Saturday, July 10, 2010

पोएट बोरकर....


शब्दांच्या वैभवाने नटलेल्या झाडासारखे विस्तिर्ण मन. त्यात रसिला प्रेमळता झिरपणारी. तेवढाच भावनांचा आविष्कार..मखमली शब्दांनीच फुलावणारी ती तर एक वरवरची नाही तर खोलवर रूतणारी .
गोवा हा तर त्यांच्या कविमनाला भूर घालणारा.. पुण्या-मुंबईत असले तरी माडांच्या स्वप्नांची दाटी येते ती त्या गोव्यातल्या भूमितली.
पुण्यातला एखादा माड पाहिला की त्यांना त्याची कीव यायाची.
माडा-पोफळीच्या धुंदीत विसावलेला. पावसाच्या सरींचे दर्शन देणारा हा कवी सॉरी पोएट बोरकर....
आकाशवाणीच्या चार भिंतीतही स्वतःचे अस्तित्व कायम ठेऊन आपल्याच मस्तीत आणि गुंगीत जगणारे बा भ. बोरकर.
त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुरूवारी ८ जुलै २०१० या 'बाकीबाब' च्या जुन्या आठवांना उजाळा देतानाच त्यांच्या प्रतिभेला सलाम करावा आणि त्या स्मृती उजळ कराव्यात म्हणून आम्ही गोयंकर, विवेक व्यासपीठ आणि संवाद या संस्थांनी ' जिणे गंगौघाचे पाणी' या कार्यक्रमातून विस्मरणात गेलेल्या काव्याला . गीतांना आणि शब्दांना बाहेर काढले. पुन्हा एकदा त्या शब्दांवर बा. भ बोरकरांची मोहोर कायम केली.
नाट्यासंमेलनाचे अध्यक्ष रामदास कामत यांची पदे. निशा पारसनीसांचे अभंग. अरूणा ढेरेंची बोरकर उलगडून सांगणारी शब्दमैफल. साराच योग जुळून आला.
त्यातही बोरकरांच्या ' ज्ञानदेव गेले तेव्हा ` कवीतेमधून चित्रकार सुहास बहुलकरांना काय जाणवले यांचे रंगमंचावर उजळ केलेले चित्रही एक वेगळा आविष्कार घडवून गेला.
उत्तरा मोने आणि प्रमोद बापट यांनी निवेदनातून बोरकरांच्या प्रतिभेचे एकेक पैलू उलगडत, बिंबवत नेले.

संदीप खरेंनी बोरकरांच्या तीन कवीतांचे सादरीकरण करताना बोरकरांच्या प्रतिभेला हॅट्स् ऑफ केले.
सलील कुलकर्णींच्या सूरांनी बोरकर काव्य ऐकण्यातली मजा आणखी चाखायची मदत केली. अनुराधा मराठेच्या आवाजाची जादूही त्यातूनच अनुभवता आली.

सारेच त्या एका महान कवीसाठी .....बा.भ. बोरकर...



-सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, July 7, 2010

भक्तिचा हा सागर ...


टाळांच्या नादाने . वारकरी पंथाच्या अभंगाने. भुरळ पडते. हरपून जातो.
पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील एका दिंडीत आजही मी मनाने आहे.
वारकरी पंथांचे भजन चालता-चालता ते गात होते. काय सूर होता खडा. काय नाद होता . संथ ..तरीही टाळांच्या एकेक लडीतून नादांची आवतरणे कानात घुमत होती. मृदुंगाच्या तालाची लय अजून ठेका धरत आहे. गाण्याची उत्तम तयारी . शिष्यांकडून तेवढीच तयारीची खात्री. गरु शिष्याची ही वीण इथेही होती. . सारेच. साठवून मी मनातही तो अभंग आजही गात आहे. शब्द होते.' केली बहूत पर निंदा....'.
पालख्यांच्या गर्दीत ती दडून गेली तरीही त्याचा सूर आजही हाळी घालतोय .

कोकण म्हणू नका. लातूर म्हणू नका.
नाव घ्याल ते गांव इथ हजर .

रस्ता अडनूवच वारकरी शनिवार वाडा ते मंडई परिसरात दाटी करून मनसोक्त हिंडत होते. कधी नुसतेच तर कुणा भजनाच्या नादात.
कुणी चहा देते. तर कोणी बिस्कीटांचा पुडा. दिंडीत सामवलेल्या वारक-यांच्या मुखात कांही जावे यासाठी अगदी बोलावून , वाट अडवून खाणे-पिणे देण्यासाठी व्यापारी वर्ग उत्सुक होता.
जो लक्ष्मी रस्ता तुकाराम महाराज पालखीच्या काळात अबोल झाला होता तो वारक-यांच्या हालचालीने जिवंत- चैतन्यमय बनला होता.
फुटपाथवर चहा देणारा मुलगाही आधी गरम चहा घ्या म्हणजे अभंग म्हणायला हुरूप येईल हे सांगत होता.
मग काय एका भक्तिंच्या साधकांनी टाळ-मृदंगावर मारली थाप आणि सुरू केला अभंग . अगदी दहा मिनिटे. ते गात होते. वारकरी ठेक्यातली मजा सारेच अनुभवत होतो.' पंढरी नामाचा बाजार...' ताला ठेक्यात नामाचे उच्चारण सुरू होते.

पालख्यांच्या मुक्कामीपणाने भक्तिचा हा सागर भावाच्या लहरींवर झुलत होता.
हे सारे शब्दात सांगणे अवघड. ते अनुभवण्यासाठी एकदा पुण्यात येवूनच ते याची डोळ पहा.. साठवा आणि भक्तिच्या शक्तिचा उत्साह जीवनात साठवून ठेवा.


सुभाष इनामदार, पुणे.


subhashinamdar@gmail.com

9552596276

Tuesday, July 6, 2010

पालखीच्या संगे रंगले रूप, नाद झाला तो टाळांचा


संताचा मेळा जमला भूवरी . दाटूनीया नभ उतरे सत्वरी
वर्णाया मज नाही शब्द बापूडे, धावे मन माझे तुज चरणाशी

कालपासून भावीकांनी पुणे शहर बहरून गेलेय. भक्तिचा मळा खरा फुलला तो आज.
धन्य ती माऊली आली दर्शनाला
तुकयांच्या भक्तिने तृत्पावली

काल रात्री तुकाराम महाराच्या पालखीचे आगमन झाले. वारक-यांची भगवी पताका पुण्यात रोवली गेली. आपले दैनंदिन व्यावहार सांभाळत. वाहतुकीची कोंडी सोडवत तो भक्तिच्या या वातावरणात रंगून गेलाय. खरोखरीच वातावरण बदललय. संत परंपरेचे दोन महान संत आजही लोकांच्या मनाला स्पर्श करताहेत. हे किती विरळे.

काळ बदलला. सवयी बदलल्या. भावना ओथंबल्या. आक्रसल्या. पण ही संतांची शिकवण. त्यांचे विचार आजही कायम राहिलेत.
आज संत ज्ञानंश्वरांची पालखी पुण्यात आली मात्र पुणे शहराचा प्रत्येक भाग चैतन्यमय बनून गेला.

मंदिर, धर्मशाळा, व्यापा-यांची गोदामे इतकेच काय रस्त्यावरचे फुटपाथही भरून गेलेत. विविध सार्वजनिक संस्था, सामाजिक संस्था , राजकीय कार्यतर्तें सारेच माऊलींच्या भक्तांसाठी सेवा देत आहेत.
पालखीच्या दिंड्यावर नजर टाकली तर खरेच अबाल वृध्द, तरूण, महिला, युवक वर्ग साराच एकवटला आहे.
इथली जात एकच भागवत भक्तिची.
नाळ कुठे जुळली असेल तर ती वि्ठ्ठल नामाशी
चौका-चौकात नाद ऐकू येतो तो अभंगाचा....
अशा या वातावरणात दोन दिवस पुण्याला संतांच्या परंपरेचे जतन करण्याचे सामर्थ्य मिळाले आहे. हा समृध्द परंपरेचा वारसा पुढच्या पिढीपर्यत नेण्याची तळमळ दिसून येत आहे.

दाटी झाली नगरीत
उरी उरलो सत्वरीत
तेणे भक्तिचा साकरू
सर्व रूपे आकारू



सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

Sant Tukaram Palkhi In Pune