Monday, January 17, 2011

लातुरोत्सवात विलासरावांची दूरदृष्टी


बुधवारी लातूर शहरात तीन महत्वाचे कार्यक्रम झाले आणि पत्रकारिता, सांस्कृतिक आणि सहकार आशा तिनही क्षेत्रातली मंडळी १२ जानेवारीसा एकत्रित झाली होती. यामुळे लातूर शहराला नवी झळाळी प्राप्त झाली होती. एकीकडे सुरेश भटेवरा यांना एकमतचा पत्रकारितेचा गौरव. तर दुसरीकडे लातूर मध्ये पहिल्यांदाच भरविलेल्या लातूर फेस्टिव्हलचा उत्सव. बुधवारी समारोप समारंभानंतर तर कैलाश खेरच्या गाण्यांनी लातूरकरांना संगीतात न्हाऊन काढले.
आणि एकडे मांजरा सहकारी साखर कारख्यात २० मेगावॅटच्या वीजप्रकल्पाच्या कार्याचा भूमिपूजन समारंभ ..तर कारख्याच्या मळीपासून सुरू झालेल्या रोड ६० हजार लिटर तयार केलेल्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन. एका मंडपात...आणि मांजरा साखर कारख्यानावर सुमारे ५००० हजार शेतक-यांच्या उपस्थितीत झालेला सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेला राजकीय फडांची भाषणबाजी....
या सा-याचे श्रेय निर्विवाद जाते ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग खात्याचा भार वाहणारे लातूर जिल्ह्याचे कर्ते माननिय विलासराव देशमुख यांचेकडे....
साखर कारखान्यातील मळीपासून तयार होणारे इथेनॉलची मागणी लक्षात घेता त्याचा मोठा ग्राहक वाढू शकेल या उद्देशाने मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने हा प्रकल्प राबविण्याचे ठरविले. पुण्याच्या युनिव्हर्सल फोर्सेस इंडस्ट्रीजला हे युनिट बनविण्याचे काम मिळाले आणि अवघ्या सहा महिन्याच्या आत तो तयारही झाला.
प्रदीप ढोकरे ( कार्यकारी संचालक ), गिरीश देशपांडे (संचालक) आणि सतीश थोरात (संचालक) या तीन मराठी तरूणांनी हा प्रकल्प साकार केला आहे. १९९६ पासून ६० साखर कारखान्यांना विविध पातळीवर प्रकल्प तयार करून देणा-या या कंपनीचा कारखाना पुण्यात तळवडेच्या औद्योगिक परिसरात आहे. या उद्योजकांना लातूरला हा प्रक्लप उभी करण्याची संधी नामदार विलासराव देशमुख यांच्यामुळे प्राप्त झाली.. विलासरावांच्या हस्ते या प्रकल्पाचा आरंभ झाला. मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या व्यासपीठावरुन जाहिर भाषणात विलासरावांनी युनिव्हर्सल फोर्सेस इंडस्ट्रीजने इथे नुकसानीत काम केल्याचे सांगून टाकले आणि . मांजराचे काम पाहून तुम्हाला आणखी कामे मिळतील असा विश्वास दिला.शिवाय उपस्थित साखर आणि सहकार क्षेत्राच्या मंडळींना युनिव्हर्सलच्या मंडळींना युनिव्हर्स बनविण्यासाठी इतर साखर कारखान्यांनी कामे देण्याचे ठणकाऊन सांगितले.
यात त्यांच्या कामाची पावती तर होतीच पण असे प्रकल्प इतर साखर कारखांन्यांनी राबवून कारखान्यांनी स्वतःच्या ताकदीवर उभे राहावे असे आवाहनही होते. कंपनीच्या दृष्टीने विलासरावांची ही शाबासकी पुढे काम मिळण्यासाठी आणि ते तेवढेच यशस्वी करण्याचे बळ वाढविणारेही होते.
हा नविन आधुनिक तंत्रावर मल्टी प्रेशर destiletion अणि continuous फ़ेर्मेन्ततिओन वापरून हा प्रकल्प केला आहे .PLC automation असलेला हा प्लान्ट आहे . त्यातून international दर्जाचे alcohol production होत आहे . Also one can produce RS or ENA or Ethanol from Molasses,या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे ५०० लोकांचा हातभार लागला..तेव्हा असे काम यशस्वी करणा-या या कंपनीचे भवितव्य किती उज्वल आहे तेच सिध्द होते.
आत्तापर्यत ५२ पुरस्कार प्राप्त झालेला मांजरा सहकारी साखर कारखाना हा आर्थक दृष्ट्या स्वयंपूर्ण आहे. ऊस देणारा शेतकरी कारखाना योग्य भाव देते म्हणून खूष आहे.. तर सहकारी साखर कारखाना कसा यशस्वी चालवावा हे महाराष्ट्राला दाखविणारा आदर्श कारखाना आहे. सहकार खात्याचे मंत्री नामदार हर्षवर्धन पाटील यांच्या मते आता या कारखान्याने राज्यातले तोट्यात चालणारे साखर कारखाने चालवायला घ्यावे अशी विनंतीही इथे केली.
एकूणच मांजरा साखरचा हा कार्यक्रम राज्यातल्या सर्वात मोठ्या साखर कारखान्याचा पसारा पाहण्याची संधी मिळाली याचा अधिक आनंद होतो आहे.

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
Mob_ 9552596276
www.subhashinamdar.blogspot.com

No comments: