Saturday, June 28, 2008

बालगंधर्व रंगमंदिराची चाळिशी!

पुणे शहराची ओळख सांगणाऱ्या नावातले एक नाव म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर. चाळीस वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या रंगमंदिरात नांदी झाली आणि पुण्याच्या वैभवात एक नाव सामावले गेले.
रंगमंदिराच्या वैभवाला साजेसा सोहळा २५ आणि २६ जूनला साजरा झाला.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे किलक करा.


सोहळ्यानिमित्ताने पुण्यातले सारे कलावंत आणि नाट्य आणि संगीत कार्यक्रम सादर करणारे कलावंत एकत्र आले. एकाच वेळी ही किमया घडू शकली, त्याचे कारण बालगंधर्व रंगमंदिरावरचे सर्वांचे प्रेम. बालगंधर्वच्या तारखा मिळण्यासाठी नेहमीच चढाओढ असते. कारण कलावंतांना येथे कला सादर करताना आनंद होतो, रसिकांना येथे यावेसे वाटते, असा हा दुहेरी आनंददायी प्रवास.
दोन दिवस वालगंधर्वांच्या नावाचा उदो उदो झाला. बालगंधर्वांच्या वैभवाची अणि त्या काळच्या संगीत नाटकांची परंपरा पुन्हा सांगितली गेली.

बालगंधर्वांच्या नावाने पुणे महापालिकेने दिलेला पुरस्कार शरद गोखले यांना शानदार सोहळ्यात दिला गेला.
प्रदर्शन, रक्तदान आणि संगीत कार्यक्रमांनी चाळिशीचा सोहळा रसिकांनी अनुभवला. महापालिकेने रंगमंच मोफत उपलब्ध करून दिला. निर्माता आणि व्यवस्थापक संघाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला.
लावणी, ऑकेस्ट्रा, संगीत नाटक यातून रसिकांना आनंद दिला गेला. रसिकांची दादही तितकीच मिळाली.
पुरस्कार सोहळ्याच्या अगोदर बालगंधर्वतून निघालेल्या मिरवणुकीला विशेष महत्त्व होते. यात सारथ्य केले ते बाबासाहेब पुरंदरे, नाट्यसंमेलनाध्यक्ष रमेश देव, चित्तरंजन कोल्हटकर आणि लीला गांधी यांनी.


संस्थेच्या इमारतीचा आणि त्यातही पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचे वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा सोहळा पाहून रसिकांनाही धन्यता वाटली.

Friday, June 27, 2008

मराठी संगीत नाटक टिकण्यसाठी "हे' आवश्‍यक

बालगंधर्वांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा संगीत नाटक करणाऱ्या संस्थांनाही मिळावा, अशी इच्छा ज्येष्ठ गायक रामदास कामत यांनी बोलून दाखविली. २६ जूनला हा पुरस्कार मराठी संगीत नाटकात भूमुका करणाऱ्या शरद गोखले यांना देण्यात आला.

कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

संगीत नाटकाला पुन्हा चांगले दिवस यावेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज सर्वांनीच व्यक्त केली.

बालगंधर्व रंगमंदिराचा चाळिसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बालगंधर्व रंगमदीर नटले, सजले आणि रंगले देखील.

Thursday, June 26, 2008

.....त्यांचा अन्याय रंगभूमिवर मांडलाय !

सांगलीतल्या वेश्‍यांनी आणि त्यांच्या मुलांनी एकत्रीतपणे त्यांच्यावरच्या अन्यायाची कहाणी रंगभूमीवर सादर केलीय.

वेश्‍या अन्याय, मुक्ती परिषद ,पॉंईंट ऑफ व्ह्यू आणि संग्राम या संस्थेने त्याची निर्मिती केली आहे.

"माय मदर ,द घरवाली- हर मालक , हिज वाईफ' नाटकाच्या नावातच अर्थ भरलाय.

विशाखा दत्त, मीना शेसू यांच्या मदतीने दिव्या भाटीया यांनी हिंदीत नाटकाची संहिता लिहली.

दिग्दर्शिका आहेत सुषमा देशपांडे.

वेश्‍यांनी त्यांचा अन्याय रंगभूमिवर मांडलाय ! (भाग दोन )

वेश्‍यांनी त्यांचा अन्याय रंगभूमिवर मांडलाय !

वेश्‍यांनी आणि त्यांच्या मुलांनी एकत्रीतपणे त्यांच्यावरच्या अन्यायाची कहाणी रंगभूमीवर सादर केलीय.
वेश्‍या अन्याय, मुक्ती परिषद ,पॉंईंट ऑफ व्ह्यू आणि संग्राम या संस्थेने त्याची निर्मिती केली आहे.
"माय मदर ,द घरवाली- हर मालक , हिज वाईफ' नाटकाच्या नावातच अर्थ भरलाय. विशाखा दत्त, मीना शेसू यांच्या मदतीने दिव्या भाटीया यांनी हिंदीत नाटकाची संहिता लिहली.
दिग्दर्शिका आहेत सुषमा देशपांडे.
आम्हाला आमचे जगणे तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटतं म्हणून हे नाटक केलयं,
असं त्यांच्या जाहिरातीत सांगीतलं जातं.
त्यांचा अन्याय रंगभूमिवर मांडलाय ! (भाग एक )

Monday, June 23, 2008

सबसे बडा रूपैय्या - नाबाद २५०

विजय पटवर्धन "सबकुछ' असलेल्या "सबसे बडा रूपैय्या' या नाटकाचा २५०वा प्रयोग पुण्यात झाला.

लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिकेंत तेच आहेत.

शेखर लोहकरे - पराग बर्वे यांची ही निर्मिती.

खळखळून हसविणारे हे नाटक प्रेक्षकही तेवढेच एन्जॉय करतात.

नाटकातला काही भाग पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा...