Wednesday, June 22, 2011

आजचे लग्न म्हणजे काय ?


परवा, अगदी भल्या पहाटे (सकाळी ६ वाजता..पुण्याच्या दृष्टीने) आम्ही कुटुंबीय सात पंधराची डेक्कन पकडली. सव्वादहाच्या सुमारास दादरला पोचलो. लागलीच परळसाठी टॅक्सी केली. पावसाने अदल्याच दिवशी कहरकेल्याने
आजही तो कोसणार याची खात्री होती. म्हणूनच मिळेल त्या टॅक्सीला हात केला.
पंचवीस रुपायात (पुणेकरांना रिक्षाचे भाडे माहित असल्याने) के.ई.एमच्या दारात पंधरा मिनिटात हजर झालो.
टॅक्सीचे दार उघडून बाहेर पडणार मात्र...मुंबईच्या पावसाने आपला खाक्या दाखविला.
हॉलमध्ये जाणाच्या आत पावसाने ओलेते करून सोडले.
लग्नाला वेळ होता. पण मुंबईची ती कुंद हवा.. बाहेर कोसळणा-या पावसांच्या सरी..
दमट हवेची सवय नसल्याने अधिकच घामेजलेला...
मात्र इकडच्या स्वारीने.. बॅग घेऊन थेट वधूपक्षाची खोली गाठली. लग्नाला शोभेलसा नट्टापट्टा केला.
मी मात्र...त्याच त्या पुण्याहून आलेल्या साध्या कपड्यात.. अखेरीस मी बॅगेत घेतलेला झब्बा अडकवला.
नातेवाईकांशी गुफ्तगू झाले. त्यातच सातारच्या न्यू ईग्लिश स्कूल मधला बॅचमेट भेटला.
तो मुलाकडून..तर मी मुलीचा मामा म्हणून नव्याने नाच्याचे बंध ओढले गेलो.

घामाच्या धारा अंगात वहात होत्या.. भाचीला स्टेजवर मामा म्हणून टोपी घालून स्टेजवर हजर केले.
मंगलाष्टकाच्या फैरी झडल्या... कुणाचा सुस्वर आवाज..तर कुणी पारंपारिक आवाजाची देणगी असलेला..
लग्नाचा विधी पार पडला..

तसे सारे जण भोजनाच्या दिशेने वळाले.. आधी प्लेटसाठी रांग....मग पदार्थ घेण्यासाठी रांग..
बरे बसायला जागा नाही... हातात प्लेट घेऊन अधिक पदार्थांच्या करीता त्याच ठिकाणी हालचाल सुरू..
पदार्थांची चव घेत जेवण घेणे आता शक्य नव्हते...आपण आधी घेतले तर इतरांना जागा मिळेल..
अशी स्थिती...

नवरा-नवरी स्टेजवर आलेल्यांच्या ओळखी करण्यात गुंतलेले.. तेही इतके की रांगेत दाखल होऊन
आपला नंबर कधी लागतो याची वाट पहात उभे रहायाचे...
दोन्हीकडचे पाहुणे..देवघेवीत गुंतलेले. कोण जेवले.. हे पहायाला सवड कुणाला...
दुपारी हॉल खाली करायचा..
ज्याने त्याने आपापले पोट पाहून ताटात घ्यायचे आणि तृप्त होऊन जायचे...बस्स्...

खरेच....पूर्वीकाळी( आमच्या काळी असे म्हणण्याची पध्दत होती..त्य़ाप्रमाणे) पंगत असायची..
ज्येष्ठांना मान असायचा.. मुलांकजेही लक्ष रहायचे.. ताट भरलेले असायचे... आग्रह व्हायचा...
कुणी विहिण म्हणाचयी... तर कुणी भावगीताने जेवणावळीची रंगत वाढवायचा..
प्रत्येक जण परिचित व्हायचा... मुलगा मुलगी पाया पजून आशिर्वाद घ्यायचे...
अगदी उखाण्यांची उधळण व्हायची... सारा सोहळा...समारंभात आपलेपणा असायचा...

आणि आता.....
सोहळा होतो..खर्च होतो...प्लेटचा हिशेब धरून केटरर पैसे घेतो..
येणारा आपल्याच हाताने वाढून घेऊन आनंद घ्यायचा प्रयत्न करतो...
जातो म्हणून सांगायला गेलात की...जेवलात ना? कोरडेपणाने विचारले जाते....
कुणाला काही द्यायचे नसते...कुणाला काही घ्यायचे नसते.... सारा मामला उपस्थितीचा...
आणि समारंभ उरकण्याचा... हो अगदी अलीकडे तर मुलगा मुलगी दोघांना उचलून माळा घालण्याचे नविन फॅड... अखेरीस ज्येष्टांना आवडो वा...ते होत रहाते...रिवाजासारखे...
अलिकडच्या असा लग्न पध्दतीत काय लक्षात रहाते...जेवण..
पण तोही आता उपचार उरलाय...अगदी स्पष्ट भाषेत सांगायचे झाले तर
लग्नाला जातो म्हणजे आपण जेवायला जातो....
त्यात जिव्हाळ्यापेक्षा असते ती सोय...
नात्यापेत्राही असतो तो व्यवहार...
दूरून लोक येतात..ते काय फक्त जेवण्यासाठी....
आलेल्यात आपुलीकेचे धागे असतात..पण तिथे ..ते औपचारिक बनते... गर्दीत उभे राहून ..
अक्षदा पडल्या की...प्टेट हाती धरून..कुणी वाढता कारे यात म्हणत रांगेत उभे रहायचे...
एकदाच काय ते खिचडी करून एकत्र घ्यायचे....आणि सुटायचे... बाकी काय...


तुमचा काही वेगळा अनुभव आहे.... जरूर उत्तर द्या...नव्हे...सांगा...



सुभाष इनामदार,पुणे
मोबा..९५५२५९६२७६
subhashinamdar@gmail.com

5 comments:

aDi said...

काळाच्या ओघात आलेली अपरिहार्यता...
आता याला चांगलं म्हणायचं की वाईट (मुळात फारसं चांगलं काही नाहीच यात, तरीही), हे आपल्यावर आहे.
पण सगळंच बदललंय. शहरं, जीवनशैली, खाणं, सण आणि देव-देवळांसकट...
तिथे एका लग्नाची काय कथा...
कदाचित, तुम्ही जी लग्नं सांगताय, त्यांना तुमच्या आधीच्या पिढीनेही असंच नाक मुरडलं असेल!

Anonymous said...

पूर्णतः खरे आहे
समाजात शिरलेला मानभावीपणा/आणि संपत्ती प्रदर्शन हा मूलतः याला कारणीभूत आहे
खर तर पानात घेताना जसे आपण झेपेल/खाल्ले जाईल इतकेच घेतो आणि घ्या असा सल्ला देतो तद्वतच जेव्हढ्या लोकांशी संवाद साधता येईल आणि ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम करणार ते ठिकाण किती लोकांना सामावून घेऊ शकेल हे पाहूनच आमंत्रणे करणे गरजेचे आहे. अंथरून पाहून जसे हात पाय पसरावे तसेच जागा बघून आमंत्रणे करावीत असे मला वाटते.


माझ्यापुरते बोलायचे तर मी कुठल्याही लग्नाला बहुतेकदा जात नाही. तसे आधीच सांगते, कळवते. . पण जाणे आवश्यकच असेल तर लग्नाला येईन पण जेवण्यास थांबणार नाही असे सांगते.आणि त्याचे पटेल असे कारणही सांगते. अगदीच सख्खे नातेवाईक असतील तर गोष्ट वेगळी.
माझ्या मिस्टरांचे ही पहिल्यापासून हेच मत आहे. ते तर अशा लग्नांना "श्रीमंतांचे अन्नछत्र " म्हणतात.
इतक्या लोकांना जेवायला बोलावून त्यांचा नीट पाहुणचार न करणे त्यांच्याशी संवाद न साधणे या गोष्टी अशा वेळी घडतात. हातात ताटली घेऊन रांगेत उभे राहणे ,उभ्या उभ्या जेवणे आणि भोज्याला शिवल्या सारखे लोकांनी येऊन जाणे..
आजकाल ताटाचे किमान रु. ३०० ते १००० असतात. एवढा खर्च लोकांवर करून नंतर हीच माणसे गरज पडल्यावर ओळख सुद्धा दाखवणार नाहीत यांची जाणीव माणसाला कशी राहत नाही याचे आश्चर्य वाटते.
खर तर आपली ऐपत किती आहे हे इतर माणसे ओळखूनच असतात त्याला खरया खोट्या बडेजावाची गरजच नसते.
लग्न हि अतिशय सुटसुटीत छोटेखानी असावीत .
आणि जर खरच मोठी होणार असतील तर निमंत्रण पत्रिकेवर पाहुण्यांना समारंभासाठी वेगवेगळ्या वेळा द्याव्यात उदा. कोणाला ७ ते ८ कोणाला ८ते ९. वगैरे. त्यामुळे एकाच वेळेस होणारी गर्दी कमी होईल.किंवा वेगवेगळे गट करून वेगवेगळ्या दिवशी बोलवावेत. म्हणजे सर्वांनाच सर्वाशी नीट संवाद साधता येईल (ही खास माझ्या मिस्टरांची सूचना )).
एकंदरीतच लग्न समारंभाचे परिवर्तन होणे त्यावर विचार
होणे गरजेचे आहे.
धनश्री
dhanashree tulpule dmtulpule@gmail.com

VIKAS BHA said...

real fact

नागेश देशपांडे said...

नमस्कार काका,

तुमच्या इतका अनुभव नाही मला मात्र तुमचं मत मला १००% पटत आहे.
माझ्या मुलाचे/मुलीचे लग्न किती चांगले झाले या हून केटरर्स किती चांगला होता असे सांगणारे यजमान मी पाहिले आहेत.

लग्न एक आनंद सोहळा, नातेवाईकांची भेट ह्या दृष्टीने मुळीच पाहिला जात नाही. नुसती औपचारिकता उरली आहे.

पाहुणे मंडळी येतात तुम्ही म्हटल्याप्रमाणे "प्लेट" घेऊन जेवतात आणि "आहेर" देऊन निघून जातात...
कारण उद्या कोणी हे म्हणायला नको की तुम्ही आमच्या इकडच्या लग्नाला आले नाही.


ह्याच विषयावरील माझा लेख वाचा http://blogmajha.blogspot.com/2010/07/blog-post_18.html

aDi said...

धनश्री,
सुचना आवडली. :)