Friday, December 31, 2010

साहित्य संमेलनाने काय कमावले


ठाण्यात तीन दिवसांचा अखिल भारतीय म्हणावणारा साहित्य संमेलनाचा उरूस पार पडला. नाताळाच्या सुट्टीतच ..२५ ते २७ डिसेंबर.. तारखा आल्याने अपेक्षित अशी गर्दी लाभली नाही. नाही म्हणायला. ग्रंथदालनांची संख्या आणि त्यातील विविधता अधिक ठळकपणे नजरेत भरत गेली.

दादोजी कोंडदेव यांच्या नावाने पुण्यात जो गोंधळ उडवला त्याच नावाच्या क्रीडासंकुलात ठाण्यात हा उत्सव पार पडला. ... मात्र शेकडो पोलिसांच्या साक्षीने.

आरंभी पासून गाजत चाललेल्या या संमेलनात मराठीची काळजी करणारे परिसंवाद चर्चिले गेले. मराठी भाषकांसाठी नवीन तंत्रज्ञानात काय आहे...यावरही भर दिला गेला. साहित्याला नाट्यमंदीराची जोड मिळाली. गडकरी रंगायतनमध्ये चित्रपट समीक्षा, आणि मराठी चित्रपटांची संख्या वाढली पण दर्जाचे काय़ ? सारखे परिसंवाद झाले.. (ज्याची कधीही इतर साहित्य संमेनात दखलही घेतली गेली नव्हती) महाराष्ट्राच्या सर्वागीण ऐक्याची चर्चा रंगली. तर दुसरीकडे जागतीकीकरण, ग्रामीण समाज आणि मराठी भाषा यावर चर्चा तर दुसरीकडे मराठी भाषेच्या अधोगतीवर अभिरूप न्यायावयात खटला...असे परस्पर विरोधीही कार्यक्रम झाले. ठाणे शहराचा सांस्कृतिक इतिहास दृकश्राव्य माध्यमातून दाखविला गेला. वाचन संस्कृती आणि ग्रंथालयांची स्थिती याविषचीही चर्चा झडली. कधी नव्हे तो महत्वाच्या म्हणजे प्राईम टाईममध्ये कवींचा दरबार मुख्य मंडपात रंगला. लोकसाहित्याची दखल घेतली गेली. आदिवासींच्या साहित्याचेही गोडवे बोलले गेले.

हे सारे झाले.. संपले....पण यातून मराठी भाषेला काय मिळाले....भाषा विस्तारण्यास य़ाचा किती उपयोग झाला...
वाचक वाढला की गंभीरपणे मराठी भाषेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मत मांडले... समारोप समारंभात बृहनमहाराष्ट्रातल्य़ा मराठी भाषीकांसाठी काम करणा-या संस्थाना महाराष्ट्र सरकारने आर्थिक हातभार लावण्याची मागणी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांवी केली... याशिवाय अनेक ठराव त्याच चाकोरीबद्ध पध्दतीने मांडले गेले..सूचक अनुमोदक..जाहिर केले गेले...
पण समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचा साधी दखलही घेतली नाही..आपण लिहून आणलेले भाषण वाचले...ना कोणतेही ठोस अश्वासन..ना कोणती नेमकी भूमिका...केवळ सांस्कृतीह दहतवादाचा उल्लेख केला गेला...

संमेलनात उपस्थित राहिलेल्या वाचकांनी वा रसिकांनी काय आठवणीत घेऊन जायचे..



ते तीन दिवसांत शुध्दलेखनाच्या चुकांचे प्रवेशद्वारावरील चित्र ( जिथे भारतीय...नव्हेच भरतीय शेवटपर्यत होते) की मराठी पुस्तकांच्या यादीतले ना.सी.फडके यांच्या ऐवजी लिहलेले न. सी फडकेयांचे अशुध्द नाव?
खेबुडकरांची मुलाखत की कवी अशोक बागवे यांची काव्यातली तडफ.

बरे, पुस्तकांच्या दालनात न ओळखला येणारा रस्ता की जो तुम्हाला कुठेही, कुठल्याही स्टॉलवर घेउन जाणरा.. ना कसले क्रमांक की ना नाही नेमकी व्यवस्था. प्रत्येक स्टॉलचे भाडे प्रत्येक गाळ्याला रुपये पाच हजार फक्त. काय ठाऊक काहीच्या स्टॉलचे भाडे तरी निघाले का नाही? नाही म्हणायला प्रकाशन समारंभासाठी व्यासपीठाची निर्मिती संकल्पना उत्तम..पण तीही संयोजकांना राबवीता आली नाही...भकास... निष्क्रिय....

वाचकांनी मात्र या सर्वाच आनंद घेतला तो या ग्रंथ दालनात. मनसोक्त भटकून... क्वचित काही सीडी.. मराठी तंत्रांच्या स्टॉलला भेट देउन.

मोठ्या अशा प्रांगणात भली मोठी दालने... खूर्च्यीही रिकाम्याच.. वेळेवर न सुरू झालेले कार्यक्रम.. न उपस्थित राहिलेले मान्यवर... आणि फारच थोड्या साहित्यिकांचा सहवास.
खरेच आशा मोठ्या पण उत्सवी संमेलनाच्या ऐवजी छोटेखानी पण विषयाला त्या समस्येंची सोडवणूक करणा-या साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल हवी.. गर्दीचा नव्हे तर विषयात रस घेणारा श्रोता हवा. प्रसंगी विकत घेऊन वाचणारा आणि मराठीवर खरेच भाषा म्हणून प्रेम करणारा वाचक हवा.

आता कोटींच्या घरात खर्च करणारी ही संमेलने हवीत काय़.....काय म्हणाल....


सुभाष इनामदार,पुणे
www.subhashinamdar.blogspot.com
subhashinamdar@gmail.com
mob- 9552596276

Wednesday, December 15, 2010

पुणेरी `गोडबोल्याची` एकसष्टी


जन्मजात पुणेरी बाणा अंगात आणि स्वभावात रूजविणारा तमाम मराठी रसिकांच्या समोर असणारे नाव म्हणजे सुधीर गाडगीळ. आम्ही काही जण त्यांला गोडबोलेही म्हणतो.सदाशिवपेठी पुणेरी भाषा सुधीर गाडगीळ यांच्या नसानसातून फिरत असल्याने त्यांच्या सा-या मुलाखत तंत्रात पुणेरी स्पष्टपणा डोकोवणे सहाजिकच नाही काय ?

पंचवीशीपर्यत मुंकुंदराव किर्लोस्करांच्या साप्ताहिक मनोहरात पत्रकारितेची उमेदीची वर्षे सुधीर गाडगीळांनी घालविली...नाही त्यामुळेच ते घडले.. दिसले आणि सर्वत्र संचारु लागले. कॉलेजमधल्या नायकासारखे उमदे रुप. झकपकीत पोषाखी ऐट. दिमाखदार बोलणे आणि सतत रूपेरी पडद्याच्या जवळ जाणा-या या तरूणाला साप्तकाहिकाच्या रुपाने संपर्कमाध्यमच साध्य झाले. अनेक मुलाखती शब्दात उमटू लागल्या. त्यांची वाहवा मिळाली. खरे तर हीच संधी पुढे रंगमंचीय स्थिर झाली ती स्वरानंद या संस्थेच्या मंतरलेल्या चैत्रबनात या गदिमा गीतांच्या कार्यक्रमातील निवेदॉकाच्या भूमिकेत. सुधीर मोघेंनंतर सुधीर गाडगीळ या निवेदकाच्या भूमिकेत रुजले आणि सजलेही. या निमित्ताने महाराष्ट्राला एक सूज्ञ . पुणेरी भाषेचा. सुसंस्कृत मुलाखतकार मिळाला.

रंगमंचावरचे निवेदन भावेनेच्या भरात श्रोत्यांच्या घरा-घरापर्य़ंत जाउन पोचले. अस्सल मराठी सुसंस्कृत किस्से आणि विनोदाचा बाज घेऊन `सुधीर गाडगीळ` नावाला वयल येत गेले. रंगमंचावर गदिमा, बाबुजी यांच्याशी गप्पांचा फड मारता मारता दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर गाडगीळांची वाणी प्रकट होउ लागली. आशा भोसले आमि सुधीर फडके यांच्या मुलाखतीच्या रूपातून गाडगीळ मराठी माणसांच्या जवळचे झाले.

विषयाचा अभ्य़ास आणि तात्काळ व्यक्त होण्याची हातोटी साधल्याने त्यांचे ते प्रश्न कलावंतांमधली प्रतीमा अधीक उजळ करायला मदतच झाली. पण पुढे गाडगीळ काय चिमटे काढतील याचा नेम नसल्याने कलावंतही सावध होत. भाषेतला मवाळपणा आणि शब्दातले बोचरे वळण यातून मुलाखत रंगत जायची. मुलाखत घेणारा आमि रसिक यातले अंतर कमी होण्यास यामुळे मदतच झाली.पुढे कार्यक्रमा वाढले. वाहिन्यात वाढ झाली. तरी गाडगीळ तेच राहिले. साधे आणि तेवढेच खोचक पुणेरी बोलणारे.
नोकरी केव्हाच सोडून दिलेली. निवेदक आमि मुलाखतकाराची झूल अंगावर घेतली आणि हा शब्दभ्रमाचा खेळाडू महाराष्ट्रातच काय जगभरातल्या मराठी माणसांच्या जवळ गेला. उड्डाण झाले. परदेश पाहिला. मनमुराद आनंद घेतला. त्यांनाही तो दिला. दिवाळी पहाट म्हणू नका, समारंभातले साधे सोपे वाटणारे निवेदन म्हणी नका जिथे-तिथे त्यांचीच मोनॉपॉली झाली. त्यांच्या वाणीने जग जिंकले म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणूनच सुधीर गाडगीळ एक सांस्कृतिक संस्थान ठरले. अनेक संदर्भ. अनेक इतिहास आणि अनेक माणसे त्यांच्याशी जोडली गेली आहेत.

तसा हा गप्पीष्ट माणूस. पण संसारात वहिनिंच्या आजाराने खचलेला आणि आता एकला चालो रे च्या धोपट मार्गावर वाटचाल सुरू आहे. कलावंत मित्र झाले. संस्था मिळाल्या. राजकीय नेत्यांच्या जवळीक लाभली. पण कधी हाततल्या लेखणीची आणि वाणीचा कधीही दूरोपयोग केला नाही. सात्वीकता आणि प्रेमळता आजही एकसष्टीच्या उंबठ्यावर झिरपत आहे.

घराला घरपण आलेय. मुलांनी पंख मोठे केलेत. नातवांनी घरात पसारा केलाय. भिंती रंगवल्यात. पण हा आजोबा झालेला सुधीर आजही तेवढाच हसतमुख आहे. चेह-यावरची तुकतुकी कमी झालीय. थोड्या अस्पष्ट रेषाही उमटायला लागल्यात. पण मन तरूण आङे.
शब्दात बळ आहे. ताकद आहे. आमच्या सर्वाचा हा मित्र असाच आनंदी रहावा. त्याला हसतमुखच पहात रहावे. त्यांच्या इच्छांना नवे बळ मिळावे..... असाच धीराचा चेहरा इतरांनाही आधार वाटावा.

काल ती व्याक्ती होती...आज ती संस्था बनली......... त्याच्या कर्तृत्वाला सलाम....आनंद देत आणि घेत रहा.........

तुझाच मित्र म्ङणवून घेणारा
सुभाष इनामदार,पुणेsubhashinamdar@gmal.com
www.subhashinamdar.blogspot.com
Mob. 9552596276

Monday, December 6, 2010

पंचवीशीची पाने


पंचवीशीची पाने

संसाराची पाने उलगडताना
पंचवीशीची आठवण करताना
भानावर आलो
मागे पहात गेलो....

साथीचा हात दिलास
दिलासाही दिलास
सारे अनुभवले
थोडा स्थिरावलो....

उलगडली पाने, विरली
जाळीदार बनली
प्रत्येक झरोक्यातून
आठवणींच्या नजरेतून.....

वेलीवर उमटली दोन फुले
पेमाचा ओलावा, भरली मने
सुखाच्या क्षणांनी
भारावल्या मनांनी...

स्वप्न अशी फार नव्हतीच
तिही साकार झाली
दुखाःचा आभास
सुखाचा सहवास.....

आठवतात ते दिवस
कुशीत असतानाचे
ओलाव्याचे
आनंदाचे.....

स्वप्ने नव्हतीच, तो भास होता
जाणीवेचा स्पर्श होता
एका भावभावनांचा
तो प्रतिसाद होता.....

स्थैर्य आले की ठाउक नसे
वागलो वेडावलो
खरेही असे...

सावलीत हरवताना माझीच बनलीस
घरे बदलताना स्वामीनी ठरलीस
भिंती भारवल्या
मोहरून गेल्या
बोबडे बोल, वाचू लागले
घेउ लागले बळ
त्यांच्या पंखात
वा-याच्या वेगात.....

चूकलो असेल, नाही चूकलोच आहे
तरीही तुझ्याच स्पर्शाने गहिवरलो आहे
त्या क्षणांना वेचताना
आज मात्र भारावलो आहे....

पंचवीशीत प्रवेशताना भान जागेच आहे
आजही मोहरताना जागाच आहे
भास होतानाही
जागाच आहे......

जरा विश्वास ठेव, सावध आहे
दुःखाला दूर सारुन सुखावणार आहे
भावनेतही भान आहे
जाणावाही जागृत आहेत

प्रवास असाच सुरू राहणार
अज्ञाताकडे वाट सरकत जाणार
सुरात सूर मिसळून एकसूर झालाय
संसार वेलीवरचा तराणा बनलाय

सुभाष इनामदार, पुणेsubhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
Mob_ 9552596276

Tuesday, November 30, 2010

करियर घडविणारा निषाद हरपला



वय अवघे ३६. प्रकाशनाच्या व्यवसायात सहा-सात वर्षे काम. दिल्लीत बुक फेअरचे काम करून विमानाने मुंबईत दाखल. पॉईंट-टू-पॉईंट पोचविणा-या प्रवासी कंपनीमार्फत नाशिककडे जाताना नेमका निषाद देशमुखचा अपघाती मृत्यू व्हावा. याला काय म्हणावे. नियती. काळ की नशीब.

गौतमी प्रकाशनातर्फे मराठी साहित्यातील पुस्तके केली. आणि तरूणांचे भवितव्य घडवायचे. त्यांना नव्या वाटा शोधायली मदत करायची म्हणून करीयर संधी सांगण्य़ासाठी करीयर पब्लीकेशनची पुस्तके काढायला घेतली. ज्यातून तरूणांचा उद्या चांगला उजडेल. काही मराठीत तर कांही इंग्रजी भाषेतली पुस्तके तयार केली. त्यासाठी लेखकाची व्याख्याने योजली. त्याला प्रतिसादही उत्तम होता. आत्ता कुठे स्वतःची ओळख पटविली जात होती.

एक मराठी प्रकाशक तंत्राच्या सीमांची पिरसिमा ओलांडत नव्याने नवी क्षितीजे धुंडाळत होता. वेगळेपण जपत प्रकाशनाचा पाया मजबूत करीत होता. पण हेच दुदैर्व ठरले. काळाने घात केला. जीवनातले यश पचविण्याच्या आतच अपघाती मृत्यू नियतीने लिहला होता.

चेह-यावर सतत स्मीत. नवीन करण्याची सतत चर्चा. एकेका पुस्तकासाठी दीडशेवर कंपन्यातील एच आरशी नाते जोडण्याची धडपड. आपला वाचक कोण. त्याला काय हवेय. काय द्यायला पाहिजे याची अचूक नाडीपरीक्षा. म्हणूनच करियर पब्लिकेशनचा आठवड्यापूर्वीचा प्रकाशन समारंभही त्याच भव्यतेत. त्यातही लेखक आणि वक्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे पॉवर पॉईटसह व्याख्यान. पुस्तकाचा लेखक स्वतः उत्तम बोलतो म्हटल्यावर आणखी काय हवे.

हे एक उदाहरण... असे कित्येक कार्यक्रम पुस्तकांच्या निमित्ताने केले गेले. तेही लक्षात रहातात. मराठी भाषेवर प्रेम करताना मराठी साहित्यात कांही नवे यावे यासाठी वेगळेपण जपून त्यांनी यत्न केला. भारती ठाकूर यांच्या न्रमदा परिक्रमाः एक अंतर्यात्रा- ह्या पुस्तकाने बेस्टसेलरचा मान मिळविला. गौतमी प्रकाशनाची नवीन पुस्तकांची भूक वाचकांना जागृत करणारी ठरली. मराठी बरोबरच इंग्रजी पुस्तकांचे दालन त्यांनी वाचकांसाठी खुले केले. विविधता आणि संस्कृतीशी नाते हे दोन मह्त्वपूर्ण विशेष त्यांच्या पुस्तकातून सतत दिसत होते. त्यांची जाण विलक्षण होती. कामात तप्तरता आणि नेमके वाचकांपर्यत पोचण्याचा आग्रह होता. तोच त्याचा विशेषही.

असा दूरदृष्टी असलेला. बाजारपेठेचा अभ्यास करून चाणाक्षपणे प्रकाशन व्यवसायात स्वःतची छाप टाकणारा. तरूणाचे डोळे अदिक व्यापकतेकडे नेणारा ई-मेल, फेसबूक आणि सा-या नवतंत्रांचा वापर करत प्रकाशन व्यवसायात आपले प्रभूत्व निर्माण करणारा निषाद देशमुख अवकाळी हरपला.

त्याच्या निधानाने प्रकाशक संघाचा आधार निसटला. सर्वाची साथ घेत मराठी पुस्तकांच्या दुनियेत आपली प्रतिमा निर्माण करणारा व्यवसायिक काळाच्या पडद्याआड गेला. वाईट झाले.

नियतीने फास टाकला. कायमचे व्यक्तित्व नष्ट झाले. आता केवळ आठवणी. ..त्याही जपूयात.

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
Mob. 09552596276

Tuesday, November 23, 2010

पिंडाला शिवा रे...Response from Vachk


आजीच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून मुलांसह सगळी मंडळी तिष्ठत होती. वेळ जात होता; पण कावळे फिरकायला तयार नव्हते. आजच्या आधुनिक युगातही या सगळ्याची खरंच गरज आहे का?

----------------------------------------------------

http://www.esakal.com/esakal/20101120/4671308256829600476.htm

---------------------------------------------------


प्रतिक्रिया
On 23/11/2010 02:04 PM ahuja said:
मला वाटते रजनीकांतला जर आळवले असते तर काम ताबडतोब झाले असते
On 23/11/2010 01:34 PM Raju Bhangi said:
छान लेख आहे...त्यांनी फक्त त्यांच्या भावना मोकळ्या केल्या आहेत...धर्म विषयी काही वावगे लिहिलेले नाही, त्यमुळे लोक्कानी प्रतिकिया देत्ताना काव काव करू नये...वाचायला चांगल्या वाटतील असेच काही लिहावे
On 23/11/2010 10:55 AM vivek deshmukh said:
सर्वांनी लेख नीट वाचला काय? नुसते कावळ्यासारखे काव काव करताय!!! आपण निसर्गाला काहीतरी देण लागतोय एवढाच त्याचा अर्थ आहे!!! आणि श्रद्धेच बोलायचं तर श्रद्धेशिवाय जीवनाला अर्थ नाही
On 23/11/2010 02:27 AM Mayuri said:
Atleast hyach bahanyane kutumbatali dure manase javal yetat ani melelya vyaktichi tyane kelelya changlya karmachi athavan kadhatat he kay kami ahe. manus mela tari aaplya aathavanit to jivanta rahato tar mag kharya aso va khotya prathat palalya tar konacha kahi bighadat nahi. Ani kadachit jya tya diwasanmadhe jyataya vastula khadya padarthanna pranyanna pakshyanna mahatva denari aapali sanskruti, hya diwashi kawlyala mahatva dila tyat kay wawga aahe. Its ok I think.
On 23/11/2010 12:44 AM rajan bhambure Amerika said:
पिंडाला कावला शिवला म्हणजे, या इहलोकी मृतात्माच्या काहीही इच्छा अतृप्त नाही असे समजतात.त्याचा सर्व इच्छा, जबाबदार्या पूर्ण झाल्या आहेत असे समजतात. असे मला वाटते.ह्याबाबत धर्मशास्त्रात जर काही शास्त्र-आधार असेल,तर धर्म निपुण जाणकारांनी जरूर ह्याबाबत,विवेचन करावे,लेख लिहावेत.आम्ही जरूर त्यांचा आदर करू.
On 22/11/2010 03:50 PM radhika modak said:
मी एक प्रसंग सांगू शकते, माझे आजोबा (आईचे वडील), जेव्हा वारले तेव्हा असाच कावळा शिवत नव्हता, कित्येक गोष्टी करून पहिल्या, पण कावळा झाडावर बसून होता तो खाली काही येईना, तेव्हा एक वर्ष पूर्वीच माझ्या मोठ्या मामाची बायको वारली होती, आणि त्याची मुले लहान होती, त्याचे आम्ही परत लग्न लावून देऊ आणि त्याच्या मुलांची पण काळजी घेऊ असे धाकट्या मामाने सांगितले, तेव्हा लगेच कावळा शिवला, आणि मोठ्या मामाचे लग्न झाले तेव्हा आजोबा धाकट्या मामाच्या स्वप्नात आले होते. म्हणूनच हा ज्याचा त्याचा विश्वास आहे.
On 22/11/2010 09:13 AM sanju said:
पिंडाला कावळा शिवला कि मृतात्म्याची इच्छा पूर्ण झाली असे समजतात, पण त्यांच्या जीवन्तापानीच त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या त्यांच्याशी नित वागावे, पिंडाला कावळा शिवला नाही तर दुखी होण्याचे कारण नाही,
On 22/11/2010 08:53 AM Aniket said:
मि. इनामदार, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नाहीत असे दिसते. डॉक्टरने औषध दिले तर लगेच घेत असाल मग गुण येओ अथवा न येवो. ही झाली श्रद्धा व पिंडाची प्रथा म्हणजे अंधश्रद्धा असा तुमचा सोयीस्कर विचार वाटतो. हिंदू शास्त्र पद्धती ही modern science पेक्षा खूपच advance आहे तरी असे काही पुन्हा लिहू नका. तुमचा बाबतीत "विमुडा नानी पस्चान्ति पास्चान्ती न्यानी चक्षुषा" असे आहे.
On 22/11/2010 04:13 AM shardul said:
अहो इतर कितीही गोष्टीनी आपणास त्रास झाला तर चालतो पण धर्मात सांगितलेल्या गोष्टीने थोडावेळ उपाशी राहण्याचा त्रास आपण सहन करू शकत नाही. कसे काय हिंदू म्हणून टिकून राहू? ख्रिस्ती लोक धर्मप्रचारासाठी जंगलात जाऊन राहतात, मुस्लीम जिहाद करतात आणि आपण नुसते थोडावेळ उपाशी राहू शकत नाही. पाळली हि प्रथा तर कुणाच्या बापाचे बिघडले? आणि एवढे वाईट वाटत असेल तर मुस्लिमांना जिहाद वेगेरेचा फोलपना समजून या.
On 22/11/2010 02:40 AM Shashikant Inamdar said:
ज्या गोष्टीबद्दल आपणाला पूर्ण माहिती नाही त्याबद्दल आपण मत व्यक्त करू नये. ह्या गोष्टी मुले आपण अनेक जणांची दिशाभूल करतो. ह्या सर्व गोष्टी सायन्स पेक्षा फार वरचढ आहेत.
On 22/11/2010 02:09 AM me said:
माझ्या मते रूढी जोपर्यंत जाचक होत नाहीत तोपर्यंत पाळाव्यात. कित्येकदा कावळा शिवला नाही म्हणून लोक उन्हात ताटकळत उभे राहतात, काहीना मग chakaar आल्याचे ऐकिवात आहे. जिवंत माणसांची आबाळ करून गेलेल्यांचे इच्छा पुरती करणे कितपत योग्य आहे? हिंदू धर्मात पुनर्जन्म मनाला जातो. मग आपण पुढल्या जन्मात राहिलेल्या इच्छा पूर्ण का करू नयेत?
On 21/11/2010 01:05 PM vidyadhar Deshpande. said:
लेखकाने कावला पिंडाला शिवा म्हणून मृत याक्ती ची इच्छा यकत करायला हवी होती. लेक्कानी आणि वर लिहिणार्याने धर्मात प्रत्येक विधी का करतात त्या मागे काय उदेश असतो हे शास्त्र काय म्हणते हे पुस्तक वाचवे .मृत याक्ती ची राहिलेली इच्छा पूर्ण करणे हि मुला चे कर्तव्य आहे. ते त्याने पार पडले आसे वाटत नाही
On 21/11/2010 12:59 PM s k purandare said:
कशाला रे हिंदू धर्मात जन्माला aalas
On 21/11/2010 12:06 PM raje said:
@इनामदार : अहो साधी गोष्ट आहे, कावळा आधीच भरपेट तृप्त झाला असेल तर तो कशाला आणखी खायच्या नादाला लागेल ( तो काही कलमाडी नाही ). लोकांनी काहीही सांगावं आणि बाकीच्यांनी ते निमूट पणे मानावं ह्याला गुलामगिरी नाहीतर आणि काय म्हणणार? धर्म म्हणजे पूर्वीच्या काळी माणसांच्या टोळ्यांना घालून दिलेले नियमच आहेत (त्या टोळ्यांमध्ये सुसूत्रता आणि वळण राहावे म्हणून) त्या नियमांचा आता अपभ्रंश झाला आहे. फक्त विज्ञानच काय सत्य आहे हे पटवून देवू शकतं, बाकीचे फक्त समज रूढी आणि परंपरा --- राजे
On 21/11/2010 08:54 AM Rohan said:
पूर्वी लोकांना कुठल्याही विधीमागील शास्त्रीय कारण सांगितले तर ते त्यावर बहिष्कार टाकत. त्यामुळे लोकांना समजेल आणि त्यांचा विश्वास बसेल असे काही कारण सांगावे लागे. कदाचित पिंडाला कावला शिवणे ह्यामागे सुद्धा काही शास्त्रीय कारण असेल.
On 21/11/2010 07:30 AM sasonkar yardena israel said:
विज्ञान कितीही पुढे गेले तरी काही गोष्टी त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहेत.येथे इझ्रेल मध्ये कावले येत नाहीत.. आले तर त्यांना गोळी घालून मारून टाकतात. हे हिंदू धर्माचे संस्कार आहेत. तुम्ही स्वतःला हिंदू म्हणत असाल तर हे सर्व आव्श्श्यक आहे.... हे माझे मत आहे. sasonkar yardena israel
On 20/11/2010 11:06 PM Suhas Inamdar said:
विज्ञान कितीही पुढे गेले तरी काही गोष्टी त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. त्यापैकी प्रमुख म्हणजे जन्म, मृत्यू, मृत्युनंतरचे जीवन ई. एकाच ठिकाणी, एकाच प्रकारचे पिंड, तेच कावळे असूनही काही वेळेस कशाला शिवतात आणि काही वेळेस कशाला शिवत नाहीत ह्यास विज्ञानाकदे समाधानकारक उत्तर नाही. बऱ्याच समजुतींपैकी एक अशी आहे कि कावळ्यांना आत्मा हा दिसत असतो. ज्या आत्म्याच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, ते आत्मे त्या पिंदाकडे येतात आणि कावळ्यांना हाकलून लावतात.
On 20/11/2010 07:44 PM raje said:
काहीतरी स्वार्थी लोकांनी आपल्या फायद्या साठी लोकांच्या गळी मारलेले तत्वज्ञान मूर्ख लोक आजवर पाळत आलेत. कावळा शिवला काय आणि कुत्रा शिवला काय काय फरक पडतो ? आणि ह्या गोष्टींचे समर्थन म्हणजे तर अजबच प्रकार झाला. वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवा आणि डोळस पणे जगा. ----- राजे
On 19/11/2010 11:02 PM dilip said:
माझ्या माहितीतील एका दशक्रीयेला ओमकारेश्वर (पुणे) येथे पहिले कि कावळा पिंडाला शिवत नव्हता. थोड्या वेळाने दुसऱ्या कोणाचा पिंड त्याचे जवळच ठेवला होता .त्याला कावळा शिवला मात्र माझ्या माहितीतील दशक्रीयेला कावळा शिवला नाही. शास्त्रीय दृष्टीकोन ठेवणार्याने ताबडतोब निष्कर्ष काढू नयेत. स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरे व नंतर तो सांगण्यास येत नाही.हीच पंचाईत आहे.
On 19/11/2010 10:01 PM reader said:
माझे धर्म dynan कच्चे आहे हे मान्य करून देखील कावळ्याचा पिंडाशी काय संबध ते देव जाणे.म्हणजे कावळाच का इतर पक्षी नाहीत कारण चिमणी, कावळा हे पक्षी common आहेत -उगीच भारद्वाज नको कारण तो कुठून येणार? बर्याच माणसाना हि भीती असते कावळा शिवला नाही तर उगीच अतृप्त इच्छा आपल्याला भोवायला नकोत म्हणून त्या दिवशी कावळ्याला प्रतिष्ठा. जिवंत माणसाशी नीट वागा म्हणजे मेल्यावर इतका खटाटोप करावा लागणार नाही.
On 19/11/2010 09:53 PM Avadhut said:
-------या बाबतीत "शास्त्र के सांगते" हे पुस्तक चांगली माहिती देणारे आहे.शेवटी जिथे ज्याची श्रद्धा तो त्याचा देव- काही लोक कर्म करून ते करतात हाच फरक.--यात कोणाला काय वाटेल या हेतूने केलेले कोणतेही कर्म मूळ उद्देश ला धक्का देते -- जर करायचे नसेल तर न करणे चांगले --उगाच कावळ्यांची वाट पाहून लोकांना त्रास नको आणि तर्काचे मोजमाप नको--कारण हिंदू संस्कृती काय सांगते हे महत्वाचे!
On 19/11/2010 09:45 PM Avadhut said:
---घड्याळाकडे बघून श्राद्ध केले की कावळा आपल्या ऑफिस च्या सोयिने येत नाही -- मुळात यावर विशवास असेल तर करावे --नाहीतर न केलेले बरे -हिन्दू हि अत्यंत उच्च संस्कृति आहे -- सर्व विधी समजून घेतले तरच त्याला अर्थ आहे --आपण दगडाला देव मानतो असे म्हणतात --याचा अर्थ निर्जीव दगडात पण देव पाहणारी आपली संस्कृति आहे- मज़े मत पुरोगामी असेल पण जिथे आनंद साजरा करतो तसेच हे ही करावे श्रद्धेने --नाही केले तरी चालेल --उगाच कोण काय म्हणेल याचा विचार केला तर काहीच उपयोग नाही.
On 19/11/2010 09:41 PM Avadhut said:
श्राद्ध हा संस्कार ला श्रद्धे चे अधिष्ठान आहे --जिथे श्रध्दा नाही ते श्राद्ध कसले ? -हिंदू धर्म पुनर्जन्म आणि मुक्ती या गोष्टी मानतो-- श्रद्धा च्या वेळेस अवयव श्राद्ध असते --कि जर पुन्हा जन्म झाला तर तो शरीराने कोणतीही व्याधि घेवुन नसावा --कावला शिवणे हे मुक्ती चे प्रतिक आहे -- 10 दिवस आत्मा दिव्या रुपी असतो तो काक स्पर्शाने मुक्त होतो --कित्येक वेळेस १०० कावळे येवुनाही १ पण शिवत नाही.
On 19/11/2010 08:46 PM आशिष (Malaysia) said:
धर्मही हि अफूची गोळी आहे हे खरेच . हे गोळी वेदना शमे पर्यंत घावी त्याचे व्यसन करू नये आपल्या चालीरीती ह्या शाश्त्रोत्र आहेतच पण बरीच कर्मकांडे हे शतकापूर्वीच्या काळात योग्य होती .सिमेंटच्या जंगलात आज कावळा पिंडाला शिवण्यासाठी मिळणार का ? त्या ऐवजी दहावायला दहा गरीब माणसाना जेऊ घालून अथवा एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणाचा खर्च केल्यास .मृत आत्म्यास नक्की शांती मिळेल . अर्थातच शेवटी ज्याचीई त्याची इच्छा .
On 19/11/2010 08:17 PM sharad sohoni said:
हल्ली आपण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार करतो का? आपण आपल्या आई वडिलांची सेवा त्यांच्या हयातीत करावी.हे कितीजण करतात? मात्र ते गेल्यानंतर त्यांचे दिवस करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो.हे योग्य आहे का? रूढी आणि परंपरेचे पालन ज्याला जेवढे रुचेल,पटेल,आणि झेपेल त्याप्रमाणे करावे. त्याची कुणावर सक्ती नसावी. उगाचच कठल्याही गोष्टीचे अवडंबर करू नये. शरद सोहोनी
On 19/11/2010 08:12 PM supriya said:
कि अशा गोष्टी परंपरा यांना नक्कीच एकही तरी अर्थ असावा.. फक्त आपल्याला तो अर्थ माहित नसतो म्हणून आपण त्याला कर्मकांडे वगैरे नाव देऊन नाकारतो.. पण त्यामागचे logic माहित झाले कि अश्या गोष्टींना कर्मकांडांचे नाव कोणीच देणार नाही..
On 19/11/2010 08:09 PM supriya said:
या प्रथा विचार करूनच बनलेल्या आहेत आणि त्यामागे काही तरी कारण नक्कीच असते.. कधीतरी सकाळ मधेच एक लिख वाचल्याचे आठवते.. नेमका लेख पूर्ण आठवत नसला तरी इतके आठवते कि लेखिकेच्या मुलाला चान मार्क्स पडले त्याची एका हॉल मध्ये पार्ट्य चालू होती..मेन्यू मध्ये बटाटा पुरी होती..आणि लेखिकेच्या आईचे नुकतेच निधन झाले होते.. पुरी बघून लेखिकेला आईची आठवण झाली..आणि त्यंनी आईच्या फोटो समोर पुरी ठेवली आणि तिची आठवण keli..तेवढ्यात कसा कोण जाने पण चक्क हॉल मध्ये एक कावला आला व पुरी घेऊन उडाला.. त्यावरून असे वाटते..
On 19/11/2010 08:07 PM sunny govekar said:
कदाचित पुण्यातले कावले पण हव्रात असतील पण माझा ह्या प्रथेवर विश्वास आहे , असे ऐकले आहे कि बरीच पिंडे एकत्र असली आणि काव्लेसुद्धा खूप असले तरीसुद्धा कावला पिंडाला शिवेलाच असे नाही बर्याचदा थांबावेच लागते . आणि अजुनी शास्त्राने बर्याच गोष्टींचा छ डा लावायचा आहे , अजुनी आपण झालो कसे हे नक्की माहित नाही .
On 19/11/2010 07:42 PM charu said:
मी पूर्णपणे लेखकाच्या मताशी सहमत आहे. हिंदू धर्मात अथवा धर्मग्रंथात कोठेही लिहिलेले नाही की पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. आयुष्यभर चांगले काम करीत राहिल्यानेच मोक्ष मिळतो असे आहे. या अंधश्रद्धा ज्यांना पाळायच्या असतील त्यांनी जरूर पाळाव्या - हा भावनेचा प्रश्न आहे. पण शेवटी त्या अंधश्रद्धाच.
On 19/11/2010 07:25 PM nilambai said:
आपल्या प्रथा चुकीच्या म्हण्याआधी त्या का आहेत यामागची कारण मीमांसा समजून घेणे महत्वाचे आहे आणि अभ्यास करायला पाहिजे त्या सरळ मोडीत घालण्या पूर्वी.
On 19/11/2010 05:49 PM Kedar Agnihotri said:
Maza Hindu dharmawar purn vishwas ahe. Aajkal jag pudhe chalale ahe chya navakhali, aplyala soyiskar te uchalane ani bakiche sodun dene yachi savay ch zali ahe. Kunalach kuthlich bandhane palayala awadat nahit. Junya goshti kahi vichar karun kelya ahet, tyachi palanuk hi garajechich ahe. Inamdar saheb tumhi ekda asa pan vichar karun paha ki kharach tyaveli kawala tithe ka ala nahi. Itar weli tar bhat khayala kawala kuthunhi yeto.
On 19/11/2010 05:21 PM Vaibhav Kirpekar said:
लेखक सुभाष इनामदार जी, हि काही लोकलज्जा वगैरे काही नाही, आपण कितीही तंत्राद्यानाने पुढे गेलो तरी तंत्राद्यान सांगत नाही कि तुमची संस्कृती विसरून जा ! आणि हो जशी दिवाळी, दसरा, गुढी पाडवा, लग्न, मुंज, बारसे समारंभ आहेत तसेच हे हि एक आपल्या हिंदू संस्कृती मधील कार्यच आहे! आणि ते आपल्याला विसरून चालणार नाही. असे माझे मत आहे ! बाकी वाचक सज्ञान आहेत ! वैभव किरपेकर, पुणे
On 19/11/2010 04:29 PM suresh topkar said:
हे हिंदू धर्माचे संस्कार आहेत. तुम्ही स्वतःला हिंदू म्हणत असाल तर हे सर्व आव्श्श्यक आहे. सुधारणा , लोकलज्जा वगैरे काही नाही. कोणत्याही बाबतीत (उदा. धर्म) आपली निष्ठा प्रखर असतील तर त्याच्या पालनाने फळ उत्तमच मिळते.त्रास झाला तरी हरकत नाही.

रंगभूमीने काळाप्रमाणे बदलायला हवे

-मनोहर कुलकर्णी

बदलत्या काळाचे स्विकारणारी नाटके रंगभूमिवर येत नाहीत. योग्य भूमिकांना त्या योग्यतेचा कलाकार नाटकात काम करताना दिसत नाही. वाढत्या मालिकांच्या प्रभावामुळे रंगमंदिराकडे मुद्दाम यावे अशी नाटकेही आज येत नाहीत. जी गोष्ट गद्य नाटकाची तीच संगीत नाटकाची आहे. तरीही सुदर्शन रंगमंचावर होणारी चळवळ . तिथे होणारी आजच्या पीढीने आजच्या प्रेक्षकासाठी केलेली नाटके यातून रंगभूमि तग धरून आहे. काळाप्रमाणे वदतलणा-या `अवघा रंग एकची झाला ``सारखी आपली परंपरा आणि आजचा काळ यांची मेळ घालणा-या संगीत नाटकांचे प्रयोग ह्यातून आशादायी चित्र दिसत आहे. थोडे फार नाव मिळाले की कलाकार मालिकेसाठी जातो. त्याला इकडच्या नाईटपेक्षा तिथे पैसा जास्त मिळतो. मग तो तिथेच रमतो. पुन्हा नाटकाकडे फारसा फिरकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आजची रंगभूमिची स्थिती पाहून निराश आहे. मात्र ती बदलण्याची ताकद तरूणाईमध्ये आहे. त्यांनी नाटकाकडे गंभीरपणे पहावे असे वाटते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेचा `जीवनगौरव` पुरस्कार मिळालेले आणि ज्यांची सारी हयातच नाटकांचे व्यवश्थापन करण्यात गेले ते मनोरंजनचे ८३ वर्षाचे मनोहरपंत कुलकर्णी तळमळीने हे सारे सांगत होते. त्यांना बुधवारी जयंतराव टिळक स्मृती प्रित्यर्थ पंचवीस हजार रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यानिमित्ताने सा-या नाटकवाल्यांचे `आण्णा` आजच्या नाटकांविषयी तळमळीने आणि पोटतिडकीने बोतल होते.
आर एम एस मध्ये सॉरर्टरची नोकरी करून त्यावेळचे आपले मित्र नाना रायरीकर यांच्या साथीने १९५६ पासून भालचंद्र पेंढारकरांच्या ललितकलादर्शच्या व्यवस्थापनाची पुण्यातली जबाबदारी घेणारे भागीदार मनोरंजन यानावाने व्यवसायत आले.. गेली ५४ वर्ष याव्यवसायात अनेक अनुभवांनी समृध्द झाले. अनेक अनुभवातून शिकले. अनेकांना नाटके करण्यासाठी आर्थिक बळ दिले. त्यातल्या कांहीनी पैसे डुबवले ते विसरून आजही ८४च्या उंबरठ्यावर मनोरंजनचा सारा भार आपले पुत्र मोहन कुलकर्णी याच्यावर सोपवून स्वतः क्रियाशिल राहून हिशेबाचा सारा भार पेलत ताठ मानेने आणि नाटकांचे अवलोकन करीत नाट्यव्यवसायाची चिंता करीत आहेत आनंदी जीवन जगत कार्यरत आहेत.
पुण्याबरोबर नाटकांचे दौरे आखणे. त्यासाठी आवश्यक असणारी व्यवस्थापनाची बाजू सांभाळून अधिकाअधिक प्रयोग करण्यासाठी संस्थांना मार्गदर्शन करणे. प्रसंगी त्यांना लागेल तशी आर्थिक मदत करणे. कलावंतांना काय हवे ते पहाणे. त्यांचे स्वभावाप्रमाणे त्यांचा मुड सांभाळत `शो मस्ट गो ऑन `या न्यायाने सारी मदत करण्याचे सौभाग्य यानिमित्ताने मनोरंजनच्या मनोहर कुलकर्णी यांना लाभले. ललितकलादर्श, नाट्यसंपदा, चंद्रलेखा, लता नार्वेकरांची श्री चिंतामणी, दादा कोंडके यांची विच्छा माझी पुरी करा, धनसिंग चौधरी, थिएटर अकादमी, पीडीए. किती नावे घ्यावीत त्यांचे व्यवस्थापनाचे काम त्यांनी केले. अनेकांनी पैशाला टगंग मारली. त्यातूनही तरले. मात्र यातून कित्येकजण मित्र बनले. त्यातिथे मग पैशापेक्षा माणुसकीच्या न्यायाने कायमची साथ केली. त्यांचे तंत्र सांभाळले. त्यांच्या घरातलाच एक सभासद झालो. याचा अधिक आनंद आहे.
वाईसारख्या छोट्या गावातून ४६ साली ते पुण्यात आले. ४७ ला त्यावेळच्या मुंबई विद्यापीठाचे मॅट्रिक झाले. रावसाहेब शिंगरे यांच्याकडे राहून. घरची कामे करून शिकण्याची जिद्द बाळगली. त्यांनी बाहेर काढल्यावर नाना रायरीकरांच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहिले.. दूधाचे रतीब घातले. सायकल घेवून RMS मध्ये शेवटपर्यत काम केले. भालचेद्र पेढारकर भेटले आणि मनोरंजनचा पाया रोवला गेला. एका खोलीत तीन मुलांसह अठरा वर्ष संसार केला. अनेक वर्षानंतर गुलटेकडीला बंगला बांधला. मी आणि नाना( रायरीकर) नोकरीत म्हणून डॅडी लोणकरांना भागीदार करून घेतले. नाटकांचे दौरे केले. चित्तरंजन कोल्हटकरांसारखे कलावंत मित्र भेटले..काशिनाथ घाणेकरांसारख्या कलाकाराचा सहवास भेटला. नाती द़ढ होत गेली. मनोरंजनची वाटचाल सुरूच राहिली.
`वयानुरून आता सारा भार मोहनवर सोपविला आहे. तो नव्यापध्दतीने मनोरंजनते बळ वाढवित आहे.`
बोलताना ते गत आयुष्याबद्दल सांगताना त्या काळात मलाही घेउन गेले. हौशी कलावंत म्हणून भावबंधनमध्ये मनोहरची भूमिका केली. RMS तर्फे नाटकात भूमिका केली. एका चित्रपटातही छोटी भूमिका केली. कलावंत हापता आले. संगीत नाटकांचा बहर अनुभवला. गद्य नाटकांची पारायणे केली. संस्था पाहिल्या. माणसांचे नमुने पाहिले. अनुभव घेतले. अनेक नाटकवाल्यांना सल्ले दिले. परखड मते मांडली. संगीत नाटके पाहण्याची भारी आवड. तीही पुरी झाली. तो काळ पाहता आजचे चित्र पाहताना विराश होतो. इतकेच.
जयंतरांव टिळकांनी नाट्यपरिषदेला टिळक स्मारक मंदिरात जागा दिली. अनेका नाटकांना प्रेत्साहन दिले. जयंतरावांच्या नावाने पुरस्कार मिळतोय याचा अधिक आनेद आहे. हा व्यवसाय बहरत रहावा. पुन्हा एकदा रंगमंदिर फुलेले पहावे हित इच्छा आहे.
-------------------------------------------------------------------------------------
( जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने मनोहर कुलकर्णी यांच्याशी मनसोक्त गप्पा झाल्या त्यातून त्यांच्याकडून मिळालेल्या अनुभवावर आधारीत हा लेख तयार केला आहे.)


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
mob- 09552596276

Sunday, November 21, 2010

कलावंताने कलेशी एकनिष्ठ रहावे


कलावंताने शेवटपर्यत कलेशी एकनिष्ठ राहून सतत विद्यार्थी बनून नवे शिकण्याचा प्रयत्न केला तर त्याला सतत नवे काहीतरी मिळत असते. हिराबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या दोन्ही भगिनिंनी नवीन पिढी , नवे श्रोते निर्माण केले. आजच्या कलाकारांनीही तसाच प्रयत्न करावा, अशी सूचना ज्येष्ठ व्हायोलिन वादक फैय्याज हुसेन खॉ यांनी आजच्या तरूण कलाकारांना केली.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्ताने तरूण सारंगीवादक साबीर खॉ यांना फैय्याज हुसेन खॉ यांच्या हस्ते शनिवारी सवाई गंधर्व स्मारकात पुरस्कार देण्यात आला. सरस्वती संगीत अकादमी आणि संवाद या संस्थेच्या वतीने रोख ७५०० हजार रूपये, स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. गायकाच्या मागे साथ करणा-यांना गायकांपेक्षा अधिक मेहनत करावी लागते पण त्यांचा य़थोचित सन्मान केला जात नाही. आज सारंगीए दुर्मिळ आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने सारंगीवादनाकडे तरुण कलावंत वळतील आशी आशा फैय्याज हुसेन खॉ यांना वाटते.
पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना साबीर खॉ यानी आपले वडील सुल्तान खॉ यांच्याकडून सारंगीवादनाचा हा वारसा आपणाकडे आल्याचे अभिमानाने सांगत हा पुरस्कार हा सन्मान वाकेही सपनेसे कम नही अशी भावना व्यक्त केली.
पुरस्कार समारंभानिमित्त आयोजिलेल्या संगीत मैफलीत साबीर खॉ यांनी आपल्य़ा नजाकतीने श्रोत्यांना जिंकून घेतले. राग सरस्वती सादर करून ती सरस्वतीबाईंना आदरांजलीच वाहिली. त्यांना तबला साथ केली ती अरविंदकुमार आझाद यांनी.
व्यंकटेशकुमार आणि स्ररस्वतीबाईंची नात मीना फातर्पेकर यांच्या गायनाने संगीतप्रेमी तृप्त झाले. त्यांना साथ होती हणमंत फडतरे (तबला) आणि प्रमोद मराठे(संवादिनी)यांची.
सा-याच कार्यक्रमाचे निवेदन शैलवा मुकुंद यांनी केले तर संवादच्या सुनिल महाजन यांनी आभार मानले.

Thursday, November 11, 2010

नाटकवाले- पुल


नोव्हेबरात पुण्यात सुरू होत असतो पुलोत्सव. साहित्य, नाट्य, चित्र, संगीत, अभिनय, दिग्दर्शन आशा विविध अंगानी फुलणारे आणि तमाम मराठी मंडळींचे लाडके म्हणजे. पु. ल. देशपांडे.
अनेकविध कलांचा हा बादशहा. वाणीत ओजस्विता. तर लेखणीत विनोदाचा नटखट बाज. थोडे मागे वळून पाहिले तर नाटकाने पुलंना नाव, किर्ती दिली. त्यांच्या नाटकावरील प्रेमाच्या अनेक गोष्टी रसिकांच्या आठवणीच्या कप्प्यात घर करुन आहेत. अनेकांनी पुलंच्या नाटकाविषयी, नाट्यक्षेत्रातल्या त्यांच्या कर्तृत्वाविषयी नोंद करून ठेवली आहे. या निमित्ताने ती पोत़डी तुमच्यासारख्या जाणकांरांसमोर खुली करण्याचा हा प्रयत्न आहे.

--------------------------------------------------

नाटकात मी लेखक,दिग्दर्शक, नट अशा निरनिराळ्या सोंगात वावरलो. मला सगळ्यात अधिक आनंद मिळत गेला तो नाटकांच्या तालमीत. पहिला प्रयोग हे प्रवासातला शेवटचा मुक्काम गाठण्यासारखं असते. पण मजा असते ती प्रवासातल्या त्या मुक्कामापर्यंतच्या वाटचालीत. एखाद्या मित्राचं रहस्य उलगडावं तशी वाक्य उलगडत जात असतात.
एखादे कॉम्पोझिशन जरा इकडून तिकडे फिरविले की.. त्या चित्रात निराळाच रंग भरत असतो. एखाद्या वाक्याचा चढ-उतार, एखादा पॉज, एंट्रीच्या वेळची एखादी हालचाल, एखाद्या नटाचा किंवा नटीचा अकल्पितपणे साधलेला अभिनयातला बारकावा- तालमीत एखाद्या पात्राच्या अभिनयाचा उठाव येण्यासाठी सुचलेला बिझनेस, इतकेच नव्हे, तर अनपेक्षितपणाने उदभवणा-या अडचणा, त्या सा-या उत्सुक क्षणांतून पहिल्या प्रयोगाच्या दिशेला हे तालमीचं जहाज प्रवास करीत असते. ह्या तालमीत ज्याला मजा घेता आला नाही त्याला नाटकात रमण्यात रस नसून नुसते मिरवण्याची आवड आहे हे ओळखावे आणि इतकी सगळी धडपड करूनही पहिल्या प्रयोगाच्या वेळी आपल्या स्वप्नातही नसलेल्या ठिकाणी दाद मिळून जाते किंवा अपेक्षित प्रतिक्रियेच्या क्षणी प्रेक्षागार ठप्प होउन बसते तो अनुभव निराळाच.
कलेत विचार हवा. पण केवळ तार्कीक विचारातून कलेचे घुमारे फुटत नाहीत. हा प्रपंच तकार्तीत असतो. इथे बे दुणे चार करण्यात हाशील नसून बे दुणे पाच किंवा तीन करण्याची किमया साधण्यातच गंमत आहे. सोळा मात्रांचा हिशेब दाखवीत ही साधणे ही कारागीरी झाली. पण ऐकणा-याच्या डोक्यातून मात्रांचा हिशेब घालवून अकल्पित भेटलेल्या प्रियसी सारखी समेची भेट घडवून आणण्याला संगीतात श्रेष्ठ मोल असतं. कुणीसं म्हटलय ते खरं आहे... एक होता राजा आणि एक होती राणी.- इथे नाटक सुरू होत नाही. तर एक होता राजा आणि एक होती राणी पण...त्या `पण` पासून नाटक सुरू होतं. सारं आयुष्य हा पण जो काही नाना प्रकारचे खेळ मांडतो त्यातलं रहस्य शोधताना कसं निघून गेले ते कळत नाही. म्हणूनच तर प्रत्येक नाटकाच्या तालमी सुरू झाल्या की नवे सुरवातीचे दिवस सुरु होतात.
पुल.
-------------------------------------------------------------
पीएल म्हणजे नुसता विनोद व हशा नाही. या विनोदाच्या पलिकडे एक सश्रध्द, न्यायान्यायाच्या प्रश्नात तीव्रतेनं गुंतलेलं समंजस आणि प्रागतिक असं मन आहे. असे अस्वस्थ झालेले पुलही मी पाहिलेले आहेत. अत्याचार, अन्याय, जुलूम, जबरदस्ती इत्यादि गोष्टींनी ते अशांत होतात. त्याचप्रमाणे बाबा आमट्यांसारख्या नवसंतांच्या कार्यदर्शनानं ते पूर्णतः जिंकले जातात आणि आपल्या सर्व शक्ति पणाला लावून अशा कामासाठी प्रत्यक्ष राबतातही. अतिशय डोळसपणानं त्यांनी दिलेल्या मोठमोठ्या देणग्या त्यांच्या वृत्तीच्या निर्देशक आहेत. मला पीएलचं वैशीष्ट्य हे वाटतें की, जगभर संचार करुनही त्यांचं मराठीपण कधी हरवले नाही किंवा विविध व्यवसायात वावरुनही त्यांच्या अंतरंगातील माणुसकीची भावना कधी विस्कळीत झाली नाही.
- वि वि शिरवाडकर
- ---------------------------------------------------------
पुलंचे बहुतांश लेखन पाहण्यासारखे आहे. एकेका अतिरेकी प्रवृत्तीवर विनोद करण्यामागे सुध्दा पुलंमधला नाटककार किंवा बहुरुपी प्रभावी ठरतो. त्यांच्या लेखनातसुध्दा एकेका प्रवृत्तिदर्शक व्यक्तिच्या नकला होत आहेत किंवा अतिरेकी प्रवृत्तीची चेष्टा चालू आहे असा अनेकदा भास होतो. या दृष्टीने पुलंची शैली पाहण्यासारखी आहे. लेख लिहिताना आपण रंगमंचावर आहोत आणि सभोवार प्रेक्षक असून आपले लेख ` ऐकत` आहेत असा खुद्द पुलंचाही समज असतो की काय असे वाटू लागते. पुलंनी मलाच मागे एका मुलाखतीत सांगितलेले आहे की, `साहित्य हे खरे मुळात उच्चारीच ( स्पोकन) आहे. लिखित किंवा पुस्तक ही एक सोय आहे. वाक्य हे अर्थानुसार उच्चारावे लागते. ते उच्चारताच एगदी निकटवर्ती असा अर्थ प्रतीत झाला पाहिजे. खरे तर ही भूमिका नटाची आहे.` पु.ल हे नट-साहित्यिक आहेत. नट, नाटककार आहेत. काहीही लिहिताना नट ते कसे उच्चारील याकडे त्यांचे लक्ष असते.
पुलंना निसर्गतःच उच्चारांची, ध्वनीची एक वेगळी जाण आहे. ती तेवढ्या प्रमाणात आज कुणाला आहे असे वाटत नाही. ते कितीतरी वेगळ्या आवाजात बोलू शकतात.ती एक मोठी देणगी आहे. विविध त-हांनी ते नकला करू शकतात. परंतु या देणगीचा मराठी रंगभूमीला फार मोठा फायदा झाला नाही.

-जयवंत दळवी.
------------------------------------------------------------

पु.ल. देशपांड्यांच्या रंगभूमिवरील कामगिरीकडे पाहिले की असे वाटते की, पु. ल. म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक बेट आहे. ते आशा अर्थाने की नाट्य-साहित्याच्या प्रांतात त्यांनी खास असे कोणी शिष्य निर्माण केले नाहीत. आचार्य अत्र्यांप्रमाणे त्यांना ही नाट्यलेखन व दिग्दर्शन यांच्याखेरीज महत्वाची व्यवधाने होतीच. परदेशी रंगभूमीचा अनुभव त्यांनी अत्र्यांपेक्षा जास्त जाणकारीने घेतला आणि नाट्यरचनेच्या बाबतीत अत्र्यांप्रमाणे संकेतप्रिय राहून समाजमनावर मात्र प्रचंड मोहिनी घातली. पु.लं.चे श्रेष्ठत्व हेच की, पुढे त्यांना मराठी रंगभूमीची अवघी कलात्मक अस्मिताच ढवळून काढली, तिचे सव्वा शतक जणू एकसमयावच्छेदेकरून प्रेक्षकांपुढे उभे केले आणि किमान आणखी एक शतक पुरेल इतके चैतन्य तिला दिले.
-ज्ञानेश्वर नाडकर्णी
----------------------------------------------------------
`गृहदाह` या नाटकाच्या निमित्ताने आम्ही एकत्र येण्याचा योग आला. तो काळ माझ्या जीवनातला सोनेरी काळ! कारण पी. एल. माझ्या अगदी जवळ आला होता तो याच काळात. त्या काळात तो कोणी मोठा होता असं नव्हे. पण या माणसात काही तरी जादू आहे खास असं मला राहूनराहून वाटायचं. त्याचा सहवास एखाद्या गुलाबाच्या सुगंधासारखा-सदैव हवाहवासा वाटायचा.
पी. एल. एतका बुध्दिमान, रसिला, प्रेमळ आणखी पुष्कळ काही असूनदेखील माल तो आवडतो तो एक माणूस म्हणून.
१९५०- मध्ये `तुझे आहे तुजपाशी` या नाटकामुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो. यावेळी त्याच्यातला दिग्दर्शक मला दिसला. . नाटकामुळे पी.एल.नं लोकप्रियतेचे शिखर गाठलं तर या नाटकात मला डॉ. सतीशची भूमिका देउन त्यानं मला लोकप्रियतेच्या टेकडीवर आणून ठेवलं. पी.एल. नं अशा रितीने कितीतरी कलावंताना त्यांचा हात धरून प्रसिध्दीच्या झोतात आणले आहे.
-अनंत वर्तक
-----------------------------------------------------------------------
अशा अनेकविध कलावंतांच्या आठवणीच्या पोतडीत पुल दडले आहेत. अखेरपर्यंत हसवितानाही गंभीर करणारा विनोद पुलंनी महाराष्ट्राला, मराठी भाषेला दिला. त्यांच्या कोट्यांवर महाराष्ट्रातला एक वर्ग जीवापाड प्रेम करतो. त्यांच्या नाटकांचे आजही प्रयोग होत आहेत. त्यांच्या वाचनांचे, कथांचे. एकपात्री प्रयोगांची आजही मागणी आहे. असा कलावंत हा नशीबाने मराठी भाषकांना लाभला. त्या पुं.लंच्या स्मृतीना वंदन करून त्यांची सहजता, अभिनय आणि हजरजबाबी लेखनशैली आजरामर राहो, हिच इच्छा.


सुभाष इनामदार, पुणे
Subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
Mob_ 9552596276

Tuesday, November 9, 2010

बालगंधर्वात...गंधर्व नाटक मंडळी




पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात दिवाळीनंतचा दिपोत्सव सुरु होता. रंगमंचावर गंधर्व नाटक मंडळीतल्या कलाकारांची मैफल रंगली होती. आमंत्रीत अशा नाट्यसंगीताच्या जाणकांरांच्या सहवासातल्या मैफलीचे चित्रिकरण सुरू होते. वातावरणात संगीत नाटके पाहणारा तो उल्हसित पुणेकर दाद देत होता. बालगंधर्वातल्या बालगंधर्वाच्या चित्रकार देउस्करांनी रेखाटलेल्या प्रतिमेजवळ बालगंधर्वांची भूमिका करणारा करणारा कलावंत सुबोध भावे प्रसिध्दी माध्यमांना बाईट देत होता. निमित्त होते. एके काळी संगीत रंगभूमिवर सुवर्णकाळ आणणा-या महानायकाच्या चरित्रावरच्या चित्रपटाचे शुभारंभी चित्रिकरण. गंधर्व नाटक कंपनीच्या सेटवर मंगळवारी ९ नोह्बरला चित्रपटाचा मूहूर्त साधला गेला. आणि जमलेल्या शेकडो रसिकांनी नितिन चंदर्कांत देसाई निर्मित बालगंधर्व चित्रपटला शुभेच्छा दिल्या.

तीन महिने बालगंधर्वाचे मिळेल ते साहित्य वाचनाचा झपाटा लावून सव्वा-दोन तासाच्या चित्रपटाद्वारे गंधर्व एक कलावंत आणि गंधर्वांच्या चरित्राला मराठी भाषेतून साकार करणारी कथा, पटकथा आणि संवादाच्या साच्यात बंदिस्त केली ती अभिराम भडकमकर यांच्या शब्दरूपाने. गंधर्व गायकीचे साक्षिदार . त्यांच्यासोबत काम करणारे जयमाला शिलेदारांसारखे कलाकार . लता मंगेशकरांच्या आठवणीतले बालगंधर्व. बालगंधर्वांच्या आयुष्यातला पत्नीचा आणि गोहरजान यांचा प्रभाव. यातून संगीत रंगभूवर त्यांना स्कारलेली नाटके . त्यातले नाट्यसंगीत. सा-यातून असे बालगंधर्व आता न होणे असे पुलं नी म्हटले असतानाही बालगंधर्वयूग शोधण्याचा प्रयत्न करणारे नितिन देसाई यांच्या कलाकृतीतून मराठी महानायकाची ही कथा पडद्यावर साकारली जाणार आहे.
भारतरत्न पं. भिमसेन जोशी यांच्या आशिर्वादाने या चित्रपटाचा मूहूर्त करताना गंधर्व परिवाराला पुण्याच्या रसिकांनी दाद दिली तशीच चित्रपटाला दाद देतील असा विश्वास चंदर्कांत प्रॉडक्शन प्रा. लि. चे नितिन देसाई यांनी व्यक्त केला.
नारायण श्रीपाद राजहंस यांच्या संगीताने आणि अभिनयाने भारलेल्या काळाला साकारताना हा चित्रपट बनविणे हे शिवधनुष्य पेलण्याचा आपण प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक रवि जाधव सांगतात.
आपल्या संगीताची मोहिनी घालणा-या या महानायकाला पडद्यावर साकारण्यासाठी सुबोध भावे सज्ज झाला आहे. बालगंधर्वांच्या वेषात तो आज वावरत होता. खरी कसोटी आहे स्त्री वेषातले बालगंधर्व साकार करताना. आपल्या वाट्याला ही भूमिका आली याचा आनंद व्यक्त करताना ती भूमिका पेलण्याची संधी मिळाली याचे समाधान सुबोधच्या चेह-यावर दिसत होते.
बालगंधर्वांच्या पत्नीची भूमिका विभावरी देशपांडे साकारणार आहेत. त्यांच्या मते आपल्या पतीला सतत प्रेत्साहन देणारी आणि तरीही पडद्यामागे राहिलेली ही बाई बालगंधर्वांच्या जवळ जेव्हा गोहरजान आल्या तेव्हापासून ढासळली. बालगंधर्वांच्या आयुष्यातले लक्ष्मीचे स्थान काय होते ते तुम्हाला पडद्यावर दिसेल. मला ही भूमिका मिळाली याचा आनंद झाल्याचे विभावरी सांगते.
जुने संगीत. त्यातही ऑर्गनचा स्वर. भारावलेले संगीत. आणि संगीतावर प्रेम करणारा प्रेक्षक यासा-यांतून या चित्रपटाच्या संगीताचा बाज निर्माण करणे हे जबाबदारीचे आणि जोखमीचे होते. संगीतातला भराव देताना कुठेही अधुनिक काळाशी सुसंगत असे कांही घडता कामा नये याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आज नांदी ऐकली ना... चित्रपटातल्या नाट्यसंगीताही तसाच प्रय्तन केला आहे. कौशल इनामदार बोलत होते. आनंद भाटे या पं. भीमसेन जोशा यांच्या शिष्याने गंधर्व गायकीची ढब हुबेहुब निर्मिण केली आहे. स्वानंद किरकिरे यांच्या दोन गाण्यांनीही या चित्रपटाला वेगळेपण पुरविले आहे. पारंपारिक संगीत नाटकातले तेच वातावरण संगीतातून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे कौशल सांगतो.
भारलेल्या वातावणाने पुन्हा एकदा संगीत नाटकांचा काळ जिवंत झाल्यासारखे भासले. एके काळी रंगभूमी गाजविणा-या कलावंताचे जीवन रुपेरी पडद्यावर येते आणि आजकाल खंडीत झालेली संगीत नाटकांची परंपरा पुन्हा वाढच रहावी अशीच इच्छा अनेक जण इथे बोलून दाखवत होते. कलावंताचे माहेरघर असणा-या पुण्यात गंधर्वयुग घडले. त्यामुळे बालगधर्वांच्य़ा चित्रपटाला इतके सुयोग्य वातावरण दुसरीकडे कुठे मिळणार....
पुण्याच्या सुवर्णमय पेढीचे दाजीकाका गाडगीळ यांच्या सुवर्णमयी उपस्थितीने संगीताचा सुवर्णकाळ देणा-या महानायकाचा परिसस्पर्श घडला. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे, जयमालाबाई शिलेदार , किर्ती शिलेदार, लता भोगले, भास्करबूवा बखले यांची नातसून शैला दातार, , लंडनचे अनिल नेने, माजी खासदार श्रीनिवास पाटील, बालगंधर्वांच्या नात्यापैकी काही आणि संगीत रसिक यांच्या साक्षीने साकारलेल्या गंधर्वातल्या त्या संगीत पर्वाने काय सांगावे पुन्हा संगीत नाटकांची पुन्हा चलती व्हावी. मराठी रंगभूमीवर जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करण्याचे सुनिल बर्वे यांनी मनी घेतले आहे. तसे कुणीतरी संगीत नाटकांना रसिकाक्श्रय मिळव्ण्यासाठी पुढे येईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करीत आहे.

बालगंधर्व या चित्रपटातून पुढच्या पीढीला काही जुनी जाणती व्यक्तिमत्वे पहायला मिळणार आहेत. यात व्ही. शांताराम (ओमकार कुलकर्णी), शंकरराव मुजुमदार (विद्याधर जोशी), गणपतराव बोडस ( किशोर कदम), देवल मास्तर (श्रीरंग गोडबोले), गोविंदराव टेंबे (आदित्य ओक), कृष्णाजी खाडीलकर (क्षितीज झारापकर), राम गणेश गडकरी (मनोज कोल्हटकर), बाबुराव पेंटर ( अभय कुलकर्णी), भास्करबूवा बखले ( अजय पुरकर), मास्टर कृष्णराव ( विक्रंत आजगावकर) छत्रपती शाहू महाराज ( राहूल सोलापूरकर) आणि गोहरजान ( प्राची मेहेत्रे- सध्या ती बाजीराव मस्तानी मध्ये मस्तानी करत आहे).
चित्रपटाच्या माध्यमातून का होईना संगीत रंगभूमिचा आणि त्यातल्या कलावंतांचा इतिहास जपला जाईल याचा आनंद अधिक आहे.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
Mob- 9552596276

Raghunandan Panshikar

Shilpa Puntambekar

Violin

Monday, November 8, 2010

Dilip Prabhavalkar

Sanjeev

Manjusha

Rajan Sajan Mishra

तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा

आनंदाची दिवाळी साजरी करताना या मित्राची आठवण व्हावी यासारखी भाग्याची गोष्ट नाही. अवेक काळानंतर थोडा मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न होता पण माझ्यावर प्रेम करणा-या मित्रांमुळे ई-सकाळची दिपावलीत काही क्रीएटिव्ह करण्याची संधी मिळाली.
तेच क्रिएशन यासोबतच्या लिंकमधून आपल्यापर्य़त पोचवत आहे. आपल्यलाही यातून थोडाबहूत आनंद मिळाला तर मी स्वतः आनंदीत होईन.
तर पहात रहा या लिंक्स.....

http://www.facebook.com/profile.php?id=739823171


http://www.esakal.in/deepotsav/

http://www.esakal.in/deepotsav/swarotsav.aspx


http://www.esakal.in/deepotsav/celebrity_atul_parchure.aspx


http://www.esakal.in/deepotsav/diwali_pahat_rahul_deshpande.aspx


आणि म्हणत रहा

ज्योतितून ज्योत निघाली
आनंद पसरवून आली
भाग्याची ही साधना
मन माझे मोहरुन गेली

सुभाष इनामदार, पुणेsubhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
mob_ 09552596276

Tuesday, November 2, 2010

वा गुरू

चंद्रशेखर फणसळकरांच्या नविन नाटकातली दिलीप प्रभावळकरांची भूमिका पाहल्यानंतर नाट्यरसिकांच्या मनात सहजच एक शब्द घुमतो तो म्हणजे `वा गुरू`. मृत्यूचे भय न बाळगता आयुष्यातल्या जुन्या स्मृतींना जागवत आपल्या मनात सतत असणा-या विचारांना बोलते करणारा हा हाडाचा शिक्षक. पायापासून हळूहळू एकेक अवयव काम न करताना दिवसेंदिवस शरीराने खंगत जातो. ती वेदना हसत हसत झेलताना आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपल्या एके काळच्या प्रिय विद्यार्थ्याजवळ सांगतात. सगळे नाटकच थोड्याफार फरकाने गंभीर आहे. मूळ ईंगर्जी कथेवरून बेतलेल्या या कथालकातली सारी पात्रे आपले चेहरे घेऊन येतात .अस्सल मराठमोळ्या वातावरणाचा मुलामा देउन एक नवा अनुभव सुयोगच्या या नाटकाने दिला आहे.
ब-याच दिवसांनी या नाटकाच्या निमित्ताने नाटकाचा मूळ प्रेक्षक पुन्हा एकदा खेचला गेल्याचे चित्र पहिल्या प्रयोगाला दिसत होते. दिलिप प्रभावळकर यांच्या अभिनयाचा सुदर आविष्कार पाहण्याची संधी या नाटकाने दिली . त्यांच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांमध्ये ही एक वेगळी छटा पहायला मिळते. ही भूमिका निभावताना त्या व्य़ाक्तिचा बाज. त्याच्या मनाला चटका देणारे अनुभव. आणि प्रेम आणि स्पर्श या दोन भाषेतून माणसाने का बोलावे याचे गुरूजींच्या रूपातले विवेचन अगदी आत रुतुन बसते. शांततेलाही अर्थ देणारा हा हाडाचा शिक्षक जे बोलतो ते खरोखरीच ऐकत रहावेसे वाटते. ती भाषा पेलण्याची आणि संवादता भावार्थ त्यांच्या भूमिकेतून अनुभवायला हवा. ती मानसीकता, ते शव्दातले नाते. तो जिव्हाळा , ती वेदना, ती असाय्यता , ती ओढ, ते आसुसलेले हळवे रुप. सारेच प्रभावळकरांच्या व्यक्तिमत्वातून उलगडत जाते. वेदनेला सोसताना ज्यापध्दतीने बोलण्यातून आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा एखादा हाडाचा शिक्षक जशी माया लावेल तसे ते व्यक्तित्व दिलीप प्रभालकर यानाटकातून प्रेश्रकांसमोर आणतात. त्यांच्या भूमिकेला अनुभवताना म्हणूनच ओठा शब्द येतो...वा गुरु.

छोट्या-छोट्या प्रसंगातून खुलत जाणारे हे नाटक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवित नेते. विजय केंकरे यांनी अगदी व्यक्तिरेखेला साजेशी भाषेची ढब कलाकारांच्या उत्तम टिमकडून साकारुन समोर ठेवली आहे. आपण आता यापुढे काय होणार या उत्सुकतेतू प्रत्येक प्रसंग निरिक्षणपूर्वक टिपत रहातो. शिक्षकाच्या व्यक्तिरेखेतून मानवी मनाचे सामान्य वाटणारे असामान्य क्षण नेमके ठळकपणे बाहेर काढून ते प्रेक्षकांसमोर उलगडण्यात केंकरे यशश्वी झाले आहेत.
कोणेएकेकाळी आपल्या हाताखाली शिकून गेलेल्या विद्यार्थ्य़ांच्या आठवणीत रमता रमता जिवनाचे तत्वज्ञानच या नाटकातून लेखकाने नेमके मांडले आहे. त्यात सत्यता तर आहेच पण ते कधी कधी जिव्हारी लागेल इतके झोंहते देखील.
दिलिप प्रभावळकरांच्या जोडीला अतुल परचुरे सारखा हुन्नरी कलावंत या नाटकातून रसिकांसमोर येतो. शब्दांच्या सुरेल मैफलीतील ती नेमकी तान घेतो आणि दादही घेतो तो अतुल परचुरे. व्यवसायाच्या धकाधकीतही भावभावनांचे नाते घट्ट करताना आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व तो करतो. सहजता आणि तेवढीच ओढ निर्माण करून अतुल परचुरे सोळावर्षांनंतर भेटणा-या शिक्षकांविषयींची कृतज्ञताही तेवढ्याच नम्रपणे जेव्हा साकारते तेव्हा टाळ्याही भरभरुन येतात.
ब-याच कालावधीनंतर गिरीजा काटदरे संगीत नाटकांची परंपरा असलेल्या भूमिकातून गद्य नाटकात आल्या. नुसत्याच आल्या नाहीत तर ते सूरही आळवून दाद घेउन गेल्या. पूर्णीमा तळवलकरांनीही साकारलेली तरूणी विविधअंगानी आमच्यासमोर आणली. करीयरकडे लक्ष देता देता लग्नाला वेळच नसणा-या आजच्या पीढीला तीच्याकडून शिकायला मिळते.
स्वतःची छाप पाडणारे. दिलिप प्रभावळकर आणि अतुल परचुरेंच्या आभिनयाने सौंदर्यवान बनविलेले चंद्रशेखर फणळकरांचे हे नाटक विजय केंकरेंच्या दिग्दशर्नातून पहाताना मजा आला.
आजचा प्रगल्भ होत असलेला प्रेक्षक `वा गुरू`ला दाद देईल अशा आशा आहे.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob- 9552596276
www.subhashinamdar.blogspot.com

Friday, October 29, 2010

तेजाळल्या धरणीवरी



गेली ज्योतिने तेजाळत रात्र ही बहरत होती
तेजाने तळपत तेव्हा स्वतःला जागवित होती

नको भिती तिमिराची चांदणे ते उगवित होते
तेजाला साक्ष तेजाची क्षितिजात तारेही होते

काय तुला रे भिती आता तेजाळल्या नभापरी
लाभल्या क्षमल्या देही आसावल्या ओठावरी

नादाला लागला सुगावा देही चंदनाचा लेप
घेऊ किती देऊ किती ही आकाशाची झेप

झेपावया चेतावली आज दिव्याची ही ज्योत
ज्योतीतही उजळली घेते झळाळी आसमंत

आता तरी स्पर्शून जा रे रे मर्त्य मानवा
साद घेता साथ दे रे आता तरी हे आठवा

स्वपानांच्या गावा आज उजळला दिप
तेजाने तेजालाही लाभे किरणांचा स्पर्श

मनाची दारे आज उजाडली सताड
आनंदाची गाणी न उरे मारव्याची गत

चला जावू चेतवून मनांची संवेदना
संवादाला लाभली आता ही एकच कामना



सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276
www.subhashinamdar.blogspot.com

Tuesday, October 19, 2010

स्वप्नातले सत्त्य

स्वप्नात जे मी पाहिले सत्त्यात ते उतरले
धावलो शोधाया ते सहजी साध्य जाहले

का किंतूने घर पोखरले ते आता न उरले
वाजवाया गजर आता ना काही नुरले

दिनतमाची साथ ही आज मी अनुभवली
सार्थ माझ्या मस्तकी खंतही आता दुरावली

काय द्यावे तुला हे नकळे शब्द ओठावरी
आनंद बरसे मनमनी सुखवाया चरणावरी
नाद खुळा की बावळा हेही नच सांगावया
साद घाली आज माझी लेवूनी सांजावली

धाव आता घाव झेला रिता रे कितीसा
काय ठावा काय उरला प्रीतीचा तोही वसा
सांग झाली वेळ आता होतसे स्वप्नांची
जागवाया तुला रे किती सोंगे घ्यायची

तू दिलेली शब्द किमया आज झाली अपुरी
येशील पुन्हा माझ्या मनी ना तरी अंधुकशी?


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com

Mob- 9552596276

भविष्याकडे झुकणारे मानवी मन


गुरूजी, मुलगा २९ वर्षाचा आहे. अजून लग्न नाही. अनेक मुली येतात पण कुणी पसंतच पडत नाही. आम्हाला नक्की सांगा. त्याचे लग्न केव्हा होईल?
हे पहा, मुलाच्या जन्माच्या वेळीचे ग्रहमान योग्य नव्हते. त्यामुळे त्याच्या पत्रिकेत दोष आहे. लग्न होईल. पण उशीरा. कळले काय़? एक मात्र नक्की मुलगी कर्तृत्ववान असेल. पण भांडकुदळ असेल. सतत घरात भांडणे होतील. हे मला पत्रिकेत दिसतेय. येत्या दोन महिन्यात जमायला हवे.

गुरूजी, माझे पती ४२ व्या वर्षीच गेले. तेव्हापासून १२ वर्षात घरात एकही शुभकार्य झालेले नाही. मोठया मुलाचे लग्न होत नाही. मधल्या मुलीला स्थळे येत आहेत. पण तीला पसंत पडत नाही. तिचे म्हणणे मी आपल्या जातीतल्या मुलाशीच लग्न करेन हा हेका धरून बसली आहे. आम्ही सांगायचा प्रयत्न केला. पण ऐकतच नाही?
हे बघा, काही काळजी करू नका. तिचे लग्न होईल. फक्त तीला तुमच्यापेक्षा उच्च जातीतला मुलगा मिळेल. तीने थोडे नमते घ्यायला हवे. तशी ती स्वतःच्या पायावर खंबीर उभी आहे. पण अहंपणा, स्वतःच खरे करणारी तिची पत्रिका आहे. पण लग्न नक्की होईल. कळले काय?
गुरूजी, हा तिसरा मुलगा आहे. शिकतो आणि नोकरी शोधतोय. त्याला नोकरी मिळेल काय? तो रहाते घर बांधायचे म्हणतोय. पण त्याची अत्त्या, कुरबुरी करतेय. घर दक्षिण-उत्तर आहे. ह्याचे तरी सर्व रांकेला लागेल ना?
हे पहा. याच्या पत्रिकेतले ग्रह उच्चीचे आहेत. शिक्षण नक्की पूर्ण करून तो चांगल्या कंपनीत नोकरीला लागेल. पण त्याने कॉमर्सकडे न जाता इंजिनियरिंगची साईड पहिल्यापासून पकडायला हवी होती. ठिक आहे. देरसे आये, दुरूस्त आए. त्याने रहाते घर बांधण्याऐवजी दुसरीकडे फ्लॅट घ्यावा हे उत्तम. या दक्षिण-उत्तर घरात अडथळे दिसताहेत. एक तर कुठलीही जागा मंदिरासमोर असू नये. उत्कर्ष व्हायला अडथळे येतात.
तुमच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे मंदीर येते. शिवाय जागेचे दार दक्षिणेकडे आहे. आणि जागेत अनेक वाटेकरी आहेत. तुम्ही ती जागा बांधण्याचा घाट न घालणे उत्तम.
गेले काही दिवस तुमचे चांगले नाहीत. मात्र एक दोन महिन्यात ग्रह बदलत आहेत. काय समजले?
सर्व काही ठिक होईल. थोरल्या मुलाच्या आधी मुलीचे लग्न ठरले म्हणून काय बिघडले. काळ बदलला आहे. धाकट्याचेही कदाचित लवकर ठरेल.
गुरूजींच्या पाया पडून रितसर पैसे हातावर ठेऊन ही मंडळी निघुन गेली. ह्या माझ्यासमोर घडलेल्या संवादातून आजकाल माणूस किती अडचणीतून जात असतो. नोकरी, घर, लग्न आणि अडचणींनी ग्रासलेला आहे. त्याला यातून हवी आहे ह्यासर्वातून आपण चिंतामुक्त होऊ की नाही याबद्दलची खात्री.
पत्रिकेवर तुमचा विश्वास असो वा नसो. तो तुमचा डॉक्टरच आहे. तथाकथिक ग्रहांच्या गणीतावरून तुमच्या भविष्याची काळजी करतो. तुम्हाला भावनिक आणि मानसिक आधार देतो. तुम्हाला काही काळ तरी बरे वाटते. काही काळानंतर हेच प्रश्न पुन्हा आsss वासून उभे राहणारच आहेत. पण जर हे शास्त्र खरे असले तर उद्याचे दिवस तरी बरे येतील याची ग्वाही त्याला मिळते. एक प्रकारचा मानसिक ताण हलका होतो. पुढचे ताण नाहीसे करायला तो विरंगुळा मिळतो.

हजारो लोक भविष्याला मानत नाहीत. तसे त्यावर विसंबून राहूही नय़े. पण त्याचा सल्ला मानला तर काय होईल? निदान चुकीचे तर काही घडणार नाही. लाखो लोक दैनिकातले भविष्य रोज वाचतात. साप्ताहिक भविष्यही चाळतात. मग थोडे काळ समाधान देणार हा भविष्याचा मार्ग मानवी मनाला दिलासा देणारा आहे.... खरे ना?


सुभाष इनामदार, पुणे
Mob 9552596276
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com

Saturday, October 9, 2010

कावळ्यांनो पिंडाला शिवा रे.......


काव ...काव ... खारे पाटणजवळच्या नानिवड्यातील चार मुले ही हाक देऊन कावळ्याला हाकारा देत होती. घराच्या मागच्या शेतीच्या भागातच ९२ वर्षांच्या आजींचा दहावा केला जात होता. पंचक्रंशीत एकच भटजी त्याच्या वेळेनुसार सारे विधी होत होते. सर्व आप्तजन नातेवाईक यांनी पिंडाला नमस्कार केला. सुना नातवांनी आजीला जे आवडते असे वाटते ते शेजारी ठेवले. आता त्यांच्या मनासारखे सारेच झाले असावे. कोणतीही इच्छा अपुरी राहिली असे वाटत नाही. सगळे काही मिळाले. असेच आपसात कुजबूजत होते.
अखेरचे महणजे कावळ्याने पिंडाला शिवण्याचे काम अधुरे होते. कोकणातल्या परिसरातल्या त्या इतरवेळी निसर्गरम्य वातावरणाला भावनेची काळी नजर लागल्यासारखे भासत होते.
गुरूजी बाजू झाले. भाताचा तयार केलेला पिंड कावळ्याने येउन टोच मारावी व तो खावा यासाठी बाजूस ठेवला होता. तसे केले तरच आईच्या इच्छा पूर्ण झाल्या असे मानले जाणार होते.
भाताच्या शेतीच्या एका मध्यभागच्या मोकळ्या शेतात. नारळ, आंब्यांच्या उंच वाढलेल्या वृक्षातून कावळे येतील आणि पिंडाला शिवतील अशी आशा होती. आरंभी कावळ्यांची सावलीही दिसत नव्हती.आजींची ७०-६० वयाची मुले आता कावळ्यांनी यावे आणि आपल्या आईच्या पिंडाला शिवावे यासाठी हाका मारायला लागली...काव..काव.. काव.....
पण कावळे कुठेले. इतर पक्षांच्या किलबीलाटाने शेतीचा परिसर या भर दुपारी साडेबारच्या शांततेचा भंग करीत होता. पण कावळा मात्र दिसत नव्हता. आता मात्र हाका मारणा-या मुलांनी आर्ततेने कावळ्याची आराधना चालू ठेवली. इतरही सुना-मुली आईच्या इच्छेची आठवण करत हात जोडून प्रार्तना करीत होत्या. पण कुठले काय... कावळे मात्र दिसत नव्हते.
तासाच्या प्रतिक्षेनंतर यांच्या हाकामारण्याने म्हणा किंवा कसे झाडांच्या आडून तीन कावळ्य़ांचे आगमन झाले. पण ते खाली इतरून पिंडाला शिवतील असे चिन्ह नव्हते. वरून घिरट्या घालत होते पण पिंड जिथे ठेवला होता तिथे फिरकायला तयार नव्हते. तिस- चाळीस नातेवाईक मंडळी हे सारे चित्र निमूटपणे पहात होती. आलेले भटजी निवांतपणे घराच्या सावलीत कावळी शिवला की मग मला सांगा अशा स्थितीत घरात निवांत होते. वर घरातल्या बाईमाणसांशी चर्चा करण्यात ते सामिल झाले होते. या गावात ना कावळा फारसा कुणालाच शिवत नाही, काय़ समजले.पण ती वयाने ज्येष्ठ असलेली मुले जिवांच्या आकांताने कावळ्याची आर्तपणे वाट पहात होती. कावळा शिवल्याशिवाय दहाव्याचा विधी पूर्ण होऊ शकत नव्हता. तोपर्यंत कुणी मुखी काहीच टाकू शकत नव्हते. त्याही स्थितीत ज्यांना गाडी पकडायची होती ते पुन्हा एकदा पिंडाला नमस्कार करून चालते झाले.
कावळ्यांना किती महत्व आहे. ते मला तिथे जास्त जाणवले. पुण्यात ओंकारेश्वरावर कावळ्यांची फौज दहाव्याचे पिंड खायला तयारच असते. पिंड ठेवायचा अवकाश टोच मारून ते सारा भात फस्त करतानाचा अनुभव पंधरादिवसांपूर्वींच घेतला होता. आणि इथे मात्र कावळ्यांची चाहूलही नव्हती. तसे पहायला एका झाडावर कावळा दिसत होता पण तो पिंडाला शिवायला तयार खाली येतच नव्हता.
दोन तासाच्या कावळ्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेरीस दर्भाचा कावळा करून पिंडदान केले गेले. सर्वांनी तिलांजली दिली. आमच्या वडिलांच्या वेळेसही असेच झाल्याचे त्यांचा एक मुलगा म्हणाला देखील. पोटात कावळे भुकेने व्याकूळ झालेले पण प्रत्यक्षात कावळे यायला ही स्थिती. तेव्हा भूकेने कावळे ओरडतात हे काय तेव्हा प्रत्यक्षात उमजले.
खरच, तेव्हाच मी ठरवून टाकले की ... आपणही सांगून टाकायचे. माझ्या बाबतीत असे काही करू नका.
पण हे झाले माझ्यापुरते. मात्र एक नक्की श्रध्दा मग ती अंध का असेना अनेक जण आजही अधुनिक युगात ती पाळताहेत. आणि तीही डोळे उघडे ठेऊन . माणूस मेल्यानंतर काय होते... याचे संशोधन सुरू आहे. पण अधुनिक युगातला माणूस प्रत्यक्षात आपल्या घरात असे काही घडले की जनइच्छेमुळे म्हणा किंवा इतरांसाठी... सारे क्रिया-कर्म जुन्या चालीरितीप्रमाणे आजही करत आहे. मग ते देहदानाचे मृत्यूपत्र केलेला माणूस का असेना घरचे आजही पुढचे संस्कार लोक-लज्जेस्तव हे सारे विधी करत असतो.

जे पाहिले ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा कुणाच्या भावनेशी केलेला खेळ नक्कीच नाही.
मात्र यातून जे पाहिले ते सांगावे यातून काहीतरी चर्चा व्हावी आणि यावर कुणाचे काही मत असल्यास पहावे म्हणूनच हा प्रपंच.
.यातून कुणाला क्लेष झाला तर तर मी त्यांची माफी मागतो. तुमची मते मात्र अवश्य नोंदवा......



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamar@gmail.com
9552596276

Sunday, October 3, 2010

सुवर्णमहोत्सवी नाट्यसंमेलनाचा फसलेला प्रयोग

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने राज्याबाहेरच्या आणि राज्यातल्या ४८ संस्थांनी १ ते ३ आक्टोबरपर्यत सुवर्णमहोत्सवी नाट्यसंमेलन भरविण्याचा एक हास्यास्पद प्रयत्न केल्याचे चित्र समोर आले आहे.
अखिल भारतीय स्तरावचे नाट्य संमेलन राज्यात न होता ते विश्र्व नाट्य संमंलन म्हणून न्यू जर्सीला झाले हे काही पुण्यातल्या नाट्यवर्तूळातल्या मंडळींना खटकले. नाट्य संमेलन ही नाट्य परिषदेची मक्तेदारी नसावी असा सूर या मंडळींनी लावला आणि महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी जावून हा स्वतंत्र नाट्यसंमेलन भरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्यक्षात या संमेलनाला मिळालेली दाद पहाता तो सपशेल फसला असेच म्हणावे लागेल.

नाट्यक्षेत्राने याची दखलही घतली नाही. पुण्यात नाट्य परिषदेचे कार्यालय आहे. त्यातले फारसे पदाधिकारी इकडे फिरकेलेही नाही. जे दिसले ते ह्या संमेलनात काय होते ते पाहण्यासाठी हजर राहिले .पहिल्या दिवशीच्या पूर्वसंध्येला एक दिंडी काढण्याचा प्रयत्न झाला पण आयोध्येच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर त्यांना तो संयमित ठेवावा लागला.

प्रत्यक्षात जेव्हा संमेलन सुरू झाले तेव्हा जेमतेम साडेतीनशे मंडळी बालगंधर्वाच्या खूर्च्यात विराजमान झाली होती. त्यातले काही विद्यार्थी डि.वाय पाटील यांच्या संस्थेतले होते कारण खुद्द तेच या संमेलनाचे उदघाटक होते. संमेलनाध्यक्ष डॉ. विश्वास मेहेंदळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर साध्या खूर्चीत आणि एकटे डी वाय पाटील सिंहासानासारख्या खूर्चित विराजमान झाल्याचे चित्र केवीलवाणे होते.
फारशी दखल घेण्यामागचे नेमके कारण शोधायचा प्रयत्न केला तेव्हा तर खरच भारी गोष्ट कानावर पडली. हे नाट्यसंमेलन आपण पुढे ढकलू. आत्ता पुरेशी तयारी झालेली नाही. मात्र विश्वास मेहेंदळे यांनी हट्टाने परस्पर तारखा, वक्ते आणि कार्यक्रम पत्रकार परिषदेत जाहिरही करून टाकला. अशी माहिती मिळाली. त्यांना नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून मिरवायचे होते हेच यातून सिध्द होते.

तुम्ही प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिला गेला असाल तर ते तुम्हलाही जाणवेल.
मराठी नाटक काल,आज आणि उद्या या परिसंवादाचे अध्यक्ष होते खुद्द विश्वास मेहेंदळे पण त्यांनीच वादसंवाद प्रमाणे उपेंद्र लिमये, लालन सारंग आणि राम हेजीब यांच्याशी संवाद केला.
स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉ. दिपक टिळक पण ते हजरच नव्हते. कारणाची चौकशी केली तेव्हा कळाले की, त्यांना व्य़क्तिशः निमंत्रणही देण्यात आले नव्हते आणि अखेरच्या क्षणापर्यत त्यांच्याशी संपर्क सुरू होता. पण ते आले नाहीत. याला कारण मेंहेंदळे यांचा हट्टच.
परिसंवादात मेहेंदळेयांनी जाहिरपण सांगितले की आम्हाला मुख्यमंत्री येतील असे अजूनही वाटते. मी व्यक्तिशः त्यांना २५ वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या पीएकडून ते मिटींगमध्ये आहेत. असेच उत्तर मिळाले. अपेक्षा होतील ते येतील पण ते आले नाहीत.

एकूणातच समारोपाच्या कार्यक्रमात खुद्द मेहेंदळे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळू शकले नाही हा माझा नव्हे, तर नाट्य परिषदेचा अपमान होता. त्याला सकारात्मक उत्तर म्हणून हे संमेलन आम्ही हे संमेलन यशस्वी केले., असे म्हटले आहे.

एकूणातच हा सारा मेंहेंदळे यांचा हट्ट होता असे दिसते. ते त्यांनी का केले याला उत्तरच त्यांनाच दिले आहे. पुण्यातल्या योगेश सोमण, सुनिल महाजन, प्रकाश पायगुडे आणि प्रकाश यादव आणि एक सातारच्या शिरीष चिटणीस यांच्या मदतीने हा सुवर्णमहोत्सवी नाट्यसंमेलनाचा घाट घातला. बालगंधर्वाच्या तीन दिवसांचे पालेकेचे भाडे वाया घालविले आणि एक नाट्यक्षेत्रात वेगळाच पायंडा पाडण्याचे काम केले आहे.
यातून काय सिध्द झाले ते काळ ठरवेल. पण हा सारा खटाटोप दुस-यांना नावे ठेवत स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी केलेला खेळ होता. याची दखल आणि यातून नेमके साय साधले ते आपोआपच कळेल. पण जे घडले ते फार समाधान कारक नव्हतेच पण पोरखेळ होता असे मेंहेंदळे यांचा चाहता असूनही क्लेषाने म्हणावेसे वाटते. यातून कुणाला वाईट वाटले असले तर मी क्षमा मागतो. पण जे झाले, दिसले ते फार काही चांगले नव्हते.....



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

Thursday, September 30, 2010

रामाचाही विजय... राष्ट्रीय एकतेचे उदाहरण.



राम मंदिराचा प्रक्ष आज तरी निकाली लागला. आणि धुसर असलेल्या वातावरणात थोडी चैतन्याची जाग आली.

काही काळाचे तणावाचे वातावरण पुण्यात होते .

शाळा, महाविद्यालये अर्ध्यावर बंदच होती. दुपारी दोन पासूनच सारे वातावरण तंग होऊ पहात होते.

रस्त्यात सगळीकडेच शुकशकाट होता. मंडई, आप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता, डेक्कन सारीकडे दुकान दारांनी दुकाने अर्ध्यावर उघडलेली तर काहींनी ती कुलूपबंद करून ठेवली होती. शहरात पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या.


गुरूवारी दुपारपासूनच सारे रस्ते थंड पडले होते. गि-हाईकेच नाहीत त्यामुळे तुळशीबागेतले विक्रेत्यांनी आपापला माल बांधून बंदचे वातावरण निर्माण केले होते.


नेहमी वर्दळीची असणारी भोरी आळी ठप्प दिसत होती.
सोन्यामारूती चौकात वाहनांची संख्या नगण्य होती.

एकूणच. वातावरणाने प्रश्राची गंभीरता आपल्याला सांगितली होती.


आता ह्या वादाची मर्यादा सर्वांनीच ओळखली आहे. राष्ट्रीय स्वरूपात रामाची ओळख दर्शविणारे मंदिर आणि मुस्लीमांची मशीद दोनही स्वतंत्र जागेत उभे राहून राष्ट्रीय एकतेचे प्रतिक.. विश्र्वबंधुत्वाचे नाते जगासमोर आदर्श म्हणून ठेवता येईल.

काय होणार आज??????????



नाही तरी आज सारे थोडे धास्तावले आहेत. शाळा बंद तर काही अर्ध्यावर सोडणार आहेत. जागेजागी पोलिसांनी डेरा मांडलाय.

पंतप्रधांनांनी सर्व वृत्तपत्रातून नागरीकांना शांततेचे आवाहन केले आहे. आय टी सेक्टर बंद असल्यातच जमा आहे.


रस्त्यावर शांतता नांदणार आहे. सा-यांच्या मनात धुसर भिती आहे.



आता काय होणार.



फेस बुकवर आज काय होणार याच्याच चर्चेंला प्रतिसाद वाढतोय . वृत्तपत्रांच्या ई आवृत्त्या सर्तकपणे बातमीवर लक्ष ठेऊन आहेत.



एकूणच वातावरण तयार तर झाले आहे.


आता प्रतिक्ष आहे. निकालाची.

विविध धर्माच्या, पक्षांच्या नेत्यांनी अनुयायींना शांततेचे वातावरण ठेवण्याचे आवाहन केले आहेच.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देशातील जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. ट्विटर त्यांनी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हे आवाहन केले आहे.

अयोध्या निकालाच्या बातम्यांनी सर्व न्यूज चॅनल ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लतादिदींनी ट्विट करताना म्हटले, अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम सबको सन्मती दे भगवान... तसेच त्यांनी याला या गाण्याची लिंक सुद्धा जोडली आहे.



काहीतरी होणार....नेमके काय होणार... एकदा निकाल लागू द्या..मग बोलूयात.....


अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या मालकीसंबंधीच्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर एकगठ्ठा (बल्क)
एसएमएस व एमएमएसवर घालण्यात आलेली बंदी उद्यापर्यंत (शुक्रवार) वाढविण्यात आली आहे.

आत्ता तरी वावारणात गूढ शांतता आहे.....


याविषयीचा एक ब्लॉग आजच वाचनात आले ते मुद्दाम तेत आहे.


अयोध्या: राम-जन्मभूमि या हिन्दू-मुस्लिम दंगों की नींव?

इधर राष्ट्रमंडल खेलों के साथ-साथ देश में अगर किसी चीज़ ने सुर्खियाँ बटोरी है तो वो अयोध्या है. बहुचर्चित अयोध्या मामले में पिछले 60 साल पुराने केस का निर्णय न्यायालय में आज दिन के 3 .30 बजे आने वाला है. 24 तारीख को ही आने वाला ये निर्णय सर्वोच्च न्यायलय के हस्तक्षेप के बाद लंबित होकर अंततः आज आने वाला है. एक बार फिर वो सारी तय्यरियाँ की जा रही हैं जो सब 24 तारीख को आने वाले उस तथाकथित तूफ़ान के लिए की गयीं थी. हालांकि इस निर्णय का कोई व्यापक असर नहीं होने वाला क्यूंकि मामले का सर्वोच्च नयायालय में जाना तय है मगर फिर भी, किसी अनहोनी घटना से पूर्णतया इनकार नहीं किया जा सकता और इसीलिए, असाधारण सुरक्षा इन्तजाम किये जा रहे हैं.
इस अयोध्या मामले ने कहीं न कहीं मुझे भी ख़ासा प्रभावित किया है. जब इसके दोनों संभव फैसलों के बारे में सोचता हूँ तो पाता हूँ कि फैसला जिसके भी पक्ष में जाए हार तो भारत की ही होनी है. अगर फैसला वहां पर मंदिर बनाने का आता है तो सवाल भारत की साम्प्रदायिकता पर उठेंगे कि अपने आप को सेकुलर कहने वाले हिंदुस्तान में इतना बड़ा फैसला हिन्दुओं के पक्ष में कर दिया गया. अगर फैसला मस्जिद बनाने का आता है तो फिर सवाल भारतीय राजनीति पर उठेंगे कि मुस्लिम वोट बैंक को बचाने के लिए ये फैसला उनके पक्ष में कर दिया गया. कुछ भी हो, भारतीय न्याय व्यवस्था शायद इससे पहले इस तरह के सवालों से कभी नहीं घिरी थी. न्यायपालिका पर सवाल उठना अब अपरिहार्य हो चला है.
फैसला कुछ भी आये, फर्क तो हम सब पर जरूर पड़ेगा, ज्यादा नहीं तो थोडा ही सही. आने वाले इस निर्णय और उसके परिणाम की कल्पना करता हूँ और, झूठ नहीं कहूँगा, मन एक बार सिहर जरूर जाता है. डर लग जाता है कि कहीं बम्बई और गुजरात की पुनरावृत्ति न हो जाए. इस डर के साथ जब पूरे मामले को खंगालना शुरू करता हूँ तो यही सवाल मन में बार बार दस्तक देते हैं. आखिर ये अयोध्या क्या है? क्या है इसका मतलब मेरी पीढ़ी के लिए? पूरे अयोध्या काण्ड में मेरी पीढ़ी खुद को कहाँ देखती है?
1947 में भारत के साथ भारत में एक अजीब सी आग ने जन्म लिया था. बंटवारे की उस आग में अपनी आज़ादी को भूल कर न जाने कितने मतवाले हिंदवासी रातों रात 'हिन्दू' और 'मुस्लिम' बन गए थे. एक ऐसी ज्वाला भड़की थी जिसकी लपटों ने हिन्दू-मुस्लिम दंगों की शक्ल लेकर न जाने कितनी जानें ली थी. न जाने कितनी जिंदगियां बर्बाद हुई थी, न जाने कितने परिवार उजड़े थे. उस आग की गर्मी में झुलसता हुआ भारत, फिर भी, अपनी आज़ादी को पाकर आगे बढ़ने के लिए प्रतिबद्ध था. समय के साथ भारत जवान होता गया. नयी पीढ़ियों ने पुरानी पीढ़ी का स्थान लेना शुरू किया. बंटवारे के दंश को झेलने वाली उस पीढ़ी के साथ हिन्दू-मुस्लिम की वो आग भी धीरे धीरे मद्धिम पड़ गयी. अगर दिसंबर '92 न हुआ होता तो शायद मेरी पीढ़ी तक आते आते कोई कभी धर्म की बंदिशों को अपने विकास के रास्ते में रोड़ा नही बनने देता. मगर दिसंबर '92 हुआ और हम सब जानते हैं कि फिर क्या क्या हुआ. राम के नाम पर न जाने क्या क्या घिनौने खेल खेले गए पूरे देश में. जब यह सब हुआ था तब सिर्फ 5 साल का था. सच पूछिए तो ख़ुशी होती है कि सिर्फ 5 साल का ही था, कम से कम मैंने जो भी जाना वो सिर्फ अखबारों में पढ़ा या टीवी पर देखा. उस समय की कोई भी याद मेरे ज़हन में नहीं है. और इस बात के लिए शुक्रगुजार हूँ अपनी उम्र का कि मुझे कुछ नही याद. मेरे लिए तो अयोध्या का सिर्फ एक ही मतलब बनता है. उस बुझती हुई आग की लपटों को फूँक मार कर फिर जिंदा कर देना जो आग बंटवारे के वक़्त सब के सीनों में लगी थी.
राम के नाम पर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और विश्व हिन्दू परिषद् ने जिस तरह का काम किया है शायद उसी का कारण है कि हिन्दू होने के बावजूद दिल से कभी इन दोनों से नहीं जुड़ पाया हूँ. हम उस देश में रहते हैं जहां 'जय राम जी की' का इस्तमाल अभिवादन के लिए आता है. हिन्दू हो या मुस्लमान, हर कोई इसे नमस्ते या सलाम के रूप में इस्तेमाल करता है. इसी 'जय राम जी की' उद्घोष के साथ जिस तरह पूरे भारत में सांप्रदायिक दंगों की नींव रखी गयी उससे आज मन में इन शब्दों के लिए भी भिनक पैदा हो गयी है. जिस 'राम-राज' को लाने की बात RSS और VHP करते हैं, वही 'राम-राज' कब 'राम-राजनीति' बन गया, कभी पता ही नहीं चला. अपने राज दरबार में सीता, लक्ष्मण और हनुमान संग बैठे मर्यादा-पुरुषोत्तम राम की तस्वीर कब धनुष उठाये प्रचंड राम में बदल गयी इसका कोई अंदाजा ही नहीं लग सका. कार-सेवा के नाम पर जो कलंक राम की नगरी अयोध्या पर चढ़ गया उस कलंक से छुटकारा पाने की कोई स्थिति मुझे तो नज़र नहीं आती. अपने राजनीतिक फायदे के लिए सभी पार्टियों ने मिलकर जो कुछ किया वो दिल को दुखा देने के लिए काफी है.
अयोध्या की उस ज़मीन का विवाद सदियों पुराना है. न्यायालय तक यह विवाद 60 साल पहले पंहुचा, जब मैं क्या मेरे पिताजी ने भी जन्म नहीं लिया था. इतने समय से जिस निर्णय का इंतज़ार हो उसके लिए उत्सुकता तो मन में रहेगी ही. पता नहीं क्या निर्णय आने वाला है. यथार्थ से दूर देखें तो जी चाहता है कि उस ज़मीन पर ऐसा कुछ बने जो समाज के लिए एक प्रतीक हो, एक उपहार हो. कोई स्कूल बन जाए, कोई अस्पताल बन जाए या कुछ भी. मगर क्या अपने फायदे के लिए मस्जिद तक को गिरा देने वाले इतने से शांत हो जायेंगे. फिर विवाद उठेगा कि अस्पताल का नाम श्री राम अस्पताल रखा जाए या बाबरी हॉस्पिटल. काम करने वाले हिन्दू हों या मुसलमान और न जाने क्या क्या. जब तक फायदा उठाने वाले ये राजनीतिक दल मौजूद रहेंगे तब तक इस विवाद का कोई हल संभव नहीं है. या यूँ कहें कि जब तक इन राजनीतिक दलों के बहकावे में आने के लिए हम तैयार रहेंगे तब तक इसका कोई हल नहीं.
अज दिन में क्या निर्णय आने वाला है इसे भविष्य के गर्भ में ही छुपा छोड़ देते हैं मगर फिर भी, दिल सोचने को मजबूर हो ही जाता है कि उसके बाद क्या होगा. इस बार कहाँ कहाँ दंगे भड़केंगे और कितने लोग बेमौत मारे जायेंगे. एक मन करता है कि कभी ये फैसला आता ही नहीं तो कितना अच्छा होता. मगर काल्पनिक दुनिया से निकल कर हकीकत को देखता हूँ तो लगता है कि ये एक ऐसा तूफ़ान है जो आज नहीं तो कल भारत को झेलना ही है. कभी न कभी तो ये निर्णय आएगा ही. कई लोग आपसी सुलह की वकालत कर रहे हैं. अगर किसी सूरत में ये संभव हो तो सच में स्वागत है इसका मगर फिर, जब बात यथार्थ की आती है तो सब कुछ खोखला ढकोसला लगने लगता है. जिस सुलह की गुंजाईश पिछले 60 सालों में नहीं बन पायी वो अब क्या बनेगी. हाँ इतना जरूर सोचता हूँ कि ये जो आपसी सुलह की वकालत कर रहे हैं, ये यदि इतने जागरूक और परिपक्व हैं तो फिर निर्णय के बाद किसी अनहोनी की बात ही कहाँ उठती है. यही तो वो लोग हैं जिनसे हमें डर है कि न जाने अपने फायदे के लिए निर्णय के बाद क्या क्या गुल खिलाएंगे.
हिन्दू हूँ और इसलिए ये नहीं कहूँगा कि निर्णय में मंदिर बनाने की बात यदि आती है तो मन में ख़ुशी नहीं होगी. खुश जरूर होऊंगा ऐसी सूरत में. मगर, यदि ये राम मंदिर खून से सने पत्थरों की नींव पर बनायीं जाती है तो मैं इसके पक्ष में नहीं हूँ. निर्णय में जो कुछ भी हो, बस इतना चाहता हूँ कि देश को '93 की बम्बई और '02 का गुजरात फिर न देखना पड़े.


ANSHUMAN AASHU
Patna, Bihar, India
http://draashu.blogspot.com/2010/09/blog-post_30.html

Monday, September 27, 2010

भरारी थर्माकोलच्या रामदास माने यांची



खरं तर याला आता दोन-तीन महिने उलटले. मात्र आता आठवू म्हणताना ते क्षण अजूनही स्पष्ट दिसतात.
जेव्हा डीएस कुलकर्णी यांच्या साठीच्या समारंभात सातारकडच्या उद्योजकाचा डिएसके सेल्फ मेड मॅन हा पहिला एक लाखाचा पुरस्कार पुण्याजवळच्या भोसरीतल्या रामदास माने यांना मिळाला तो क्षण.


सूटा बूटातल्या रामदास माने यांनी आपली भरारी ऐकविली...तीही अगदी सातारी शैलीत.... तेव्हाच रामदास माने यांना
भेटण्याचे ठरविले...आणि तो योग आला....



भोसरीतल्या टाटा मोटर्सच्या जवळच्या एमआयडीसीच्या माने इलेक्ट्रीकल्सच्या युनिटमधये प्रवेश केल्यावर तुम्ही थर्माकोलच्या दुनियेत हरखून जाता.
साबुदाणासारख्या शूभ्र दाणेदार पण हलक्या गोळ्यातून इतके जड भासणारे आणि पाण्यात न विरघळणारे . उन्हाळ्यात थंडावा आणणारे आणि थंडीत न तापणारे थर्माकोलचे चौकेनी खांब पाहिले की अजब वाटते. स्वतः या कंपनीवे संचालक रामदास माने यांचे हे विश्व काही वेगळे आहे याची जाणीव होते.

दाण्यातून पाणी आणि हवेच्या प्रेशरमुळे तयार होणा-या भिंतीतून बाहेर पडलेल्या या शुभ्र अशा थर्माकोलच्या ठोकळ्यांच्या सहाय्याने विविध उपयोगी वस्तूंची निर्मिती पाहिली. घर बांधणासाठी तयार होणा-या कमी किंमतीतल्या वीटा पाहल्या आणि या विटा आणि माफक सिमेटच्या मदतीने केलेले घर आणि शौचालये पाहिले की असे घर असताना आपण त्यासाठी किती पैसा आणि वेळ वाया घालवितो ते नजरेत येते.
अधुनिक थर्माकोलच्या सहाय्याने चार तासात घर आणि कुठेही हलविले जाणारे हलके आणि कित्येक वर्ष टिकणारे शौचालय. दोघांचीही उपयुक्तता कळते.

ही मशिनरी तयार तर माने यांनी केलीच पण ती मशिनरी अनेक देशात पाठवून या इको फ्रेंडली पध्दतीच्या निर्मितीचा प्रचार आणि प्रसारही केला. लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये जगातले सर्वात मोठे मशिन बनविणारी कंपनीचे नावही झळकले.

४५ देशात मानेच्या कंपनीने बनविलेली मशीन ह्या अनोख्या कामगीरीचा लाभ घेत आहेत.


आज थर्माकोलचे नाव घेतले की रामदास मानेंचे नाव येतेच. ते माने या उद्योजकांच्या यादीत आले खरे पण त्यासाठी त्यांची यशोगाथा त्यांच्या खास सातारी शैलीत ऐकायलाच हवी.


सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या लोधवडे गावी घरच्या गरीबीतही शिक्षणासाठी राजगार हमीच्या कामावर रोजंदारी करणारा हा उद्योजक.. एक पत्र्याची पेटीत मावेल तेवढे सामान घेऊन सातारला आय यी आयला वायरमनचे काम शिकण्यासाठी आला. दिवसा शिक्षण आणि रात्री सातारा एस टी स्टॅंडवरच्या कॅन्टीन मध्ये काम असे दिवस काढून या परिक्षेत पहिला येतो काय? पुण्याच्या महिंद्र कंपनीत दाखल होतो काय आणि इंजिनियर बनण्याचे स्वप्न ठेउन स्वतःची माने इलेक्ट्रिकल्स ही कंपनी उभी काय करतो.... सारेच अजब आणि धाडसी....


जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज रामदास माने या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविला आहे.


अनेक पुरस्काराने स्न्मानित झालेत. बांधकामाच्या क्षेत्रातल्या थर्माकोलच्या वीटांच्या मागणीसाठी डीएसके, कुमार अशा बांधकाम व्यवसायातल्या वजनदार नावात स्वतःची छाप पाडून बांधकामाचा खर्च कमीकरणारा हा व्यवसाय नावारूपाला आणला.

समाजाचे देणे अंशतः देणे लागतो या न्यायाने लोघवडे गावाचा विकास केला. वारक-यांना कमीत कमी किमतीत शौचालये उपलब्ध करून दिली.

वीस रूपयांच्या बळावर पुण्यात दाखल झालेल्या या रामदास मानेंचे उद्योजक म्हणून स्वप्न साकारलेले ज्यांनी अनुभवले ते तर सुखावतीलच पण आजच्या व्यवसायात येऊ पाहणा-या तरूणांनाही हा आदर्श नवी भरारी घेण्यासाठी उपयोगी पडणारा आहे.



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276


ते स्वतःची वाटचाल सांगताहेत त्यातून अधिक माहिती मिळेलच....

Wednesday, September 22, 2010

पुणे गणेश विसर्जन सोहळा



सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रसिध्द असलेल्या पुणे शहरात बुधवारी पुण्याचे पालक मंत्री, पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते मंडईतल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुण्याते ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची पुजा होऊन ठिक साडेदहाच्या सुमारास गणपती विसर्जन मिरवणुकीला आरंभ झाला.


मंडई परिसरात एकत्रित आलेल्या तांबडी जोगेश्र्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीच्या गणपतीला अजित पवार आणि महापौरांनी मानाचा पुष्पहार अर्पण केला. पहिले चार गणपती लक्ष्मी रस्त्याने जाणार आहेत. तर टिळकांच्या केसरी वाड्याच्या गणपतीची मिरवणुक टिळक रस्त्याने जाणार आहे.


मंडईतून सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक दुपारी साडेबारपर्यत बेलबाग चौकापर्यत आलेली होती.

रांगोळीच्या पायघड्या घालून गणेश मंडलांचे स्वागत तर होत होतेच. पण यंदा विसर्जन मिरनणुकीत परदेशी विद्यार्थी, पर्यटक अधिक संख्येने दिसत आहेत.


उल्हास पवार, मोहन जोशी, गिरीश बापट, निलम गोरे, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, रोहित टिळक यांच्यासाह अनेक राजकीय नेते निरवणुकीत सामिल झालेले दिसतात. या उत्साहात महिलावर्गही बहुसंख्येने सहभागी झालेला दिसतो. नगारा बॅंड पथके आणि ढोल-ताशांच्य पथकांच्या तालावर अनेक जण या मिरवणुकीच्या आनंदात मिसळुन गेल्याचे चित्र दिसत आहे.

मानाच्या गणपतीच्या समोर गुलालाची उधळण होत नसल्याने बहुसंख्य नागरीकांनी संतोष व्यक्त केला. भक्तिमय वातावरणाने भारलेला लक्षमी रस्ता हा बुधवारी पुर्णपणे गणेशमय झालेला आहे.
यंदा विशेषतः गर्दीतही आपल्या मोबाईल कॅमेरात ह्या विसर्जन मिरवणुकीत क्षण टिपण्यासाठी सरसावलेले दिसतात.

यंदा स्वाईन फ्लू आणि जर्मन बेकरीच्या स्फोट या पार्श्वभूमिवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.पोलिसांची विविध पथके कार्यरत असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


हळूहळू मिरवणूक पुढे सरकत जाईल तसा जोश आणि उत्साहाला अधिक भरती येईल. कितीही मानवनि्र्मित संकटे आली तरी भक्तिच्या या शक्तित कमतरता भासत नाही उलट त्यात दिवसेंदिवस वाढ होतानाच जाणवत आहे.

यंदाचा गा गणेश विसर्जन सोहळा लवकर संपावा आशी अपेक्षा आहे. उद्या बाबरी मस्जीद खटल्याचा निकाल आहे यामुळे पोलिसांची वाढती कुमक पुण्यात दाखल झालेली आहे.

Tuesday, September 21, 2010

आता वेध मिरवणुकीचे..धूम संपत आली




मंगळवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मांडवात सत्यनारायणाची पूजा घातली जात आहे. तरी पाहणारे भक्तांची संख्या फारशा कमी झालेली नाही. एकच झाले. शनिवार रविवारच्या तुलनेत मात्र ही संख्या कमी आहे. आज दुपारी पडलेल्या पावसाच्या सरींनी गणेश मंडळांच्या मिरवणूकीच्या कामावर थोडा परिणाम जाणवेल. पण एके वर्षी गणेशोत्वसाच्या अखेरपर्यत वरूणराजा बरसत होता तरीही भक्तांचा सागर आटला नव्हता.

समजा बुधवारी पावसाने आपली हजेरी लावली तरी नाद सुरूच राहणार.. ढोल-ताशांचे फड वाजतच रहाणार... नागरीकांची पावले लक्ष्मी रस्त्याकडे वळणारच.







माती गणपती मंडळ नारायण पेठेत रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. रांगोळीतील रेखीवपणा आणि कल्पकता तुम्हीच अनुभवा.
माती गणपती मंडळाची मूर्ती शांत..तिथे कुठलाही भपका नाही. पुरेसा लाईट आणि भक्तिमय संगीताना वातावरणही बदलून जाते.



भारती विद्यापीठाच्या नवी पेठेतल्या चौकातल्या नागनाथ अचानक मित्र मंडळाने सादर केलेला पौराणिक देखावाही लक्ष वेधून घेणारा आहे.



शनिवारातल्या वीर हुनुमाच्या श्रीराम भक्तीची कथा हलत्या आणि भव्य अशा देखाव्यातून साकारली गेली आहे. यात राम भक्ती आणि राष्ट्रभक्ती यांचा मेळ घातला आहे.

वीर तालीम मंडळाची गणेश मूर्तीच्या हातात गदा आहे. तीही लक्ष वेधून घेते.

या उलट दही हंडीची धूम साकारली ती कर्वे रोडवरच्या पाडळे पॅलेसच्या चौकातल्या नागनाथ तरूण मंडळांच्या हलत्या देखाव्याने. मुंबईतल्या चाळीची आणि गोविंदा पथकाची एकत्रीत प्रतिकृतीतून सिध्द झाली... साकारली गेली ती दही हंडी.



पुणे शहरात अनेक कल्पक देखावे नटले आहेत. मात्र सारेच दाखविण्याचा अट्टाहास यावेळी केला नाही.

मात्र जे देखावे आणि सजावटी दाखविल्या त्या आवडल्या असाव्यात असा तर्क आहे.....

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, September 20, 2010

विंचूरकर वाडा जतन व्हायला हवा


एके काळी ज्या विंचूरकरवाड्याला गायकवाड वाड्याइतकेच महत्व होते. १८९४ साळी सरदार विंचूरकरांच्या या वाड्यातच लोकमान्य टिळकांनी पहिला सार्वजनिक गणपती बसवला. यालाच एकेकाळी 'लॉ क्लासचा गणपती' म्हटले जायचे. आज हा वाडा शेवटच्या घटका मोजत आहे. या वास्तूचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेता ह्या वाड्याचा काही भाग जतन केला जावा अशी मागणी केली जात आहे.

लोकमन्यांच्या केसरीचे पहिले कार्यालय या वाड्यात होते. आजही ते ज्या भूयाराखाली बसून अग्रलेख लिहीत तेही याच खोलीत पाहता येते.१९९२ मध्ये स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक याच वाड्यात दहा दिवस एकत्र राहत होते. आणि पहिला गणपती याच वाड्यात बसविला गेला.अशा तिनही ऐतिहासिक घटनेचा साक्षिदार असलेला हा सरदार विंचूरकरांचा वाडा आज विंचूरकरांचे नातेवाईक दाणी यांनी विकायला काढला आहे.
राज्य आणि केंद्र सरकारकडे ह्या वाड्याच्या महत्वाबद्दल अनेक पत्रोत्तरे केली. जयंतराव टिळकांनीही हा वाडा पुरातन विभागाच्या ताब्यात यावा यासाठी प्रयत्न केले. पण सरकार कडून कोणतीही हालचाल झालेली नाही.
लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट,पुणे यांचे मार्फत गणपतीत दहा दिवस वाड्याचा तो ऐतिहासिक मजला गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या कामासाठी वापरला जातो.

खालच्या मजल्यावर बाळासाहेव भारदे यांचा सहकारी ग्रामोद्योग संघ आणि केसरीच्या त्या कार्यालयात महाराषट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे काम चालते.
या वाड्यातल्या गणेशोत्सवात एके काळी ह.भ. पांगारकर, प्रो. जिनतीवाले, शिवरामपंत परांजपे, तात्यासाहेब केळकर, कृष्णाजीपंत खाडीलकर, चिंतामणराव वैद्य, वि.ग.भानू इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली आहेत. आजही इथे गणेशोत्सव साजरा केला जातो. पण कुणाच्याही पैशाची अपेक्षा न करता.

या मूर्तीचे वेगळेपण आणि या वास्तूचे महत्व लक्षात घेता भाविकांनी आणि इतिहासाच्या अभ्यासकांनी या वाड्याविषयीचे प्रेम कायम ठेऊन असा ऐतिहासिक ठेवा जपावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

सुभाष इनमादार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, September 19, 2010

रस्ते ओसंडताहेत,मंडळे ...घरेही..


गणपती बघायाला निघाले की कळते या उत्सवात कुणाला रोजगार मिळतो. कुणाची हीच मोठी कमाई असते. किती सामान्यांना यातून आपल्या कला दाखविण्याची संधी मिळते.
यंदा तर हा उत्सव बारा दिवसांचा आहे. मंडप डेकोरेशन. सजावट. सुरक्षा, स्वयंसेवक, पोलिस, वाहतूक व्यवस्था. सा-यांची या एका गणपती उत्सवासाठी धावपळ सुरू असते.
गर्दीत तुम्ही सहज समाविष्ट होता. चालताना पाय दुखत नाहीत. मुले आनंद घेतात. वडीलधारी मंडळींच्या सूचना धुडकावून ती धावत असतात. मग धावपळ सुरू ङोते. सारेच यात घडते.
हा उत्साह कुठून येतो. त्यातून बाहेर पडून घरी आल्यावर पाय बोलू लागतात. पण यात सामिल झाल्यावरच यातला आनंद कळतो.


गल्ली-बोळात दर एक मंडळ स्वतःचे वेळेपण जपण्याचा प्रयत्न करीत असते. कुणी फुलांचे. तर कुणी केवळ सुंदर महिरप बनवून आरास करतो. कुठल्या मंडपात केवळ प्रसन्न वातावरण मोहवून टाकते. तर कुठे एकादे छोटे कारंजे प्रकाशमान झालेले असते. असे असंख्य वेगळेपण गणपती पाहताना . त्यांची अरास पाहताना दिसते ..
तीच आज एकत्रीतपणे आम्ही दाखविणार आहोत.


घरीसुध्दा अनेक हौसेने गणपतीची अशी सजावट करतात की पाहताना त्यांच्याही कलात्मकतेला दाद द्यावी.
त्यापैकीच आनंदनगरचा हा अमोल देशपांडे. इंजिनियरींगचा विद्यार्थी पण गणपती घरी बसवायचे म्हटले की कांही तरी स्वतःचे वेगळेपण दाखविण्याचा दरवर्षीचा त्याचा प्रयत्न असतो. यंदा शंकर पार्वती गणपतीसाठी कैलासाची निर्मिती केली आहे.
चला तोही आनंद घेउयात.




सुभाष इनामदार ,पुणे.


subhashinamdar@gmail.com
9552596276