Monday, December 5, 2011

आनंदपंढरीचा विठ्ठल


भारतरत्न, स्वरभास्कर, कलासम्राट स्व. भीमसेन जोशी यांचे चरणी
सविनय, अर्पण.
आपल्या गायनक्षेत्रातील असामान्य पराक्रमाने भारतवर्षाची कीर्ति वाढविणा-या व अभिमानपूर्वक निर्देश करण्यायोग्य अशा ज्या व्यक्ति प्रभूकृपेने आम्हला लाभल्या त्यापैकी आपण एक आहात.
श्रेष्ठ विभूतीप्रमाणे संगीतक्षेत्रातील आपले स्थान एकमेव आहे.पुणे नगरी आपल्या ऐन उमेदीतील कार्यक्षेत्र झाले व येथील दीर्घकाळ वास्तव्यामुळे पुणेवासियांना आपल्याविषयी पराकाष्ठेचा अभिमान व आत्मभाव वाटत आला आहे.
संपऩ्न होण्याचे अनेक योग टाळून त्यात मोहवश न होता दूर सारले, ही आपली पुणेकरांवरील एकनिष्ठता व प्रेम आपल्या लौकिकाला ऊज्वलता आणित आहे.


आपण गायन कलेत सम्राट व संगीत क्षेत्रात महर्षी झालात. अनेक अनिष्ट योग उतारवयात सहन करुन
, आपण रसिकांसाठी, संगीताचे ज्ञानसत्र, `सवाई गंधर्व संगीत महोत्सवा`च्या रुपाने वयाच्या ८८व्या वर्षापर्यंत चालू ठेवले..याहुन अधिक स्थितप्रज्ञतेचे उदाहरण क्वचितच सापडेल.
सतत ६५ वर्षे आपल्या अभिजात अतुलनीय गायकीचे स्वरुप कोणत्याही लौकिक मोहाला वश न होता आपण निर्भेळ व सोज्वळ ठेवले आणि अनेकप्रकारच्या विरोधी वातावरणाला न जुमानता आपण परंपरेच्या कलोपासनेचा कर्मयोग अखंड चालू ठवला , हा आपला आदर्श रसिकांना स्फूर्तिदायक व कलाकारांना मार्गदर्शक झालेला आहे.

आपल्या विशिष्ट गायनकलेचे वर्णन करणे शब्दाच्या सामर्थ्याबाहेरचे आहे. आपल्या कलेचे स्वरुप तसे हिमालयाएवढे भव्य आहे.आपल्या गायनप्रकारात नृत्याचे लालित्य, शमशेरीची फेक, मल्लाचे डावपेच, नदीप्रवाहातले गांभीर्य व सागराची अथांगता आढळून येते. शिवाय आपली अगाध बुध्दीमत्ता व योजनाचातूर्य इत्यादी असामान्य गुणविषेशामुळे `स्वरभास्कर`, `भारतरत्न` या पदांवरुन द्रष्टा या दिव्य ध्रृवपदाला आपण पोहोचला आहात.

`सवाई गंधर्व संगीत माहोत्सवा`मुळे, तसेच महाराष्ट्रातील व विशेषतः पुण्यातील आपल्या सूदीर्घ वास्तव्यामुळे संगीत कलामंदीराची अनेक नविन दालने जिज्ञासू कलाव्यसंगी लोकांना ज्ञात होऊ लागली व त्यामुळे तरुण पिढीच्या गायनवेलीवर विविधता येऊ लागली.संगीतक्षेत्रातील आपली ही प्रभावी सत्ता संस्मरणीय होणारी व चिरकाल स्मरणात राहणारी आहे.

गायनकलेच्या स्वरसम्राट पदावर दीर्घकाळ असूनही आपल्या ठिकाणी अहंभाव अणुमात्र नव्हता. या आपल्या गुणाचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. या आपल्या राहणीतील प्रतिष्ठीतपणा, भाषेतील तटस्थपणा, समतोल गुणग्राहकता, अल्पज्ञाविषयी वत्सलता इत्यादी गुण आदर्शवत् होते.
भारतीय संगीत कलेचे एक असामान्य वैभवशाली प्रतिक या भावनेने नम्र होण्यायोग्य एक महान विभुती आपल्या रुपाने आम्हास दीर्घकाल लाभली यातच पुणेकरांना अभिमान वाटतो.
ईश्वर आपल्या आत्म्यास शांती , हीच क्षीचरणी प्रार्थना...

साश्रुनयनांनी....

आपले पुणेकर रसिक.



शब्दांकन- मनोहर देशमुख ,पुणे
9850371464

सहज भेटलेलं ते फुल


अशा एका अवचित क्षणी `ती` भेटते..
तुमची ओळख होते
थोडं पुढं जावून स्पर्श करुन बघण्याचा आदेश येतो..

स्पर्श वाढत जातात
जादुभरी बोटं फिरू लागतात
तुम्ही तुमचे रहात नाही
तुम्ही कुणाचे तरी मन
त्याचे विचार ऐकत असता...

सहाजिकच त्यातच हरवून जाता..
हुरहुर लागते. ओढ वाढते.. त्या वेदनाही मग गोड वाटू लागतात..
क्षणांचा सहवास... अधिकाधिक लाभावा अशी इच्छा होवून जाते.
तृप्ती होत नाही. अधुरेपणा सतत जाणवतो..
तिचे मन नव्हे.. तीच तुमच्यापाशी रिती होत असते..

भावना संवेदना बोलल्या जातात.
थोडं ओझं वाटतं. पण ते समजून घेणचं
पहिल्यांदाच वेगळं काही अनुभवून सोडतं.

तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याशिवाय घागर
एकमेकांची नाती अस्पष्ट दिसू लागतात
समाज यालाच प्रेमाची उपमा देत असावे.
सहज भेटलेलं ते फुल हुंगावसं वाटतें....

आणि मग.....


subhash inamdar
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, December 4, 2011

माझे `मी` पण


माझे जगणे कुणासाठी
स्वताः.च्या मनासाठी

माझे रुसणे कुणासाठी
माझ्यातल्या `मी`साठी

माझे अस्तित्व कुणासाठी
सत्य, सुंदर `त्या`साठी

माझे जीवन कुणासाठी
माझ्यावर प्रेम करणा-यांसाठी

माझे `मी` पण कुणासाठी
तुझ्यातल्या `त्या`साठी

आज प्रत्येक जण काही खास कारणाने सतत धडपड करत असतो..कारण काय?..कुणासाठी...मला सहज सुचलेल्या ह्या ओळी...पहा..तुमच्याही भावना कदाचित याच असतील...


subhash inamdar
subhashinamdar@gmail.com
9552596276