Tuesday, May 8, 2012

`फायनल ड्राफ्ट ` बघितलं आणि भरुन पावले


अनेकवेळा चुकामुक होऊन …फायनली आम्ही काल गिरीश जोशींचं `फायनल ड्राफ्ट` हे नाटक बघितलंच
(न बघता मेले असते तर जोशींच्या मानगुटीवरचं भुत झाले असते!) आणि भरुन पावले.

घट्ट संहिता, कलाकारांचा अतिउत्कृष्ट सहज नैसर्गिक अभिनय , नेटकं दिग्दर्शन यांनी नटलेला हा अतिशय देखणा प्रयोग केवळ दोन कलाकारांनी आपल्या जीवावर उठावदार करुन टाकला.

बरेचदा असं होतं की बहुप्रतिक्षित/चर्चित नाटकं/सिनेमे प्रत्यक्षात आपला भ्रमनिरास करतात .पण , सुदैवाने गिरीश जोशींच्या कलाकृतींच्या बाबतीत एक रसिक प्रेक्षक म्हणुन मला कधीही निराशा आली नाही. मला वाटतंय त्यांच्यातील गुणवत्ता, सादरीकरणाचा सातत्याने Perfect व्यावसायिक प्रयत्न , कमालीची शिस्त , सच्चेपणा आणि कुठेही तडजोड न करण्याची सवय… याआणि अशा अनेक गोष्टी कारणीभुत असाव्यात .

फायनल ड्राफ्ट हे नाटक स्क्रिप्टरायटिंगचा कोर्स जॉइन केलेली एक कनफ्युज्ड विद्यार्थिनी आणि तिला यातनं बाहेर काढण्यासाठी धडपडत असलेला शिक्षक यांच्याभोवती फिरते. पण हळुहळु शिक्षकच कनफ्युजनमधे अडकत जातो . शेवटी दोघांमधे प्रचंड भांडण होतं, एकमेकांच्याबद्दलची परखड मतं तोंडावर बोलली जातात कटुपणाने आणि काही काळापुरती दोघांची अजिबात भेट होत नाही.पण या भांडणाने त्यांना आत्मपरिक्षण करताना नकळतच साक्षात्कार होतो स्वत:मधील आंतरिक प्रेरणेचा. कुठेतरी Stagnant झालेला , थोडा ‘मी’ पणाच्या गर्तेत सापडुन सहजता हरवुन बसलेला मुळात चांगला लेखक असलेला पण शिक्षकाचा बेगडी मुखवटा अडकवलेल्या या शिक्षकाला स्वत:चा शोध लागतो . त्या मुलीला देखिल स्वत:चा सुर सापडतो.

खरंतर आपल्या आयुष्यात भेटणारी अनेक Difficult माणसं/प्रसंग आपण टाळत असतो ,पण यातच तर खरं आपल्या Paradigm Change किंवा Complete Transformation चा धागा दडलेला असतो हे आपल्या लक्षात येत नाही. नाटकातली ही दोन Difficult माणसं एकमेकांचा आरसा बनुन आपआपला चेहरा बघतात व आपल्या प्रगतीपथातला खरा अडसर आपण स्वत:च आहे याची जाणिव होते आणि मग परिस्थिती किंवा आजुबाजुच्या व्यक्ति यांना दोष देण्यापेक्षा , त्याचे सतत दोष शोधत बसण्यापेक्षा, उगाचच भांडण्यापेक्षा फक्त स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रित करुन नवनिर्मिती करणेच श्रेष्ठ काम आहे हे जाणवतं त्यांना (व आपल्यालादेखिल !)

नाविन्याचा ध्यास असलेल्यांना अनेकदा कळत नसतं की हे सगळं कस्तुरीमृगासारखं आहे ..असतं स्वत:जवळच पण जाणवत नाही….. एक अतिशय वैचारिक (पण कुठेही दुर्बोध/जडजंबाळ नसणारं)नाटक रंगभुमीला दिल्याबद्दल

Hats Off to you Girish Joshi & Mukta Barve

-नीता दिनेश प्रभू



Smita Thorat -खरंतर आपल्या आयुष्यात भेटणारी अनेक Difficult माणसं/प्रसंग आपण टाळत असतो..पण यातच तर खरं आपल्या Paradigm Change किंवा Complete Transformation चा धागा दडलेला असतो हे आपल्या लक्षात येत नाही.. वा.. नीता.. अगदी नेमकं बोललीस तू.. क्या बात है! मी पाहिलंय आणि अनुभवलंय 'फायनल ड्राफ्ट'.. अत्यंत प्रगल्भ.. सुबक प्रयोग.. मुक्ता आणि गिरीश.. दोघंही केवळ लाजवाब.. रंगलेली वैचारिक जुगलबंदीच.. सुंदर..

Ravi Lakhe- मी खूप पुर्वीच ते पाहीले आहे. मराठीतले ते एक मोठे नाटक आहे. educating Rita, The lesson..ह्या नाटकाचा फॊर्म असाच आहे.

आस्था प्रमिला सुरेश- ys vry true thk for sharing on fb

Yogesh Raut -First of all I congratulate you for this note. Very well written. Now if the drama is so good then this is my next target. You can start writing in news paper.

Sai Tambe ‎Neeta Dinesh Prabhu- kharach khup sundar natak aahe v abhinay pan laajabaab

Neeta Dinesh Prabhu- ‎Yogesh Raut, Thanks for the compliment & surely I'll work out on your suggestion. अजुन एका गोष्टीसाठी खुप बरं वाटलं की माझी नोट वाचुन तुला आता नाटकं बघायची इच्छा झाली आहे. ..आणि चांगली अभिरुची जाणुन-बुजुन रुजवावी लागते हे खरंय नं...

Jitendra A Dasharathi- Neeta, khup chan lihilayas. Abhinandan!



Neeta Dinesh Prabhu ‎Kavita Mahajan, तुमचे Like मिळालं...धन्य वाटलं ...मनापासुन. B'se I respect you so much.
3 hours ago · Like
Kavita Mahajan ‎- जे चांगलं आहे त्याला दाद दिलीच पाहिजे, जी तुम्ही दिलीत आणि ती मला आवडल्याचं मीही सांगितलं. इतकंच.

Monday, May 7, 2012

गप्पांची सुरेल सांगता आनंद भाटेच्या भैरवीतून



रविवारची संध्याकाळ डिएसके गप्पांनी रंगत गेली ती एक संगीतकार आणि एक गायक अशा दोन कलाकालाच्या आविष्कारानी. योगायोग म्हणजे आजच बालगंधर्व चित्रपट प्रकाशित होऊन वर्ष झाले आणि दुसरे म्हणडे बालगंधर्व चित्रपटातल्या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्य़ानंतर आनंद भाटेचा पहिला जाहिर कार्यक्रम ऐकण्याचे भाग्य पुणेकरांना लाभले.
गप्पांची आजची सुरवात झाली ती शाकुंतल नाटकातल्या पंचतुंड नर रुंडमालधर या बालगंधर्व चित्रपटातल्या नांदीने अर्थातच ती सादर केली आनंद भाटे आणि गप्पांचा समारोपही झाला तोही बालगंधर्व चित्रपटातल्या भैरवीने. चिन्मया सकल ह्दयानी....


सुरेल कार्यक्रमात नव्या दिशेने रचनांकडे किंवा कवितेकडे पहाणारा एक तरुण संगीतकार कौशल इनामदार यांच्या मनमोकळ्या उत्तरानी. त्यांच्या दृष्टीने मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करतोय..आणि मी स्वतःची अशी वाट निवडली आहे.. मला माझ्या गुणदोषांसह स्विकारा.. आज आपण जुन्यातले जे उत्तम ते आज लोक विसरत चाललेत...आणि संगीतात स्वतःची वेगळी वाट निवडली आहे... जुन्या संगीताकडेही नव्याने पाहण्याची माझी सवय आहे..म्हणूनच मी पुलंच्या भिल्लण या सांगितिक कार्यक्रमाला नवा टच दिला. आचार्य़ अत्रे यांच्या झेंडूच्या फुलाकडे वेगळ्या नजरेने पाहिले..आणि बालगंधर्व चित्रपटातल्या गाण्यांकडेही स्वतःचा पारंपारिक तरीही जुने जपण्याचा प्रयत्न केला आहे..

कौशल इनामदारच्या मते आनंद भाटेला गळा आहे..आणि आपल्याला नरडं आहे. आपण गायक नाही...फक्त कसे पाहिजे ते दाखविणारा संगीतकार मात्र आहे..

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या मराठी अभिमान गीताचा संगीतकार म्हणून झालेला प्रवासही त्यांनी ऐकवला...रसिकांनी त्याला टाळ्यांनी दाद दिलीच आणि त्याने गायलेल्या गाण्यांनाही तेवढीच पसंतीचा पावती दिली.
गप्पांचा हा फड हलता आणि सुरेल संवादातून जिंकला तो आनंद गंधर्व आनंद भाटे यांने. एम टेक होऊन झेन्सर मध्ये चाकरी करुन तेवढ्याच ताकदीने शास्त्रीय. संगीताचा रियाज करणारा हा तरुण गायक नट अधिक लोकप्रिय ठरला तो बालगंधर्व चित्रपटातल्या नाट्यपदांमुळे...भारतरत्न पं., भिमसोन जोशी यांचेकडे २० वर्षे शिकून शास्त्रीय संगीताचा पाय भक्कम केला आणि त्यांचे ऋण आनंदाने मिरव तोही आता तेवढाच संतवाणी गाण्यात तयार असल्याचे त्याने कान्होबा तुझी घोंगडा चांगली यातून सिध्द करुन दिले. रागसंगीताबरोबरच भीमसेन जोशी यांचेकडे मैफलीत कसे गावे ते शिकायला मिळाल्याचे तो सांगतो.

संगीताची ही मेजवानी खुलविण्यात ज्या साथीदार कलावंताचा प्रत्यक्ष सहभाग होता त्यांचा उल्लेख अतिशय महत्वाचा व आवश्यक आहे. हार्मोनियमची साथ करत होते बालगंधर्व चित्रपटाचे सहाय्यक संगीतकार असलेले आणि कौशल इनामदारांचे महाविद्यालयापासूनचे मित्र असलेले आदित्य ओक. तबला संगत केली ती पुण्याचे अनुभवी तबलावादक संजय करंदीकर यांनी ...तर माऊली टाकळकर.ज्यांच्या टाळाशिवाय संतवाणी होणार नाही,असे ज्येष्ठ बुजुर्ग कलावंत.

गप्पाची मैफल गतीमान केली ती राजेश दामले यांच्या सूत्रातून आणि प्रश्नातून..विविध ट्प्पायंवरचा प्रवास दोन कलावंताकडून त्यांनी उलगडून दाखविला.. त्यात रसिकाची उत्सुकता होती आणि संवादची साखळी होती.

डीएसके फाउंडेशनचे ट्रस्टी श्याम भुर्के यांनी गप्पांची आघाडीची बाजू सांभाळत याचा उद्देश स्पष्ट केला. मॅजेजिस्टि गप्पा बंद झाल्या आणि साहित्यिक गप्पांची उणीव जाणवली. चार दिवस का होईंना..कला, साहित्यिक आणि संगीत आणि राजकारणाचा फड डीएस के गप्पात रंगू लागला..त्याला आता १५ वर्षे झाली...आज त्याची सांगता आनंद भाटेच्या भैरवीनी झाली आणि पुढच्या वर्षीच्या गप्पांसाठी वाट पहाताना नव्याचे वेध होते..



सुभाष इनामदार, पुणे