Monday, February 20, 2012

आनंदाचा सुस्कारा..


सभागृहात शांतता होती.. सारे लोक कान आणि डोळे एक करुन स्वर साठवित होते. चेह-यावर तृप्तीचे भाव अगदी स्पष्ट दिसत होते. त्यांनी जसा पहिला सूर व्हायोलिनमधून आळवला तसा सारा श्रोतृवर्गही तेवढाच उल्हसित झाला.


...
केवढ्या तरी मेहनतीने त्याने तो दिवस ठरविला होते. स्थानिक निवडणुकांच्या सभा आणि घरोघरचा प्रचार सुरु होता.
रविवार असला तरी सकराळी दहाची वेळ होती.

त्यातच लग्नाचा मूहूर्त..आणि तोही शेवटचा.... अनेकांचे फोन त्याला येत होते. आम्ही येणार होतो..पण काय करणार....त्याच्या लग्नाला जायलाच हवे...

तोंडावर येतो म्हणू चहा-कॉफिचा आग्रह करणारे हेच ते सारे..आता काढता पाय घेत यायला तयार नव्हते..

--------------------
त्याने जिद्द सोडली नाही....कलावंतालाही धीर दिला. तुम्ही तुमचा कार्यक्रम उत्तम करा बाकी मी पाहतो....सागितले..त्यांच्यात उमेद दिली. ठरल्या दिवशी कार्यक्रम केला.. काय होईल...पैसे कमी मिळतील.
त्यातून निधी फारसा उभा नाही रहाणार इतकेच...

मात्र अर्धा अधिक हॉल भरला...नामवंत काही हजर झाले. कौतुकाची थाप मिळाली ..
आणि आता तो आता पुढे रंगणार हे नक्की झाले..
त्याने आनंदाचा सुस्कारा सोडला....

No comments: