Monday, September 3, 2012

मनात येतं





सहजपणे अलगद ढग बनावे
नक्षत्रांच्या देशात घडतय तरी काय
ते जवळून अनुभवावं..
आकाशात मजेत
हवा बनून रहावं..
सारखं कुणालाही अलगद बिलगावं..

देहाची ती गोडी
सोडी ती साधी
होऊनी आकाशी
भरारी घ्यावी..

धुक्यातून फिरावं..
आसमंतात विहरावं.
स्वच्छंद जगावं
मुक्तपणे...

वारा हुंगावा..
पावसाच्या ढगातूनच पाणी चाटावं.
दुरवर बसून..
पृथ्वीवर काय होतयं
सहजपणे बघावं.

मीपण विसरुन सारे झाले भासमय
नात्यातली दरी
तुटलेली दोरी.
पतंगाला ढील
गतीला वेग
इंद्रधनुष्यातच बसावं.
रंग झेलावे..
ओढून घ्यावे..

सारे वाटले काय झालं.
सुखाची सवय दुखाःची झालर
इकडून गेली तिकडे ओढली..
सारी पृथ्वी तेव्हाही हळहळली...




सुभाष इनामदार,पुणे

No comments: