Thursday, August 30, 2012

टपल्या आणि टिचक्या




कधीकाळी मी पीडीएत होतो...तेव्हाची आठवण व्हायचे कारण..कल्याणी या ज्योत्स्ना देवधर यांच्या नाटकात आम्ही काही जण ज्यांना रंगमंचाच्या मागे काम करायची नेमणूक झाली होती...त्या नाटकात काम करणा-या हौशी ज्येष्ठ कलावंत यांचा काल मला अचानक फोन आला..त्यांचे ८४ वर्षांचे पती गेले. त्यांची बातमी कुठे देता आली तर पहावी...
सुमारे १७ वर्ष त्या बिबवेवाडीतून गावात रहायला आल्या पण मला पत्ताही नव्हता... आणि अचानक माझी आठवण...
असो..त्यांचे काम सुख,दुःख याच्या पलिकडचे आहे..ते करायला हवे..पण कुठली गाठ केव्हा पडते ते सांगता येत नाही...हेच खरे..
मदत शक्यतो सर्वांना करीवी ...तीही निरपेक्ष...अखेरीस तिच तुमची ओळख असते..


-------------------------------
फुलांच्या गंधानी घाय़ाळ करावे
असे माझे मन चिंब भरलेय
सारीकडून एकच गलका
कुणातरी झाडावरुन पडलंय...

------------------------


गेल्या पावसाची गोष्ट
धो धो कोसळत
चक्क मला भिती दाखविली
यंदा मात्र तो फिरकलाही नाही...

--------------------------

आज सकाळी या खालील दोन ओळी मनात आल्या चालीसह..

मनास माझ्या का दिसावे ?
स्वप्न उरे ते अधुरे व्हावे ...

यापुढे काही सुचलेले नाही..तुम्हाला कांही सूचत असेल तर जरुर सांगा..

Deepak Sudhakar Kulkarni
आभाळाने भरून यावे,
ओल्या हिरव्या खांद्यांवरती,
दिलवराचे गोंदण हळवे


Awadhoot Deshpande
वेली फुलांनी बहरून यावे,
चिंब मनाने मोहरून जावे
स्वप्नांच्या त्या हिंदोळ्यावरती
प्रेमराग मधुर आळवून यावे!

-----------------------------





रोजचे जगणे निराळे
रोज नवा छळ
रोज तेच घड्याळ
रोज नवा खेळ

रोज तोच डबा
तेच सारे मित्र
रोज कामाचा ताण
रोज तेच आकडे खेळ



रोज हवा नवा थाट
रोज हवा नवा ध्यास
रोज नव्याने व्हावे
रोज स्वप्नांचे थवे

आज दिवस वेगळा
आजचा खेळ वेगळा
वेगळ्या वातारवरणात
भासतोय ताजेपणा...

-subhash inamdar.pune

--------------------
थोडं धाडस दाखव..
मनासारखं वाग..
सततचे दडपण झुगारुन दे..
ताण घेतला आहेस..

थांब..जारा विचार कर..

जन्म एकदाच लाभतो..
मग कुणासाठी पुढची संधी येणार..
याच जन्मात मुक्तपणे जग
जगासाठी नव्हे..स्वतः साठी..

मोकळेपणा खरं तर तुझ्यात आहे..
काही वर्षात मात्र तो हरवलीस..
आता मागचे सारे विसरुन जा..
मनसारखे जगत जा...!

subhashinamdar@gmail.com

-----------------------------------
आजही मोहरुन येतं मन
जेव्हा तू मला सुंदर म्हणतोस
बहरलेल्या पारिजातकासारखे
स्वच्छ अहे तुझे मन..पारदर्शी.
निखळ..काहीसे उथळ..
तरीच मला सतत वाटते
तुझ्या त्या नजरेतही मी दिसते..
इतकी सुंदर...खरचं..सांग ना..

-------------------------------

येणारा प्रत्येक सूर
गळ्यातून काढता यायला हवा
इतरांसाठी नाही तरी स्वतःसाठी
आनंद मनमुराद लुटायला हवा.

------------------------

इतकं डोकावून पाहताना वाटतं.
काहीच शिल्लक उरणार नाही.
काही वेळाने पाहिले..
तर तिथे तिळमात्रही उरणार नाही..

-------------------------

नाती जपण्यासाठी मनं मोठी असावी लागतात
मनाला स्वतःची अशी जागा नसते
दुस-याच्या भावनेत त्याचे पाय अडकलेले असतात
भावनेला समजून घतले की सारे कसे मनासारखे होते.
अशाच भावनांना सांभाळून
राखून,
शक्य असेल तेव्हा सांधून नवी नाती निर्माण करा...
तीच आयुष्यात उपयोगी पडतील..
इति-
सुबाष इनामदार, पुणे

-----------------------------

राज्य सरकारचे लेचेपेचे धोरण
नशीबी आहे महाराष्ट्राच्या
म्हणून वाढतीय गुन्हेगारी
होताहेत आंदोलने आणि निघताहेत मोर्चा
जनता रडती आहे..

पावसाने बेजान झालीय
महागाईने जर्जर
आहे का त्यांना त्याची काही पडली..
ते आपल्या आरामदायी महालात पहूडलेत

पण एक दिवस त्यांचीही वेळ येईल
मग पळता भुई थोडी होईल..
मग कितीही धावा केला
तरी कुणीही ढुंकूनही पाहणार नाही..
सावधान..वेळ भरत आली आहे...

-subhash inamdar,Pune

----------------------------




कोरी पाटी घेऊन जसे आपण शाळेत बसतो..तसेच जीवनात आहे..
तिथेही प्रत्येक दिवस ..क्षण आणि काळही नवे धडे देत असतो...
ते टिपून घ्यायचे कौशल्य जर दाखविलेत..
तर तुम्हाला सारे काही न मागता मिळेल..

इति- सुभाष इनामदार, पुणे

-----------------------

पानं उलटतात
मनं पालटतात
कालचं आज
सारेच विसरतात

------------------------
जगात न्याय नक्की आहे..
तुम्ही दुस-याला फसवलत..की समजा.. तुम्ही नक्की फसणार..मात्र तो काळ सांगून येत नाही..तो येतो आपल्या पावलाने..
स्वतः चर एखादा माणूस कसल्याही कारणावरुन ..स्पष्टच सांगायचे झाले पैशाच्या व्यवहारात...स्वतः फसलेला असेल..तर तो
स्वतः मी नाही बुवा त्यातल्या...दाखविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने मी नाही हो असे केले हे सांगण्यासाठी त्याचा डंका पसरविण्याचा प्रयत्न करतो...त्याच्या हे तेव्हा लक्षात येत नाही..तो स्वतःसाठी त्यात खड्डा खणत असतो..
गोष्ट उघड्या पडू लागल्या की मग त्याचा सारा खरे पणा आमि फोलपणा बाबेर येतो...मग सारं बिंग बाहेर येते...
न्याय नक्की आहे..पण तो वेळेवर मिळत नाही हे खरं...न्यायालयातही तारखा पडून .खेटा घालून..न्याय मिळतो...पण तेही..दिर्घकाळाने तसेच हे आहे..
-सुभाष इनामदार, पुणे

------------------------------

शब्दही जखम करू शकतो..


काल सहज एका मित्राबरोबर दुपारच्या लंचला बसलो असताना. एक सहज विषय निघाला.
नोकरी सोडल्यावर खर कळतं की खुर्चीला मान असतो..तुम्ही त्या खुर्चीवर असता म्हणून लोक विचारतात...अन्यथा तसं तुम्हाला कोणी विचारत नाही....सारे काही खोटं आहे..ही दुनिया खोट्यांनी भरलेली आहे.

इनामदार, तुमचे म्हणणे बरोबर आहे...पण तुम्हाला नाही का वाटत..त्यातूनही जो तुम्हाला आज एखादा जण विचारत असेल..तुम्ही आहे त्या परिस्थितीत तुमच्या पाठीशी असेल तर त्या एकावर हा अन्याय नाही का होणार...


मी चमकलो..खरचं..हा विचार केलाच नाही. आपण सरसकट विधान करुन मोकळे झालो..
त्यातून मला वाटते..तो समोरचाही मित्र दुखावण्याची शक्यताही नाकारतचा येत नाही. पण असो , तो मित्र आहे..तो रागावणार नाही आमि गैरसमजही करुन घेणार नाही...

माझे डोळे उघडले. एका क्षणात.


आपण सहच म्हणून कांही विधाने करतो...पण त्यामुळे खरचं त्यातून कुणी दुखावलाही जावू शकतो. शेवटी आपण सहजपणे कुणावरतरी टिकेची दोन वाक्ये बोलून टाकून निराळे होतो...पण त्याची खूण इतरांना किती बोचत असेल याचा जराही विचार करीत नाही...


आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिचे निराळे स्थान असते. कोण केव्हा उपयोगी पडेल काही सांगता येत नाही. तुमच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या काळात तुमच्या संपर्कात येणारा माणूसही तसाच असतो..तो पुन्हा कधी भेटेल आणि तुमची मदत करेल काही सांगता येत नाही..तुमच्या काळातही तो तुमच्या चांगल्यासाठी आणि इतरांच्या फायद्यासाठी काही मागत असेल..त्याचा अर्थ असा होत नाही..तो तुमच्या खुर्चीसाठी तुमच्याकडे येतोय....

इथून पुढे बोलताना जरा सावधपणे असणे आवश्यक कारण...

तोंडातून गेलेला प्रत्येक शब्दही कुठेतरी जखम करू शकतो..हे ही मान्य करायला हवे...


सुभाष इनामदार,पुणे..

subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, August 27, 2012

`विभोर` या कविता संग्रहाचा `देखणा` समारंभ




हिशोब करता
आयुष्याचे
हाती उरतो
एक कवडसा...

असे म्हणत म्हणत मूळच्या पुण्याच्या पण पतीच्याबरोबर तीन खंडात ( त्रीखंडातही म्हणायला हरकत नाही) फिरस्तीपणाने जीनव जगलेल्या ...
पुण्याच्या अभिनव महाविद्यालयाची पदवी संपादन करुन आता केवळ शब्दांत इमले उभारणा-या...
उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या `विभोर` या कविता संग्रहाचे कालच्या आणि आजच्या पिढीच्या आघाडीच्या कवीयत्री अरुणा ढेरे यांच्या हस्ते झोकात प्रकाशन तर झालेच..




मराठी भाषेपासून दूर जाउनही नवे शब्द..नवी चाहूल
देत मराठी कवींच्या मांदायळीत एक आश्वासक नाव घेऊन आपल्या याच संग्रहातल्या कांही कवीतांना घेऊन संगीतकार मिलिंद जोशी यांनी संगीतबध्द केलेल्या मराठी अल्बमचे साग्रसंगीत अगदी दणक्यात पं. प्रभाकर जोग यांच्या हस्ते याच समारंभात अनावरण केले गेले.



अगदी अरुणा ढेरेंच्या शब्दात सांगाय़चे म्हणजे `देखणा` समारंभ पुणेकरांच्या साक्षीने `विभोर`मय झाला होता.

नवखेपणाच्या खुणा त्यांच्या कवीतेते जवळजवळ नाहीत असा आश्वासक सूर लावून अरुणा ढेरेंनी त्यांच्या कवीतेतल्या विलक्षणपणाची स्तुती केली... ती करताना त्या सांगतात, ` त्यांच्या कवीतेतून कानांना आणि डोळ्यांना पंचेद्रियांची ताकद मिळते, जगण्यातले बारकाने शांतपणे कवीतेतून व्यक्त करण्याची उज्जला अन्नछत्रे यांची तडफड त्यांच्या कवीतेत जाणवते..जगण्यातले हरवलेपण या कवीतेत पकडणारी ही कवीता असल्याचे सांगून त्यांच्याकडून अधिक मागणी करावी अशी विलक्षण ताकद स्पष्ट होत असल्याचे त्या सांगतात. शब्दातला अनुभव संगीतकार मिलिंद जोशी यांनी तेवढ्याच ताकदीने पोचविल्याचा उल्लेख त्या आवर्जून करतात.

यानिमित्ताने या कवीता संग्रहाला प्रस्तावना लिहिणा-या डॉ. निलिमा गुंडी, पं. प्रभाकर जोग, उत्कर्षचे सुधाकर जोशी, सीडीचे निर्मीते फाऊंटन म्युझिक कंपनीचे संचालक कांतीभाई ओसवाल, रविंद्र साठे, रघुनंदन पणशीकर, आणि यामागचे महत्वाचे नाव म्हणजे अरुण अन्नछत्रे सा-यांनी समारंभाला रंगत आणली.




मिलिंद जोशी यांनी संगीत दिलेल्या चार गीतांची झलकही संगीताच्या ट्रॅकवर उपस्थितांना ऐकता आल्यामुळे कवीतेचा पोत आणि त्याला लाभलेले सुरेलपण अनुभवता आले. रुद्रतांडव अशा शंकराच्या विविध तालवाद्यातून निघालेले निनिद आणि त्याला सुयोग्य अशी दमदार , तडफदार शब्दांची जोड देऊन रघुनंदन पणशीकरांनी ते इतके सुंदर नटविले आहे की, त्या गाण्यासाठी का होईना ही सीडी विकत घ्यावीशी वाटेल...एकूणच संगीत देताना शब्दानां अधिक सुरेल करताना भारतीय वाद्यमेळीतून वातावरणाला आणि शब्दांना पोषक अशा सूरावटी तयार करुन त्या तेवढ्याच ताकदीच्या गायकांकडून गाऊन घेऊन हा अल्बम ऐकण्यासारखा सजविला आहे...


रविंद्र साठे, रघुनंदन पणशीकर, अन्नछत्रे यांची सध्या रोमानियात बारावीत शिकत असलेली कन्याका चैतन्या हिने या सीडीत एक नवोदित गायिका म्हणून घेतलेला सहभाग हा अभिमानाचा भाग होता..तिनेही यातल्या दोन कवींतांना आपल्या आवाजात सादर केले.



स्वतः उज्ज्वला अन्नछत्रे यांनी या सीडीत आपल्या आवाजत कवीतेचे वाचन करुन त्यातली तरलता आणि शब्दमाधुर्य रसिकांपर्यत पोचविले आहे.




उज्ज्वला अन्न्छत्रे यांची कालची अवस्था त्यांच्याच शब्दात सांगायची म्हणेज..

स्निग्ध सावळ्या अंधारी मी
माझी मजला सापडते
माझ्याशी हो ओळख माझी
नाते मजसी मम जुळते...



अशी झाली होती...आपल्याच कवीता ऐकताना त्या मलाच समजावून सांगताहेत असा भास होत असल्याचे त्या सांगतात.
संगीतकाराने कवितेचा आवाज व्हायचे असते.. एका ओळीत संगीतकाराचे या सीडीतले स्थान समर्पक शब्दात मिलिंद जोशी यांनी मांडले.

आपल्या प्रस्तावनेत डॉ. गुंडी या कवितांचे आणि कवयीत्रीचे मर्म सांगतात. त्या लिहितात, कवयित्रीकडे कवीतालेखनासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता, रचनेला चैतन्याचा स्पर्श देणीरी उत्स्फूर्तता आणि कवितेला आशयाची डूब देणारी चिंतनशीलता असल्याची ग्वाही यातील प्रत्येक कवितांमधून मिळते. या कवितांमध्ये आई आणि मुलगी असा आधिच्या आणि नंतरच्या पिढ्य़ांशी असलेला स्त्रीत्वाचा अनुबंध व्यक्त करणा-या रचना आहेत. निसर्गचित्रांनीही हे विश्व संपन्न आहे. यातील निसर्गचित्रे तरल आणि भावविभोर आहेत...( स्वत कवयित्री उत्तम चित्रकार असल्यामुळे पुस्तकाचे कव्हर आणि आतली चित्रेही त्यांनीच रेखाटली आहेत.)

`विभोर`च्या निमित्ताने मराठी भाषेची नाळ कायम ठेवणा-या असंख्य कलावंतांना आणि साहित्यिकांना तसेच कवींना मनोमन सलाम करावासा वाटतो...इथे आम्ही इंग्रजाळलेपण जपत भाषेचे मूळ सौंदर्य विसरत चाललो आहोत..पण उज्ज्वला अन्नछत्रेंसारखे अनेकजण ती भाषा..तीचे आपले पण संस्कृती आणि तिचा लहेजा सांभाळतातहेत..वाढवित आहेत.....आम्हाला त्यांचा अभिमान आहे.





`विभोर`च्या समारंभात गायक रविंद्र साठे, संगीतकार मिलिंद जोशी, पडद्यामागचे सूत्रधार अरुण अन्नछत्रे, सौ. उज्ज्वला अन्नछत्रे, नव्याने गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केलेली चैतन्या अन्नछत्रे आणि गायक व संगीतकार रघुनंदन पणशीकर....




सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596726

Sunday, August 26, 2012

ए के हंगल एक आठवण



ए के हंगल सरांची एक आठवण जपली गेली आहे माझ्याकडनं... इप्टा या नामवंत नाट्यसंस्थेतर्फे हंगल साहेब काम करायचे, तशी इप्टाची पुण्याई मोठी, परंपराही दिमाखदार.. बलराज सहानी, दीना पाठक, शबाना आझमी नासीर.. किती नावं घेऊ?

तर प्रेमचंद लिखित गोदान या विदीर्ण करणार्या कथेवर ईप्टाने एक दीर्घांक सादर केला त्यात हंगल सर घरातले बुढे बुजुर्ग दाखवले होते, मराठीत नाना पळशिकर तसे हिंदीत हंगल सर

गोदान ही दळीद्री शेतकर्याच्या कुटूंबाची कैफियत, घरात अठराविष्व दारिद्य्र
माणूस मेला म्हणजे तो जिवंत होता याचं लक्षण मानायची वेळ

रंगभवनला गोदानचा प्रयोग होता, रविवार सकाळ दहा वाजता ,तरी गर्दी होती कारण इप्टा या संस्थेचं नावच तसं होतं
तर त्या दिर्घांकात असा एक प्रसंग रंगवला होता की दादू(हंगल सर) शेतात
काम करता करता घेरी येऊन पडतात. लगेच त्याना खाटेवर टाकून घरी आणण्यात येतं ( अर्थात हे सगळं सिंबाँलीक, आपण समजून घ्यायचं पण कलाकारांचा अभिनय असा जिवंत की समजून घ्यायला कष्टच पडायचे नाहीत)तर दादूना घरी आणण्यात यतं खाटेवर बसवलं जातं.. मुलं म्हणतात "दादू अमे हम जात रहा..कासीको भेजैदे दोपार टले पे... हंगलसराना उत्तरा दाखल फक्त हाँ हाँ म्हणून मान हालवायची होती ते कुठल्या तंद्रीत होते देवजाणे उत्तरा दाखल ते म्हणाले ओके ओके... ओके? ओके? अडाणी देहाती म्हातारा शेतकरी उत्तरा दाखल ओके ओके म्हणतो?

फार कुणाच्या लक्षात आलं नाही पण राजा बुंदेला आणि सरोज मिश्रा दोघानी कान टवकारले डोळे लकाकले.. खुदू खुदू हसू पसरलं प्रसंगाचा रसभंग झाला नाही पण... सांगायला एक किस्सा मिळाला

पण प्रयोगानंतर हंगल सरानी नटराजाच्या मुर्तीसमोर स्वता:च्या तोंडात मारून घेतली चहा काय पाणी सुद्धा प्यायला ते तयार होईनात

आताचे कलाकार रंगमंचावर चुकले की त्याला डेली वाटणं असं म्हणतात आणि त्यात फुशारकीही मारतात...काय बोलणार?

-चंद्रशेखर गोखले,मुंबई.

(फेसबुकवरुन साभार)

https://www.facebook.com/chandrashekhar.gokhale.7/posts/428971113806011?notif_t=close_friend_activity