Thursday, June 30, 2011

नवा गडी नवे राज्य-हलकेफुलके


काळाची पावले ओळखून अभिनयाने जिवंत केलेले नाटक




काळ बदलला. तरूण वर्ग स्वतंत्र झाला. मुली स्वतःच्या मताने निर्णय घेऊ लागल्या. घर आपले...राजा-राणीचे हवे. दोघेही नोकरी करणारे. पैसा बक्कळ.. कपड्यात बदल झाला. सारे कसे मोकळे-ढाकळे आले.
जमाना इंटरनेट, लॅपटॉपचा आला. घरात स्वयंपाकापेक्षा बाहेरून पार्सल मागविले की झाले...
घराची सजावट बदलली ..तरी घराला भिंती हव्यातच. प्रायव्हसी म्हणतात ती.
लग्ना आधीचे सारे लग्नानंतर चालत नाही. पतीला मैत्रीण चालते ..
पण पत्नीला मित्र असणे हे बरे नव्हे.... ते न शोभणारे....

सांगायचे तात्पर्य....हे गडी नवे पण राज्य तेच जुने... पण नव्या कोंदणात सजविलेले....
तसे सांगायचे म्हणजे संशयकल्लोळ हो...

नवा गडी नवे राज्य....ह्या नाटकाने आपला शतकमहोत्सवही साजरा केलाय. उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या भुमिकांनी नाटकाला जिवंतपणा येतो... खरं म्हटले तर हे आजच्या काळाचे नाटक आहे.. जुनी पल्लेदार वाक्य नाहीत. स्वगते नाहीत. एकाच वेळी बराच काळ चालणारे प्रसंग नाहीत. वाक्यांना मराठी भाषेची पारंपारिक चौकट नाही..नवे शब्द आहेत. वाक्यांची गरज फक्त सांगण्यापुरती त्याला भाषेची झालर हवी कशाला?

एकूणच मालिकांमध्ये जसे तुकड्यांनी घटना पुढे जाच रहातात तसेच काहीसे छोटे प्रसंग. कांही बेडरूम प्रसंग. तसे बोल्ड. पण नाटकाला आवश्यक. आणि स्पष्ट सांगायचे झाले तर या नाटकाने तरूणाईचा वर्ग रंगमंदिराकडे खेचला गेला आहे. नाटकाला बुकींग चांगले होते. आणि दुसरे म्हणजे उमेश कामत, प्रिया बापट यांचा इस्टंट अभिनय पहायला मिळतो. दोघांचेही चेहरे बोलतात. भावना दिसतात. त्याला प्रेमाचा स्पर्श होतो. नाते अधिक फुलून येते.

एकदंत क्रिएशन्सने रंगमंचावर आणलेले नाटक समीर विध्वंस यांनी ज्या नेमक्या रितीने ते दिग्दर्शित केले आहे. नाटकाला गती दिली. गेयता आणली. प्रसंगाला सतत हलते ठेवले. कलावंतांना पुरेसे मोकळे सोडले. आणि परिणामकारक प्रयोग सादर करण्यात ते यशस्वी झालेत.

क्षितीज पटवर्धन यांनी हृषीकेश (उमेश कामत) आणि अमृता( प्रिया बापट) ह्या नवीन लग्न झालेल्या तरूण जोडप्यात उद्भभवलेल्या संसारातली ही मित्र कहाणी लिहली आहे ती संवादात कागदावर उतरवली आहे..क्षितीज पटवर्धन यांनी. चटकदार संवाद. त्याक्षणी चपखल वाटतील अशी वाक्ये. अधुनिक जोडप्यांना काळजात नेमकी घुसतील अशी शब्दरचना...यामुळे नाटक तुमच्यासमोर खिदळत रहाते.

पुरूषवर्गाला प्राधान्यक्रम देणारी आणि शेवटी ही सारी संशयाची धार शुल्लक करणारी ही घटनाक्रमाने सांगणारी काहीशी नाटकी कृत्रिमता नाटकाला सिनंमातल्या पटकथेचे रूप देते. एकमेकांना लग्नापूर्वीपासून ओळखणारे हे आधिचे प्रेमिक जेव्हा पती-पत्नी बनतात..तेव्हा पहिले काही दिवस सोडले तर संशयवाढविणारे जातात. अमृताचा मित्र हिम्मतराव जेव्हापासून घरी येतो..तेव्हापासून त्या दोघांची मैत्री तशीच खुल्ली..तीच खटकचे...नाटकाला तीथेच सुरवात होते. संशयाने सारा खेळ..पालटतो. वातावरण गंङीर बनत जाते...आणि शेवटी हे सारे संशयाचे बळी ठरतात..हे सिध्द झाल्यावर सुखांताने शेवट होतो.

त्यातच पुरूषाची जुनी मेत्रीण घरी आल्यावर तिने केलेले दावे ऐकल्यावर संसारातील दोघांनीही संयम सोडल्याचे नाटकलेखक दाखवितो. पुरूषी अहंकाराला सांभाळताना स्त्रीच्या दुख-या मनालाही तो फुंकर घालतो. कहाणी रंगवताना त्याला भावनेचा तात्पुरता मुलामा दिल्यासारखे वाटते. इथे हे नाटक काही सांगते म्हणून पहायाला जावू नका... ते तुमची करमणूक फुल्ल टाईमपास करणारे आहे... जुनाच विशय नवीन बाटतील भरून पुन्हा ताज्या दमाच्या कलाकारांकडून तुमच्यापर्यत आणलाय एवढेच.

मोकळेपणानी वावरणारी ही पात्रे तुम्हाला खुशीत ठेवतात. भावनेला हात घालून प्रसंगी तुमच्या डोळ्यात पाणीही आणतील... पण हे कसब आहे ते कलावंताचे. उमेश कामत, प्रिया बापट यांची जोडी रंगभुमिवर नवे राज्य गाजविणार हे सांगण्यासारखी मस्त दिसतात.. छान दिसतात. मोकळी वावरतात. त्यांच्या अबिनयात सहजपणा आहे. संवादात विलक्षण साधेपणा आहे. सफाई आहे. चेह-यावर बोलके भाव आहेत. चटका लावणारी मुद्रभिनयाची ताकद दोघांकडेहगी आई. म्हणूनच तेच या नाटकाचे खरे आकर्षण आहे.

हेमंत ढोणेंचा हिम्मतराव विलक्षण वेगळा..ग्रामिण मातीचा गंध घेऊन आलेला. रसरशीत , तरतरीत आणि गंमत सहजपणे कशी करावी ते सांगणारा वठलाय.त्यामानाने प्राजक्ता दातार थोड्या डाव्या वाटतात. त्याकेवळ भूमिका करतात.. त्या अंगावर येत नाहीत.

प्रसाद वालावरकारांच्या नेपथ्यातून आजचे मुंबईतले श्रीमंती घर , त्यातले महागडे रुप..सारेच दिसते. भासते. रंगसंगती उत्तम आहे. जसे पडद्यावर साकारणे गीत कथेला पूरक असते तसे ऋषीकेश कामेरकरांचे संगीत आणि त्यांनी तयार केलेले गीत नाटकाला मोहकता देते.

शितल तळपदे यांची पूरक प्रकाश योजना प्रसंगाना अदिक उठाव देते.

चंद्रकांत लोहकरे यांनी निर्मित केलेल्या या नाटकाने अजच्या काळाला पटेल. रुचेल आणि आवडेल असे नाटक देऊन नाटक हलकेफुलके आणि योग्य विषयावरचे आणले तर ते पेक्षक नक्कीच आपले मानतात याचे दर्शन घडविले आहे...





सुभाष इनामदार, पुणे

Mob. 9552596276

subhashinamdar@gmail.com

Tuesday, June 28, 2011

दहावीचे मार्क्स हे फुगवलेले असतात

दहावीचे मार्क्स हे फुगवलेले असतात ..आज ते समाधान देतात ...पण ते फसवे आहेत .आई -वडिल , विद्यार्थी खुश दिसतात ...पण ते तेवढेच घातक आहेत ...हे एका अभ्यासकाचे मत आहे ...तुम्हाला काय वाटते ?




Nisha Chousalkar, Manas Waghmare, Kavita Tikekar and 2 others like this.


Padmashree Rao
kharay sir. 10th, 12th, university madhe pratham alele vidyarthi ayushyachya race madhe kuthe pochtat yacha kahi nem nahi.. Aaj jagat abhyasat agdi mage aslele pan tarihi aplya kartutvacha thasa jagatik stharawar umtavnare anek udyojak n ty...ani kelelya parishramatun milavlela ghavghavit yash lokana dista. Mulat apli shikshan padhat magasleli ahe. tyatla kitisa dnyan apan vastavik jivanat waparto? tyatla kitisa aplya parikshebaher lakshat rahta? jya vishayanchi awad ahe tyach kshetrala yogya margadarshan, abhyas n pudchi watchal yaat jar tya vidyarthyane yash sampadan kela tar khara samadhan manla jau shakta.. paha patatay ka...


Subhash Vishwanath Inamdar tumche mat patle....bhawana pochlya

Mangesh Ingawalepatil HO BAROBAR AHE

Prakash Jamdhade he chukiche mat aahe............


Subhash Vishwanath Inamdar kay chkichye?....bola

Bhagvat Sonawane
हो अगदी खरं आहे. १९९० सालात मला ८८ टक्के मिळाले होते, याचा अर्थ मी नेहमीच ८८ टक्के मिळविणारा होतो असे नव्हे. नेहमी ६० च्या आसपास घुटमळणारा मी अचानक ८८ वर गेलो त्याचे कारण तेच तेच प्रश्न आणि तीच तीच उत्तरे पाठ करून रट्टे मारले होते. तदनंतर म...ी कधीही मी ६० च्या वर गेलो नाही कारण तितकी घोकमपट्टी करायला वेळ नसायाचा. एकमात्र खरे की केवळ दहावीच्या मार्कांमूळे मला डायरेक्ट पुण्यापासून २५० कि.मी. दूर खेड्यातून विदयापीठ रोड वर च्या शासकीय तंत्रनिकेतनात आणून ठेवलं. ८-१० हजारात ३ वर्षे शिकता आला. ते ही कूठलीही एक्स्ट्रा शासकीय सवलत न घेता.... थोडक्यात काय एकदमच टाकावू नसतात सगळ्या गोष्टी...कूठे ना कूठे फायदा होतो.....
Prakash Jamdhade
prathamatah jivnat kadhitari aai wadil tya markamule sukhi hotat......mulancha swatahwaril vishwas wadhato aani bhavishyala changlyaprakare samore jatat.........jari marks mhanaje sarva kahi nasale tari tyala artha matra aahe he nakaryach y...eu shakat nahi ...mhantat ki marks na milvita hi to yashswi zala he chukiche aahe tyache praman khup kami aahe .............mark milvitanna mulanna je abhyasache walan lagate tyatunach pudhe doctor, enginner, scientist janmala yatat ......jar he ghatak aahe ase konache mhane asel tar mag band karahi shikshan padhatti aani jaga ranati aani dhyayvirhit jivan...........shevati nanyala don baju astat ....jasi drushti tashi srushti......shevati tumhich tharava????????See More
2 hours ago · LikeUnlike
o
Padmashree Rao
Jamdhade sir, majhya mhananyacha chukicha samaj karun gheu naka. Shikshan he mulatah vyaktichya jadanghadanicha paya asto he apan sarva mantoch. pan tya palyache gun kay, tyache man kashat ramte, tyala kuthlya vishayat jast ras ahe, he janu...n ghetlyashiway tyala baljabarine palak sangtil to vishay nivdava lagto.
Apan paper madhe anek news wachto, kami mark padle mhanun mulane/ mulini atmahatya keli, PARIKSHECHA TENSION yeun mulane atmahatya keli...
mag hi padhat modhit kadhayla nako ka? Aaiwadil ka khush hotat yache karan char lokat firun mala umagle.. Hallichya kalat khara anand, tya mulacha ujwal bhavitavya vagare nantar, mitraparivarat naak unch jhala hi bhavna jast mothyapramanat ahe..
Rag manu naka, spasht boltey tyabaddal, competition mhanje fakt marks milavne, n pahila yene evdhech ahe ka? N Sonawane saheb bolalyapramane "Ghokampatti" karun abhyas hot nahi, to manane n awdine karava. Ka Asha mulana baljabri akdemod karayla lavaychi, jyana kala kshetrat ras ahe?
90+ milale ki science n 60+ milale ki arts, madhla sagla patta commerce he sarras chalte..
Mag 90+walyane commerce kiva arts vishay nivadla ki tyala murkhat kadhle jate.. Peer pressure, parental pressure, ya saglyat ugach evdhe marks milavle hi bhavna mulanmadhe nirman hote.
Ithe pahile alo ki apeksha wadhtat n tya wadhatach jatat.kadhichya kali chukun ti apeksha bhangli tar kay hot asel he tumhi hi janta..See More
2 hours ago · LikeUnlike
o
Prakash Jamdhade shevati pratek goshtila apvad ha astoch ..................sagalech ja ekach kshetrat yashswi nahi hou shakat sunil gavskarne je kele te rohan ne pan kelech pahije he mhanane chukichech aahe ....shevati kai sangalech RANCHODDAS (RANCHO ) nastat.


Padmashree Rao
tyathi apvad ahet. dhyey nischit karun, kartutvavan n hushar parents chi hushar mule aplya ayushyache dhyey adhich nischit kartat. ha apvad faar kami mulanmadhe adhalto pan ti yashasvi hotat. karan tyanchi disha tharavnare tyanche palak tit...kech saksham astat.

Sadhya paristiti nahi ka kahi pramanat aajkalchya IDOLS mule jhaleli. Vegveglya tv channels warun jhalaklele he chehre, karyakram sampla ki gadap houn jatat. kiti tari vela ghavghavit yashanantar apayash pachavne jad jate.. Negative bolat nahi ahe. pan ya satyawar panghrunahi ghalta yet nahi.. Dosh kunachach nahi. Shikshan padhatit farak padla tar nakkich bhavitavya ujwal hoil yachi purna khatri ahe..
Savita Athare its quite true,our 45 students got above 90% marks thais year, but dont know how many will keep it in 12th std??their age factor, environment,friend circle & so many other factors affect on their marks, as I know,

Sunday, June 26, 2011

भक्तिची शक्ती




रविवारी पुण्यात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या मुक्कामी दाखल झाल्या...लाखो वारकरी भावभक्तीची पताका हाती घेऊन.. मुखाने विठ्ठल नामाचा गजर करीत मिळेत त्या जागी आपली मुक्कामाची दिंडी घेऊन...पुणेकरांच्या विशाल मनाचे...पुण्यनगरीतल्या दानशूरांचे दर्शन घडवत .... वारक-यांची सगळी सोय करीताना पहाणे.....हा दुर्मिळ योग....या शहरात अनुभवला गेला.
संख्या कितीही असली तरी या निमित्ताने राजकीय, सामाजिक, सेवाभावी आणि विविध संघठनांचे फलक गल्लोगल्ली फडकत होते. उद्देश एकच वारक-यांची सेवा...
दरवर्षी प्रत्येक दिंडीचा मुक्कामाचा पत्ता एकच असतो.. कुणी बंगल्यात..तर कुणा आपल्या चाळीत..तर नाना पेठेतल्या मशीदतही मुक्कामाची, रहाण्याची आणि भोजनाची सोय केली जाते...
जात धर्म पंथ नसे उरे कांही
भक्तांची सेवा हाची उद्देश
पालखी आली की पांडुरंग पाऊस आणिल याची वारक-यांना खात्री असते...यंदा आता तरी पावसाने चिंब केले नसले तरी आपली उपस्थिती दर्शविली...
दिंडीत दरवरर्षी वाढ होत असते.. यंदा तर आयटीची दिंडी निघाली.. वारक-यांचा उत्साह पाहिला...त्यांचे हरिभक्तित गुंतलेले रूप पाहिले की, हे चैत्यन्य देणारी शक्ति नक्की चराचरात आहे याची खात्री होते.
तुम्ही साधे किलोमिटर चाला तुम्ही दमाल . थकाल..
पण हे भक्तिचे वारकरी हातात तुळशी वृंदावन..खांद्यावर आपले ओझे..हातात टाळ...अशा अवस्थेत रोज ३० ते ५० किलोमिटरचा प्रवास करत पंढरपूरकडे आनंदात नाचत, गात मोठ्या भक्तित तल्लीन होत चालत असतात...
कधी रिंगणात..तर कधी आपल्या दिंडीत नाचत असतात...
एके काळी यात वृध्द जास्त दिसत..पण आज तरूण... नोकरदार,,,स्त्रीवर्ग ..डोईवर मुलाला घेऊन निघालेला शेतकरीही दिसेल....यातच भर म्हणून की काय याचे आकर्षण वाटणारा परदेशी पाहुणा वारकरीही सहभागी होताना पाहिले की हे काही विलक्षण आहे.. वेगळे रसायन आहे.. हा भक्ति शक्तिचा वेगळा जिवंत आविष्कार घडतोय याची खात्री पटते.
महागाईचा राक्षस आवासून असताना... सारी चिंता..सारी भिती...सारी काळजी दूर सारून हा एवढा जनसमुदाय पंढरीच्या वाटेवर चालत निघालाय..हे चैत्यनमयी चित्र..प्रेरणादायी आहे...
एका बाजूला रोजचे जगणे हाच एक चिंतेचा विषय असताना असा लाखोंचा भक्तिसागर टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करत विठ्टलाचा धावा करत पंढरपूरच्या दिशेने चालतो..धावतो आहे....काय आहे हे?
चाल त्यांची एकच ध्याती
अवघी विठ्ठल मुखी म्हणती
भावभक्तिचा सारा तो सुकाळ
मोहमाया दूर पळून जाय
काय वर्णू खुंटती ते शब्द
पंढरीच्या पाडुरंगी ठाव देवा
पालख्यांच्या मुक्काम सोमवारी सासवडच्या दिशेने चालू लागेल... जनांचा हा प्रवाह असाच पुढे चालू लागेल...हिच शक्ति ठरलेल्या वेळी...मुक्कामी दाखल होईल...चिंता चित्ती नाशवंत देहीचा हा प्रवास कित्येक शतके सुरू आहे....सुरू राहणार...
या शक्तिचे विराट दर्शन घडविणा-या त्या वारक-यांचा भक्तिला प्रणाम...
त्याच्या बहुरंगी व्यासंगाला प्रणाम...
घडो हिच सेवा...मज वाटे भास
होऊन भक्तरूप...घेई ध्यास

सुभाष इनामदार, पुणे
Mob- 9552596276
subhashinamdar@gmail.com