Friday, February 3, 2012

When Violin sings..for the aid of lok biradari of Hemalkasa





Sanskutik Pune, proudly announce the launching of Musical bonanza `Violin Gaate Tenvha..` on Sunday, February 12 by renowned violinist Mrs. Charusheela Gosavi.
Since last 38 years, Dr. Mandakini and Dr. Prakash Amte, (email.- lbp@sancharnet.in) (website:http://lokbiradariprkalp.org/) along with their family members have been striving hard for the upliftment and health of the aboriginals of the remote Gadchiroli District. To fulfill the social commitment and to pay a tribute for the great cause, Mrs. Gosavi has created a spacial programme.


The programme is dedicated to noted Composer and Musician Late Anil Mohile.


Since last 32 years, Mrs. Gosavi presented classical violin concerts at various places. She worked in BSNL, Pune., She has been honored with Gold Medals 22 years in a row , in All Indian classical violin completion, organised by BSNL. She has assisted in over 2500 sami classical musical programmes and above 100 programmes independently. ( Her father and renowned musician Shri Bhalchandra Dea is a deciple of Pt. Gajananbua Joshi, Mrs. Gosavi has picked up the heritage from her father).
Mrs. Gosavi will present famous songs from Marathi and Hindi lilm, devotional songs, Lawni( maharashtra fold) and semi classical from musical theatre. She has planned similar programs in several cities of Maharashtra, under the banner of `Sanskrutik Pune`
(http://culturalpune.blogspot.com/.http://facebook.com/subhash.inamdar).

The series launching programmer will be the Bal Shikshan Socitey`s Auditoriam (Mayur Colony, Kothrud,Pune) on Sunday 12 Feb. 2012 at 10 am. The tickets for show will be available in Rs. 100/- and Rs. 50/- at Navadikar Musicals, Near Grahak Peth and in Kothrud(Opp. Yeshwantro Natyagraha) and Shrish Traders, opp. Kamala Neharu Park (9422306670). the tickets will also be available at the auditorium before the show.








Contact- Subhash Inamdar-9552596276, Arvind Telkar(9881098390), Mrs. Charisheela Gosavi(942101999)


http://www.culturalpune.blogspot.in/2012/02/blog-post.html

http://lokbiradariprakalp.org/

Tuesday, January 31, 2012

डोळे जणू...






होय डोळे बोलतात..
मनात काय चाललयं ते हे सांगतात.
राग आला तर ते मोठे होतात.
हासताना त्या कोमल छटाही दाखवितात.


समोरच्या माणसाचे असणे योग्य की नकोसा तेही सांगतात हे डोळे.
डोळ्यात पाहिले तर बाहेर न येणारे अश्रुदेखील दिसतात.
मनातल्या वेदनाही डोळ्यावाटे एकही शब्द न बोलता बाहेर येतात.

डोळे अनुभवतात हे प्रत्यक्ष चराचर जग.
आणि मिटल्या डोळ्यांनी दिसते ते भासमय मोहक जग देखील.
डोळे आहे म्हणून हे सारे पाहू शकतो.
डोळ्यांना सृष्टी दिसते म्हणून तर त्याचा म्हणजे निसर्गाचा मोह वाढतो.

आर्तता ही डोळे दाखवतात.
विस्फारुन भावना तिथेही प्रकटतात.

डोळ्यांनी जग पाहताना त्याची वरवरची कृत्रीमताही डोळ्यातून बाहेर येते.
म्हणूनच डोळ्यांनी उघडतात मनाची सताड दारे...


डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे...
डोळे हे जुल्मी गडे रोखून मज पाहू नको..
कितीतरी गाणी मराठी कवी-गीतांच्या रुपाने लोकांच्या डोळ्यावर आली आहेत.

डोळे माणसाला घडवितात
हवे तेही पहायला लावतात
नको तेही वाचायला शिकवतात.
लडीवाळपणे प्रेमही करायला लावतात
आणि त्यातली प्रखरताही तेच व्यक्त करतात.


क्षणात ते रुपे बदलू पाहतात
भारावलेल जडपण सहजपणे दाखवितात.
रस्ता लांबचाही ते दाखवितात..
तर जवळच्या वस्तुही नेमक्या दर्शवितात.

डोळ्यांची भाषा वाचण्य़ासाठी..ती बोलण्यासाठी
आधी ती ओळखावी लागते..उमजून ,समजून घ्यावी लागते.
त्यासाठी डोळे म्हणजेच सृष्टी ज्ञान हवे

माणसाला असणारे हे चक्षु जेव्हा बिघडतात
तेव्हा डोळ्याममोर येतो तो चष्मा,,
मग तो चारडोळ्यांनी भावविश्व अनुभवतो...
जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू पाहतो.....




सुभाष इनामदार, पुणे.
subhashiandmar@gmail.com
9552596276

Sunday, January 29, 2012

येणा-या पहाटेला नमस्कार....पण सावधगिरीने`...


शनिवारी पत्रकार संघाच्या सभागृहात ग्रेस बोलत होते

शनिवारी पत्रकार संघाच्या सभागृहात `येणा-या पहाटेला नमस्कार....पण सावधगिरीने`...
असे सांगतच ख्यातनाम कवी ग्रेस यांनी...दुस-या ई-साहित्यसंमेलनातील भाषण सुरू केले....सा-यांचे कान टवकारुन ते काय म्हणतात याकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष होते....अगदी त्यांच्या बाजूला बसलेले युनिक फिचर्सचे सुहास कुलकर्णी काय किंवा.. अगदी कडेला आपल्या डोळ्यातून आणि कवी ग्रेस यांच्या चेह-यावरचे भाव आणि शब्द टिपण्यासाठी उत्सुक असलेले संजय भास्कर जोशी काय.....
तुम्ही सा-यांनी दुर्बोध म्हणून जाहिरच करुन टाकल्याचा उल्लेख त्यांच्या तोंडून आला...पण मला काही फारसे वाटत नाही...आपण या जगात जगतो...मात्र मी माझ्याशी एकांतात रहातो...फारसा या जगात मी नसतो...मी माझ्यातच ..स्वतःच्या धुंदीत आत्ममग्न असल्याचे ते सांगतात...
आता तर मला..रोज मूठभर गोळ्या एकदम खाव्या लागतात..एकेक करुन त्या मला घेताच येत नाहीत...तसा मी लहान मूलासारखा एकदम गीळतो...
बालमुठीत इवल्या
कापून आणली माया...
सांगत ते पुन्हा त्यांच्यात आत मनाच्या गाभा-यातून बोलत जातात..
ते ऐकायला फारच छान वाटते..पण संदर्भ सतत बदलत ते सतत आतल्या आवाजातून नवे घुमारे घऊन बोलत जातात...
तंत्रज्ञान चुकीच्या मार्गाने जावू लागले ते तुम्हाला खलास केल्याशिवाय रहाणार नाही....असा इशाराही ते देतात....
आधिच्या वक्त्यांनी आजच्या काळातील मानवी बुध्दीच्या पलीकडे संगणकीय प्रगत ज्ञान विस्फोटाच्या मार्गावर आहे..पण...माणसाच्या बुध्दीची ते नक्कल करु शकणार नाहीत...म्हणून तर ते आता ज्ञानला पूरक अशी नवी प्रणाली शोधण्याच्या मागे आहेत....
कवी ग्रेस...या प्रगती बद्दल मोजके पण नेमके बोलले...आत्मचिंतनाच्या स्थितीत..आणि वेदनेचा ध्यास उलगडून सांगताना...मला असह्य वेदना होतात..तेव्हा मला इंजेक्शन देऊन टाकतात...मी तेव्हाही माझ्या आत बोलत असतो...असे भावतालची मंडळी सागतात...
उच्छादावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे...पण आयुष्यातला एकही कण वाया जावू देणार नाही असी प्रतिज्ञाही ते इथे घेतात...
या निमित्ताने या आत्मचिंतीत आणि मनस्वी कवीच्या मनात नेमके काय दडलेले आहे..ते सांगणे कठीण जाते...म्हणूनच कदाचित ते दुर्बोध वाटत असावेत...




सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmail.com
9552596276

ई- साहित्य संमेलन


' मी आरसा आहे, पण प्रतिमा नाही, पूर्ण ग्रेस अजून माझा मलाच उमगलेला नाही,' असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी ग्रेस यांनी शनिवारी केले. युनिक फीचर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ई- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

दुसऱ्या ई- साहित्य संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र नॉलेज कॉपोर्रेशनचे एमडी विवेक सावंत यांच्या हस्ते झाले,
'मी जन्मजात बालक आहे, पण त्यामध्येही एक प्राचीन पुरुष मी लपविला आहे. माझ्यातील मुलाला उत्साह सांडायचा नाही, त्याप्रमाणेच प्राचीन पुरुषाला उच्छादही मांडायचा नाही,' असे ग्रेस म्हणाले. प्रौढत्वी निज शैशवास जपणेे, या केशवसुतांच्या ओळी मी रोज अनुभवतो आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या तंत्रज्ञानामुळे सर्वकाही मिळविणे शक्य झाले आहे. पण, तंत्रज्ञान चुकीच्या मार्गाने गेले, तर माणुसकीला खलास केल्याशिवाय राहणार नाही, असेही ग्रेस यांनी नमूद केले.

स्वरांचा नवसाक्षात्कार




स्वरांना आळवत जेव्हा तू गात असतेस
आणि निर्माण करतेस नवे सूर....
त्या वातावरणात ते मी अनुभवू लागतो
तेव्हा तू अधिक मनमोहक दिसतेस...
तु तुझी राहिलेली नसतेस...
तु होतेस त्याची...ज्या विधात्याची
त्याच्याच आज्ञेने तू नवे सूर निर्माण करतेस...

नेहमीची आवरणे..चिता...काळजी..
सारेच मग कसे दूर सारतेस
उरतेस ती सूरांची निर्मिती करणारी एक कलावंत...

मला त्या स्वरांचे असणे नेहमीच आनंद ..
नव्हे.. मीही माझा उरत नाही..असे काहीसे...
गातानाचा लडीवाळपणा...सूरांबरोबर लयीशी खेळणे..
सारेच पाहून ..साठवून ठेवण्याचा प्रयत्न होतो..

पण पुन्हा आटवायला गेलो..ते क्षण नाहीसे होतात..
काहीच न घडल्यासारखे...अस्पष्ट
पुन्हा नव्या मैफलीचे आश्वासक सूर अनुभवयाला मिळतील..
खात्री आहे मला..
तेव्हही मला तूझ्या नव्या स्वरांचा नवसाक्षात्कार होईंल...



subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com