास झाला पाहिजे. गेल्या काही वर्षांत नाटकांविषयी जे लिहिले जाते त्याला मी "समीक्षा' म्हणणार नाही. नाटकावर नटांनी, दिग्दर्शकांनी लिहिले पाहिजे आणि तसा प्रयत्न मी एक नट म्हणून सुरू केला आहे. देशपांडे यांनी आता अन्य भारतीय भाषांतील नाटकांचाही अभ्यास करून लेखक करावे, अशी अपेक्षा विक्रम गोखले यांनी व्यक्त केली.

कवितेला चित्रपटात साकारणारा - "मनातल्या मनात'

यशवंत चौगुले यांनी तयार केलेल्या "मनातल्या मनात' या चित्रपटात मराठी कवितेंला उत्तम शब्द-चित्रातून साकारले.
हेमांगी कवीने गिरीश ओक यांच्यासोबत केलेली भूमिका हाही या चित्रपटाचा जमेचा भाग.


निर्माता आणि हेमांगी कवी यांच्याशी केलेला हा संवाद.

हा चित्रपट शुक्रवारी पुण्यात प्रदर्शित झाला.

वाहतुकीला शिस्त लावायला उतरले छोटे रक्षक

सकाळी साडेनऊची वेळ. आठ ते बारा वर्षांची मुले सिग्नल असूनही न थांबणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी गेले पंधरा दिवस प्रयत्न करत आहेत. सिंहगड रस्त्यावरच्या बिग बझार चौकात हे दृश्‍य सकाळी आठ ते साडेदहा आणि संध्याकाळी सहा ते आठ या वेळांत दिसते.

याची व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

पुण्यात अनेक ठिकाणी सिग्नल सुरू असतात. पण पोलिसमामा नसल्याने ते सर्रास तोडले जातात. आदित्य नाकोडा, सरिता नगरी, सरिता वैभव या परिसरातल्या काही ज्येष्ठांनी वाहतुकीला शिस्त लावायला सुरवात केली. पुढे काकांना मदत म्हणून लहान मुले, काही दादा पुढे आले.
गेल्या महिनाभरापासून सकाळ-संध्याकाळ सिग्नल पाळण्याचे आवाहन हे वाहतूक रक्षक करीत आहेत. जे नियम तोडतात त्यांच्या गाडीचे क्रमांक घेतले जातात. ते वाहतूक शाखेला दिले जाणार आहेत. त्यांच्यावर रीतसर कारवाई व्हावी अशी, अपेक्षा आहे. या चौकात आठवड्यातून तीन दिवस तरी वाहतूक पोलिस असावा, अशी या परिसरातल्या नागरिकांची अपेक्षा आहे.
स्वयंस्फूर्तीने वाहतुकीला शिस्त लावण्याचा हा उपक्रम वाहनचालकांनी "सिग्नल' पाहून तरी थांबावे असा संदेश देतो. बरेच जण या मुलांच्या शिट्ट्यांना चांगला प्रतिसाद देऊन थांबतात. मात्र काही न जुमानता सटकतात. या चौकात जरी वाहनचालकांनी सिग्नल पाळले तरी आमचा हा वेळ सार्थकी लागेल, असेच या मुलांना वाटते. अशा चौका-चौकांत उभारलेल्या सिग्नलचा मान राखून वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळतील, अशी आशा आहे.
वाहनांची संख्या आणि वाहतूक पोलिसांचे बळ हे प्रमाण व्यस्त आहे. सिंहगड रस्त्यावर दहा सिग्नल आहेत आणि वाहतूक पोलिस आहेत अवघे चार. आपापल्या परिसरातल्या चौकात स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांनी जर असा उपक्रम हाती घेतला, तर नक्कीच वाहतुकीला शिस्त लागेल. वेगावर नियंत्रण येईल आणि अपघात कमी होतील.