Saturday, August 14, 2010

किती हा दुरावा



नाही मुखाचे दर्शन

नाही सुखाचे हे क्षण

उसळले माझे मन

धाव घेई



किती हा दुरावा
हवा थोडा तो ओलावा
क्षणभरी तरी नको
सहवास भेटावा



असा रुसवा नसावा
अंती सुखाचा शिडकावा
मन तळमळे इथे
काळीजही उडे


वारा वाहे बाहेरी
अंतरी धग दाटे तीही
सोडू नकोस आता ग
पुसावाही नाही


आठवांना आठविता काळ संपता संपेना
साठविल्या जाणिवाही पुरणार नाही
भेटल्यावाचूनी आता मी थांबणार नाही


दाट धुक्यात चालतो
धग जवळी हवी ग
पावले पावलांवरी
टाकाया हवी ग



-सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com

9552596276

Friday, August 13, 2010

स्वातंत्र्यांची सुट्टी - दंगा आणि मस्ती


ही भलतीच सस्ती

स्वातंत्र्य कुणी, कशासाठी मिळविले.
त्यांच्या वेदना काय होत्या.
काय करायचय आम्हाला.
आणि कळून तरी काय उपयोग.

इतिहासाच्या पुस्तकात वाचेले तेवढे बस्स.
आत्ता आठवले तरी बोअर वाटते.

त्यांचा काळ कसा होता
आम्हाला सांगून काय उपयोग


जरा आज पहा
राजकारण बिघडलेले
समाजकारणात राजकारण

नोकरीसाठी द्यावे लागतात पैसै
आधी ओरबाडले जातो
मग लागल्यावर आम्ही लुबाडतोच


शिक्षण घ्यायचे, प्रवेश घ्यायचा तरी कठीण
ह्या नेशन मध्ये तिथेही डो-नेशन
साला, काहीच सोपे नाही
बाता मात्र वारेमाप


आम्हीही आता दमलोय
काम करून थकलोय


तुमचा स्वातंत्र्यदिन काय तो ना
कुणासाठी
पुढा-यांसाठी,
देशातल्या नागरीकांनी फक्त घरात पहायचे
जमलेत तर सलाम करायचा


यात साला लहान मुलांचा का छळ
सकाळी उठून शाळेचे तोंड पहायचे
तिरंग्याच्या प्रणामासाठी धावत सुटायचे
पालकांचीही तेवढीच देशसेवा, दुसरे काय


आमचे मात्र बरय,
नाही ताप, नाही व्याप
मजेत हिंडतो. गारव्यात पावसात फिरतो
थोडी मस्ती, थोडी चंगळ करतो





-सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

9552596276

शाळेतली 'ती 'कविता..बोलते


आजकाल फारसे कुणी परंपरा पाळत नाहित. आम्ही मात्र त्या पाळतो. नव्हे परंपरेचे पाईक होण्याची पात्रता आमच्या सर्वांच्या अंगी यावी म्हणून त्यांचा धुमधडाक्यात ( आमच्या दृष्टीने बरसा) प्रसार करण्याचे ठरविण्यात आल्याचा खलिता ( अलिखित) काढण्यात आला आहे.

श्रावण लागला. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

ही कविता मिळाली. पण ती सध्या शाळेत मराठीच्या पुस्तकात नाही, हे वाचून खेद वाटला.


मग काय शोध घेताना सापडले की, रमणबागच्या शाळेतले संगीताचे शिक्षक ( तसे मास्तरच) अजय पराड ६,७वीच्या मुलांना कवितांना चाली लावून त्यांचेकडून गाऊन घेतात.

मग आमचा मोर्चा वळला. तो शाळेकडे.

एकी हेच बळ हे ब्रीद वाक्य असलेल्या शनिवारातल्या शाळेत पराड सरांशी बोलताना आपण तीन्ही वर्गात कोणती कविता आहे त्यांचे प्रात्याक्षिकच शूट करू, असा सल्ला दिला.


हिरवी छाया हिरवी माया

पानोपानी हिरवी किमया

ह्या ६वी ब तुकडीतील विद्यार्थी कसे अगदी लयीत, चालीत माना डोलावून कविता सादर करत होते.

ठरले तीच शूट करायची.

गेली काही वर्षे ही कविता रमणबागेतल्या अनेक मुलांना पाठ झाली आहे.


बालपणीच्या वर्गातल्या या कवितेची मजा काही औरच.

तिच या मुलांकडून म्हणून घेताना, तो निरागस चेहरा. शब्दाला संगीताची मिळालेली जोड सारेच काही
क्षणापूरते तरी तुमचे होते. तुम्हीही त्यात मिसळून जाता.

अगदी तसेच माझे झाले.

तुम्हालाही तोच आनंद देता येईल.


खरे म्हणजे तो आजच्या काळाला. परिस्थितीला पूरक आहे की नाही. हा विचार इथे नसतो.
जे आपण अनुभवले ते इतरांपर्यत पोचविणे हाच उद्देश असतो. अगदी साधा सरळ.

तोच मी केलाय.

यात काव्य पाठांतर आठवेल.

ते बरोबरचे मित्र आठवतील. तो दंगा स्मरेल.

पण एकदा त्या विश्र्वात तुम्ही जावून स्वतःला फ्रेश भासेल.

बस्स. हा एकच उद्देश.
ती शाळा. ते शिक्षक. सारेच.

हाच जुना काळ. भुतकाळ. रमाल काही काळ......


-सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, August 11, 2010

मधुवंती भिडे 'असे सूर गातात.'..


पतिसमवेत त्या अमेरिकेत गेल्या. पण जाताना आपले संगीत बरोबरच घेऊन. तिथे डॉ. अलका देव-मारुलकरांनी सराव करून घेतलेला रियाज मात्र चुकविला नाही. गेली १६ वर्षे मधुवंती भिडे गातच राहिल्या. गेल्या शनिवारी त्यांनी गायलेल्या 'असे सुर गावे' या ध्वनिफितिचे प्रकाशन श्रीधर फडके यांच्या हस्ते करवून मराठीतल्या प्रमुंख कवींच्या कवितांना चित्रफितीमधून स्वरसिध्द केले आहे.

मराठी भाषेतले शुध्द उच्चारण व्हावे यासाठी मधुवंती भिडे यांनी विशेष काळजी घेतली आहे. अगदी उच्चारण्यात चूकच निघणार नाही याची खबरदारी घेऊनही काही वेळा कानाला खटकले तरीही मराठी भाषेशी नाळ जोडण्यासाटी केलेल्या ह्या प्रयत्नाला मनापासून दाद द्यायलाच हवी.


कवी जयंत भिडे, संगीत दिले तो नरेंद्र भिडे आणि गायले तेही मधुवंती भिडे असा तिनही भिडे एकाच ठिकाणी भिडलेला हा सोहळाही वेगळाच म्हणावा लागेल.

शास्त्रीय संगीत गातानाही मधुवंती भिडे ह्या सतत मराठी गाण्यांचे कार्यक्रम करतच होत्या. त्यांनी पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनात सुरेश भट यांच्या गझलांवर आधारित कार्यक्रम केला होता. फिलाडेल्फिया आणि सेऍटलमध्ये गायनाचे कार्यक्रम केले. मराठी गाणी तेथल्या मराठी रसिंकाना सतत वेगवेगळ्या माध्यामातून ऐकवून मराटी गाणी तिथे पसरलेल्या माणसांच्या मनात साठवून ठेवण्यात मधुवंती भिडे यांचे योगदान आहे.

जुन्या गाण्यांना वेगळ्या चाली, अतिशय फ्रेश संगीत, अशा विविधतेनं हा अल्बम नटला आहे. एकूण आठ गाणी यात आहेत. बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेलं "माझी माय सरस्वती', जयंत भिडे यांनी लिहिलेले "दिसती तुझ्या खुणा', हे एका अदृश्‍य शक्तीवर आधारलेलं पण भक्तिगीत नसलेलं, शांता शेळकेंच्या लेखणीतून उतरलेलं, मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेली लावणी आणि भावगीत, पद्मा गोळे यांच्याबरोबरच अरुणा ढेरेंचं लोकगीत आणि वैभव जोशी यांचं "फ्युजन' गीतं अल्बममध्ये आहे.या अल्बमच्या रूपातून आपण संगीतातील वेगळा "ट्रेंड' आणण्याचा प्रयत्न केलाय असा दावा किती खरा खोटा ते ऐकणारे श्रोतेच सांगतील.


यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठी भाषा आजही परदेशात टिकली आहे. ती पिढीनुसार वाढत आहे. भाषेत होणा-या विविध गोष्टी पुढच्या पिढीपर्यत पोहोचत आहे याचा आनंद मधुवंती भिडे यांच्या सीडी प्रकाशनाच्या निमित्ताने हा एक आगळा आनंद होतोय.

त्यांनी गायलेली गाणी आणि त्यांतल्या संगीताचा आस्वाद घेताना आनंदाबरोबरच अभिमानही वाटला.


सुभाष इनामदार, पुणे.


subhashinamdar@gmauil.com
9552596276

Tuesday, August 10, 2010

ह्या पार्टीला कोण थांबविणार..




पुण्यात मध्यंतरी थेऊरला झालेल्या सिंबायोसिंच्या मुलांची पार्टी बरीच गाजली. व्यवस्थापन शाखेतल्या ५०० मुलांनी यात धिंगाणा घातला. पोलिसांनी तथाकथित कारवाई केली. मिडीयानेही या घटनेचा योग्य तो बोभाटा केला.
मात्र यामुळे पुण्याचे तथाकथित संस्कृति बिघडल्याचे चित्र कांहीनी रेखाटले.

या घटनेचा पाढा गिरवून यातून पुढे काय करायचे यासाठी पुण्याच्या अनुबंध संस्थेने परिसंवाद घेतला. यात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी बोलले.
मुंलींसह पार्टीत सहभागी झालेल्यांना आपण काही गुन्हा केला आहे असे वाटावे यासाठी त्यांचे संस्थेतून निलंबन करावे. तर यांच्या गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे यावर डॉ. माधवी वैद्य ठाम होत्या.
तर भाई वैद्य यांनी यानिमित्ताने आजच्या शिक्षणाच्या बाजारूपणावर टिका केली आणि ही मुले आपलीच आहे त्यांना कौन्सीलिंग करण्याची गरज आहे, असे मत मांडले.
दारूला चले जाव करण्याची आज काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
अंकुश काकडे यांनी तर पुण्याच्या संस्कृतिला यामुळे गालबोट लागल्याचे सांगत संस्थेने या मुलांना फारच शिक्षा कमी केल्याचे सांगून यातून काहीही साध्य हो
त नाही. शैक्षणिक संस्थांवर मुले शिक्षणानंतर काय करताता याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगीतले.


आजकालची मुले कुठे जातात याची पालकांनाही माहिती नसते. त्यांच्यावर अशा कृत्यावर पांघरूण घालण्यापेक्षा कांही शहरातल्या मान्यवरांनी एकत्र येवून मुलांना समजावून सांगण्याची गरज शांतीलाल सुरतवाला यांनी आपल्या भाषणातून मांडली.

कुमार सत्पर्षी यांनी जिथे शक्य असेल तिथे सत्यता पटवून देण्याचा प्रयत्न केला तरच ह्यात सुधारणा होईल. सध्या ही नवश्रीमंतांचा वेगळी पिढी शिक्षण संस्थात धुमाकूळ घालत आहे. ते पैशाने शिक्षण विकत घेत आहेत. त्यांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांच्यावर इतर समाजाचे देणे आहे हे समजवण्याची गरज आहे.


या परिसंवादात पोलिसांनी मिडीयाला साथीला घेऊन कारवाई केल्याची टिका झाली. मात्र पोलिसांच्यावतीने येणारे वक्तेही गैरहजर होते.
आजच्या पिढी हुशार आहे. पण त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. पैशाने शिक्षण विकत घेता येते हे चांगले कळून चुकले आहे.
शिक्षण संस्था बाजार मांडून बसल्या आहेत. मॅनंजमेंट कोट्याची आणि एकूणच जो जास्त पैसे देईल त्यांला प्रवेश दिला जातो. इथे पदव्या विकत मिळतात अशा पाटीलावलेल्या शिक्षण संस्थांची वाढ थांबायला हवी.

कुणी कितीही म्हटले तरी हे असे चालायचे. तुम्ही आम्ही फक्त पहात बसायचे एवढेच.


सुभाष इनामदार, पुणे..


subhashinamdar@gmail.com
9552596276