Tuesday, November 20, 2012

भावना



कधी भावना हेलावतात
कधी त्या दुखावतात
कोणत्या नात्यातूनही त्या
शब्दातूनही व्यक्त होतात.

कोण म्हणते भावनेला मोल नसते
भावना काबुत ठेवण्यासाठी
त्याला वैचारिकतेचे मोल लागते

आयुष्य पुढे जाते ते या भावनेतूनच
कधी ते भावनाविश्व लहान
कधी ते स्वतः भोवती 
भावना निर्माण करते

बाहेरचे जग केवळ भावना मानते
त्यातच गुंतून रहाते

जगाला भावना नसतात
त्यांना असतात फक्त चेहरे
दिसणारे..
आणि सतत बदलत रहाणारे

आता केवळ भावना आहेत
काही काळानंतर
त्या कृतीतूनही व्यक्त होतील
तेव्हा ओळखा वेळीच
आणि सावध रहा..


-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gamil.com
9552596276