Friday, February 18, 2011

कविता टिकून राहिली..


काही भावना थोडक्या शब्दात व्यक्त होतात. ते माध्यम म्हणून मी कविता करत राहिलो. बातमी सविस्तर लिहिण्यापेक्षा जशी एका छायाचित्रातून जे शब्दात म्हणावचे आहे ते चटकन कळते आणि पूर्ण अर्थबोधही होतो.

केवळ प्रेमच नाही तर नातीही या शब्दकळेतून नीट बाहेर येतात. त्यांचा पोत सर्वांना थोडक्यात कळतो. सामाजिक बांधिलकीशी नाते जोडताना आपण कुणाचे तरी डोळे होतो. दुस-याचा आनंद आणि दुःखेही या माध्यमातून कळू लागतात. आणि ते सारे थेट ह्दयापर्यत जावून भिडते.

गेली ३५ वर्षे पत्रकारितेत काम करताना...जुना दैनिक तरूण भारत असेल किंवा इंडियन एक्प्रेस असेल...लोकांच्या प्रश्नात गुंफत गेलो. सकाळ समूहाची इंटरनेच आवृत्ती वृत्त संपादक या नात्याने दहा वर्षे सांभांळली... त्यात नवे प्रवाह प्रवाह पाहिले. या सगळ्यात बरे वाईट अनुभव घेतले...टक्के टोणपे खाल्ले... व्यवस्थापनाची नोकरीवर घेतनाची दृष्टी आणि प्रत्यक्षात नोकरीत रुळताना होणारे बदल अनुभवले...


सांस्कृतिक क्षेत्राचा विविध माध्यमातून आढावा घेतला. समीक्षणे लिहली...वृत्तांत नोंदविला..लेखही लिहले....

तरीही कविता टिकून राहिली..नवे अनुभव विश्व पुढे येत राहिले... आजही नव्या तंत्राची अजोड जोड घेऊन आषुष्याची वाटचाल सुरूच आहे.



अखेरीस.....


चालणे आहे तरीही असा दमणार नाही

देऊनी सारे तुला भारावलो पण दुरावलो नाही

धर्म पत्रकारितेचा माझा तो कधी संपणार नाही





सुभाष इनामदार,पुणे

Mob_ 9552596276

subhashinamdar@gmail.com

www.subhashinamdar.blogspot.com

www.culturalpune.blogspot.com

No comments: