Saturday, May 5, 2012

एक चळवळीचा पत्रकार-निखिल वागळे



लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारा पत्रकार-संपादक आज आय बी एन मराठी चॅनलचा स्टार म्हणजेच निखिल वागळे. कुठल्याही मराठी पत्रकार-संपादकाला अभिमान वाटावे अशी लोकप्रियता मिळवित आहे. शनिवारी डिएसके गप्पात निखिल वागळे यांची दिलखुलास गप्पात रंगून गेले होते....तेच निमित्त होते... त्यापैकी जे माझेकडून टिपले गेले ते मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न..



आपले थेट प्रश्व राजकारणी मंडळींना झोबतात..मात्र राजकारणातला , किंवा कुठल्याही क्षेत्रातला भ्रष्ट्राचार थांबत नाही...आपण प्रश्नातून त्यांचेकडून थेट प्रश्वाची उत्तरे मिळवायचा प्रयत्न करतो...त्यासाठी प्रसंगी रांगडी भाषाही वापरतो..पण यातून फारसा बदल होत नाही..आपण शब्दाच्या माध्यमातून थेड भिडतो...पण ही समाजव्यवस्था..
राजकीय गुंडगिरी बदलण्यासाठी शब्दांचे शस्त्र करुन काहीही होणार नाही. त्यासाठी समाजात चळवळ उभी राहिली पाहिजे. समाजप्रबोधन कार्यकरणारे लोक पुढे यायाला हवेत. मी फक्त एक चळवळीचा पत्रकार आहे....

निखिल वागळे यांच्याशी राजेश दामले आणि उज्ज्वला बर्वे यांनी विविध प्रश्नातून वागळेंची मते त्यांच्या शैलीत मांडण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली.



अक्षर दिवाळी अंक, नंतर दिनांक साप्ताहिक त्यानंतर महानगरचा प्रवास....आणि आता आयबीएन लोकमतची खास वागळे शैली याचा साराच पाढा उत्सुकतेने त्यांच्या तोंडून ऐकता आला..

बड्या वर्तमानपत्रात काम न करता स्वतंत्रपणे स्वतःची ओळख निर्माण करण्याचे त्यांचे धेय्यच त्यांच्या सगळ्या कारकीर्दीचे मूळ ठरले.

आपल्या चॅनलवरुन लोकांचे प्रश्न मांडतो. त्याची उत्तरे राजकारणी किवा संबंधीतांकडून माझ्या पध्दतीने उलगडण्याचा प्रयत्न करतो...कांही मूल्ये जपत..हा व्यवसाय म्हणून केल्याचे ते अभिमानाने सांगतात.

आजची माध्यमे बड्या भांडवलदारांच्या हातात आहेत. पैसे घालणा-या लोकांच्या तालावर ती चालताहेत हे दुःख आहे.
मुलाखत घेताना त्या माणसाची किवा प्रश्नाची माहिती घेऊनच जाण्याचा अभ्यास करत आहे..त्यांच्याशी भावनिक आपलेपणा निर्माण करावा लागतो..मग ते खुलत जातात....याचे उत्तम उदाहरणा म्हणून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीचे दिले. त्यामुलाखातीचा इतिहास त्यांनी साद्यंत खुलवून सांगितला.

नारायण मूर्ती, अभय बंग, प्रकाश आमटे, मेधा पाटकर, आण्णा हजारे यासारख्या लोकांशी बोलताना खूप बरे वाटते..ते समाज घडविण्याचे काम करत आहेत. दुःख आहे ते विरोधी पक्षांची ताकद , ते नेते नाहीत याची.. आणि राजकारणात चाललेल्या खोटेपणाचा..

आज जे चित्र आहे ते आपण बदलू शकत नाही याचे मोठे दुःख आहे...
त्यासाठी आपली धडपड आहे...
आपण कधीही राजकारणात जाणार नाही
कारण आपला धर्म पत्रकारितेचा आहे..




सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, May 1, 2012

अंधारल्या वाटेवरचे दिवे थोडे पुसूया


कधी कुणाचे रक्त आज तापत का नाही
भल्यांना बुरे म्हणाणा-यांनो मागे वळून का पहात नाही?

प्रत्येक पावला-पावलात रोज इथे काटा बोचतो
एक काढायला जाता दुसरा दत्त म्हणून सहज खुणावतो

काट्यातून मार्ग काढत कुढत आपण सारेच जगतो आहोत
प्रकाश असून अंधारात सापडल्यासारखे सारेच रोज ठेचकळत आहोत.

खरचं कुणालाच वाटत नाही यातून काही मार्ग असेल?
चिवचिवणा-या चिमणीलाही घास कुणी भरवत असेल

बस्स, आता सारे काही पुरे झाले
जीवनात आता जगणेही मुश्कील झाले

करु पुकारा, हाक द्या
सारे मिळून एक होऊन
आता सारे बदलूया
अंधारल्या वाटेवरचे दिवे थोडे पुसूया.....

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276