Sunday, September 9, 2012

दिव्यत्वाची प्रचिती


कुणास ठावे किती काळ ते
येथे आता जगणे आहे.
किती दिसांची ही संगत आहे

इथे उदेला कोणी तो तो
जाण्यासाठी जगला
आयुष्याची बळकट दोरी
जीवनभर चिंती जाळी

जितेपणी ते कधी साधीशी
मरणातून मुक्त
इथे घडाया आज पाहिजे
क्षण तरी तो सुप्त..


काय घडावे कुठे पळभरी
थांबायाचे नाही..
जीवनातूनी आला तेव्हा
गणीत दिसांचे होई...

वाट संपता..खोल दिसे ती
दरी दाट वृक्षांची
कुठे जाणे..परतुनी येणे
ती दिव्यत्वाची प्रचिती...



-सुभाष इनामदार,पुणे




दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती

यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती
मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती !

No comments: