Thursday, August 30, 2012

शब्दही जखम करू शकतो..


काल सहज एका मित्राबरोबर दुपारच्या लंचला बसलो असताना. एक सहज विषय निघाला.
नोकरी सोडल्यावर खर कळतं की खुर्चीला मान असतो..तुम्ही त्या खुर्चीवर असता म्हणून लोक विचारतात...अन्यथा तसं तुम्हाला कोणी विचारत नाही....सारे काही खोटं आहे..ही दुनिया खोट्यांनी भरलेली आहे.

इनामदार, तुमचे म्हणणे बरोबर आहे...पण तुम्हाला नाही का वाटत..त्यातूनही जो तुम्हाला आज एखादा जण विचारत असेल..तुम्ही आहे त्या परिस्थितीत तुमच्या पाठीशी असेल तर त्या एकावर हा अन्याय नाही का होणार...


मी चमकलो..खरचं..हा विचार केलाच नाही. आपण सरसकट विधान करुन मोकळे झालो..
त्यातून मला वाटते..तो समोरचाही मित्र दुखावण्याची शक्यताही नाकारतचा येत नाही. पण असो , तो मित्र आहे..तो रागावणार नाही आमि गैरसमजही करुन घेणार नाही...

माझे डोळे उघडले. एका क्षणात.


आपण सहच म्हणून कांही विधाने करतो...पण त्यामुळे खरचं त्यातून कुणी दुखावलाही जावू शकतो. शेवटी आपण सहजपणे कुणावरतरी टिकेची दोन वाक्ये बोलून टाकून निराळे होतो...पण त्याची खूण इतरांना किती बोचत असेल याचा जराही विचार करीत नाही...


आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिचे निराळे स्थान असते. कोण केव्हा उपयोगी पडेल काही सांगता येत नाही. तुमच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या काळात तुमच्या संपर्कात येणारा माणूसही तसाच असतो..तो पुन्हा कधी भेटेल आणि तुमची मदत करेल काही सांगता येत नाही..तुमच्या काळातही तो तुमच्या चांगल्यासाठी आणि इतरांच्या फायद्यासाठी काही मागत असेल..त्याचा अर्थ असा होत नाही..तो तुमच्या खुर्चीसाठी तुमच्याकडे येतोय....

इथून पुढे बोलताना जरा सावधपणे असणे आवश्यक कारण...

तोंडातून गेलेला प्रत्येक शब्दही कुठेतरी जखम करू शकतो..हे ही मान्य करायला हवे...


सुभाष इनामदार,पुणे..

subhashinamdar@gmail.com
9552596276

1 comment:

Unknown said...

अप्रतिम.