Monday, July 2, 2012

खरा गुरु..खरा मित्र...


आयुष्य घडण्यासाठी योग्य गुरुची आवश्यकता नक्कीच असते..तो शिक्षक, आई-वडील, साथीदार नाहीतर मित्रही असू शकतो...मित्र कोणाला म्हणायचे...जो सुख-दुःखात तुमच्या सोबत असतो....आयुष्याच्या प्रत्येक वळणावर..जो तुम्हाला योग्य वाटेकडे घेऊन जातो...तो तुमचा गुरु म्हणायला हरकत नाही..आज असे मित्र फार कमी असतात..जे सतत तुमच्या तुमचे हित...तुमची चिंता याची सतत त्यालाच जाणीव असते..

मित्राची साथ तोच दाखवितो आयुष्याची दिशा...तोच घडवितो..तो बिघडवितोसुध्दा ..आज चैनिच्या जमान्यात मित्र भेटतात ते स्वतःची शान मिरविणारे..स्वतःची हौस भागविण्यासाठी दुस-याची साथ घेणारे...सच्चा मित्र तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा धरत नाहीत.ते फक्त मित्राचे हित पहतात..
आज गुरूच्या आठवणी आळविण्याच्या त्यांची पूजा करण्याचा दिवस... ज्याची करावी सेवी..त्याचा खावा मेवा... आज ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही...सल्ला देणारे खूप आहेत..पण तुमची इच्छा..तुमचे शिक्षण आणि तुमचा अनुभव या सर्वांचा विचार करुन तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी तुमचा विचार करतो...तुमचे हित पहातो....म्हणूनच तो गुरू म्हणून संबोधणे योग्य होईल...

गुरूचा विश्वास आणि गुरूची शाबासकी मिळविणे फार कठीण..तो मवाळही हवा...पण प्रसंगी कठोर व्हायला हवा..दिशा देता देता...स्वतःघडतो आणि तुम्हालाही घडवितो...

असावे गुरूचे ते ज्ञान..
परि असावे सारे सज्ञान..
करुनी दिव्यदृष्टीचे आकलन...
सर्वांसाठी..



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276