Sunday, August 30, 2009

यंदा किती छान वाटतय!


संकट आले स्वाइन

फ्लूचेरस्ते दिसू लागले

ओसजाईल त्याच्या तोंडी एकच

आषययंदा किती छान वाटतय!

स्वाइन फ्लूच्या संसर्गजन्य रोगाने पुण्याने पछाडले ते नेमके पुणेकरांच्या उत्साही सणात. ज्या सणासाठी काही मंडळी वर्षभर आखणी करतात. कांहीची उदरनिर्वाह या गणपती उत्सवाच्या काळातून बाहेत पडतो. आणि ज्या उत्सवाची मुहूर्तमेढ याच पुण्यात रोवली लोकमान्य टिळकांनी.तो गणेशोत्सव यंदा गर्दीविना. देखाव्यांशिवाय पहायला लागतोय याची खंत मलाही जाणवते आहे. पण काळानेच तुम्हाला रोखले आहे.


'गर्दीवर आवर घाला ,उत्साहाला काबूत ठेवा' हे सांगून.

पुणेकरांनी हे पाळल्याचे चित्र गेले काही दिवस दिसते आहे. अर्थात यालाही शनिवार-रविवारचा आहेच.मात्र एकंदरीत साथीच्या या रोगाचे संकट मनावर घेउन त्याबरहुकूम कारवाईही केली. देखावे रद्द केले. ते पैसे सामाजिक संस्थांकडे वर्ग केले. स्वाईन फ्लूशी मात करणाऱ्या नायडूतल्या कर्मचाऱ्यांची धान्यतूला केली. काहींनी न बोलता मनाप्रमाणे या सामाजिक सेवेत स्वतःचे दान समर्पण करून एक आदर्श समाजसमाजसेवेचा पायंडा घालून दिला.खरा पुणेकर उत्सवप्रिय. पण गेल्याकाही वर्षात बदलत्या गणेशोत्सवाबद्दल तो नाराज आहे. उत्साहालाहा आणि त्या ध्वनीलाही मर्यादा हवी.

भावीकता नष्ट होऊ लागल्याची जाणीव त्याला होत होती. म्हणूनच स्वाइन फ्लूच्या विषयामुळे तरी उत्सवात दिसू लागलेला साधेपणा त्याला आनंद देत आहे. गोंगाट कमी झालाय. रात्री दाटीवाटीने फिरणारा भाविक फारसा एका ठिकाणी थांबत नाहीये. तो गणपतींच्या मूर्तीचे दर्शन घेउन तृत्प होतोय.समाजातल्या विविध घटकांनी एकत्र येण्याच्या संकल्पनेतून सुरू झालेला गणेशोत्सव खरा असाच साजरा व्हावा हे पटलय. आणि आवडेलेही आहे.दर वर्षी पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक गौरी विसर्जनानंतर पुण्याकडे मार्गस्थ होतात.

यंदा मात्र, स्वाइन फ्लूचा प्रसार थांबविण्यासाठी पुण्यातील बहुतेक सार्वजनिक मंडळांनी देखावे न करता साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविल्याने पुण्यात येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे."उत्सव हवा, पण गर्दी नको,' ही "सकाळ'ने घेतलेली भूमिका मान्य करीत अनेक मंडळांनी यंदा देखावे सादर न करता साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. अनेक मंडळांनी त्यांचे मंडप काढून टाकले, तर अनेकांनी देखावा उभारण्याचे कंत्राट रद्द केले. काही मंडळांना काही लाख रुपयांचा फटका बसला. कलावंतांवर गदा आली. मात्र तो सामोरे झालाय नवी आव्हाने पेलायला. भाविकतेत साजरा होणारा गणेशोत्सव पाहून असा उत्सव दरवर्षी व्हावा अशीच तो प्रार्थना करेल. (अर्थात स्वाइन फ्लूचे संकट पुन्हा यायला नकोय)

तुम्हाला या विचाराविषयी कांही मत व्यक्त करायचे असल्यास जरूर करा. स्वागतच आहे.

-सुभाष इनामदार,पुणे.

e-mail: subhashinamdar@gmaol.com