Tuesday, January 6, 2009

तरूणांच्या संवेदना कळत नाहीत

तरूण पिढीच्या संवेदना कळायला जरा अवघड जाते. त्यांच्या भावना सांगण्याची पध्दतही वेगळी आहे. एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच असते. ती मिळविल्याशिवाय ते शांत होत नाहीत.
मागणी करताना आजूबाजुच्या परिस्थितीचा विचार केला जात नसावा. यामुळे हाते काय?
ते मागत नाहीत तर आग्रह धरतात. ते विचारत नसतात. थेट सांगतात.

पालक म्हणून पाहिले तर, आपल्या काळात काय होते, कसे होते, ते सांगण्याची सोयच ऊरली नाही. पालकांचे उत्पन्न त्यांना माहित असते. त्यामुळे पालक मागेल ते देणार ही मुलांना खात्रीच असते.

यातुन निर्माण होतो. वाद. इथे संवादाला फार वाव उरत नाही.तो कदाचित एका बाजूनेही होऊ शकतो. कारण जे सांगू ते ऐकायची मनस्थिती त्यांची असेलच असे सांगता येत नाही.

एकूणच पूर्वी असलेला पिढीचा फरक काळ बदलला तरी तसाच पुढे सुरू आहे.
फरक इतकाच पात्रे बदलली. भुमिका बदलेले. संदर्भ बदलला.

काय हे तुम्हालाही पटतय ना?

सुभाष इनामदार, पुणे

No comments: