Sunday, September 16, 2012

लोक कोळसा प्रकरणही विसरतील.....

सुशीलकुमार शिंदे


"लोक बोफोर्ससारखे प्रकरण विसरले. त्याचप्रमाणे कथित कोळसा प्रकरणही विसरायला वेळ लागणार नाही,'' अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री व लोकसभेचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज कोळसा प्रकरणावर टिप्पणी केली..




अशी प्रकरणे करणारे आणि त्यात सामिल असलेले लोक यांचे यामुळेच फावते..
खर सांगा माननीय शिंदेजी,लोकांना केवळ मतांचा अधिकार आहे..ते त्यातुन या प्रश्नाची उत्तरे देतात..पण हे सरकारी पक्षाचे लोक हे विसरतात..की त्यांना मतदारांचे प्रश्न आणि देशापुढीस अडचणी आणि आर्थिक संकटात सापडलेल्या ..महागाईच्या खाईत बुडालेल्या नागरीकांनी त्यांच्यासाठी निवडून पाठविले आहे...


अण्णा हजारेंसारखे नेते लोकांची निदर्शने करुन संसदेला जागे करतात...तरीही देशातील सत्ताधारी पक्ष याकडे लक्ष देत नाहीत. सातबारा देण्यावरून पुण्यातील संबंधित अधिकारी पैसे घेताना रंगे हाथ पकडला जातो..अनेक प्रकरणे करणारे मंत्री ,सरकार सत्ता भोगित राहते...काय करु शकतो...


शिंदे साहेब लोकांच्या लक्षात सारे असते...
पण ते लक्षात आहे हे दाखविण्यासाठी त्याच्याकडे मार्गच नाही...
म्हणून तर सारे घडते..हे तर दुदैर्व..

दुसरे काय ?


आम्ही सारे विसरतो
म्हणून तर यांचे फावते
जनतेच्या पैशावर उड्या मारणारे
त्यांच्याच खिशात हात घालतात..
तेही डोळ्यादेखत...
आम्ही फक्त पहातो..टिपतो...
पण हेच आम्ही पेटून उठू..
हे ही ध्यानी ठेवा...
ज्वालामुखी निद्रिस्त आहे..
त्याला तसाच ठेवा..




subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276


"लोक कोळसा विसरून जातील,' असे विधान गमतीने केल्याचे सांगून "कधी कधी गंमत अंगलट येते' असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी कराड सांगितले.
शिंदे येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले, ""मी नुकताच एका ठिकाणी गमतीने बोललो होतो, की लोक कोळसा विसरून जातील. रात्रीच्या शाळेत माझ्याबरोबर शिकलेल्या मित्राच्या सत्काराच्या वेळी त्याने कोळशावर टीका करून लोकांना हसवले होते. त्यावर मी "हात धुतले, की काळे डाग निघून जातात,' असे बोललो होतो. मात्र, कधी कधी गमतीचा भागही अंगलट येतो.''

No comments: