Tuesday, July 6, 2010

पालखीच्या संगे रंगले रूप, नाद झाला तो टाळांचा


संताचा मेळा जमला भूवरी . दाटूनीया नभ उतरे सत्वरी
वर्णाया मज नाही शब्द बापूडे, धावे मन माझे तुज चरणाशी

कालपासून भावीकांनी पुणे शहर बहरून गेलेय. भक्तिचा मळा खरा फुलला तो आज.
धन्य ती माऊली आली दर्शनाला
तुकयांच्या भक्तिने तृत्पावली

काल रात्री तुकाराम महाराच्या पालखीचे आगमन झाले. वारक-यांची भगवी पताका पुण्यात रोवली गेली. आपले दैनंदिन व्यावहार सांभाळत. वाहतुकीची कोंडी सोडवत तो भक्तिच्या या वातावरणात रंगून गेलाय. खरोखरीच वातावरण बदललय. संत परंपरेचे दोन महान संत आजही लोकांच्या मनाला स्पर्श करताहेत. हे किती विरळे.

काळ बदलला. सवयी बदलल्या. भावना ओथंबल्या. आक्रसल्या. पण ही संतांची शिकवण. त्यांचे विचार आजही कायम राहिलेत.
आज संत ज्ञानंश्वरांची पालखी पुण्यात आली मात्र पुणे शहराचा प्रत्येक भाग चैतन्यमय बनून गेला.

मंदिर, धर्मशाळा, व्यापा-यांची गोदामे इतकेच काय रस्त्यावरचे फुटपाथही भरून गेलेत. विविध सार्वजनिक संस्था, सामाजिक संस्था , राजकीय कार्यतर्तें सारेच माऊलींच्या भक्तांसाठी सेवा देत आहेत.
पालखीच्या दिंड्यावर नजर टाकली तर खरेच अबाल वृध्द, तरूण, महिला, युवक वर्ग साराच एकवटला आहे.
इथली जात एकच भागवत भक्तिची.
नाळ कुठे जुळली असेल तर ती वि्ठ्ठल नामाशी
चौका-चौकात नाद ऐकू येतो तो अभंगाचा....
अशा या वातावरणात दोन दिवस पुण्याला संतांच्या परंपरेचे जतन करण्याचे सामर्थ्य मिळाले आहे. हा समृध्द परंपरेचा वारसा पुढच्या पिढीपर्यत नेण्याची तळमळ दिसून येत आहे.

दाटी झाली नगरीत
उरी उरलो सत्वरीत
तेणे भक्तिचा साकरू
सर्व रूपे आकारू



सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: