Monday, February 18, 2013

आहे हा असा आहे...



खरचं आज किती दिवस झाले. चपलांनी आता थांबायची विनंती केली आहे. पण कुणास ठावे त्यांना कधी कच-याची टोपली दिसणार. ..
कितीही घरचे किंवा मित्र म्हणाले तरी नवे काही खरचं घेतले जात नाही.
विचार येतो..आत्ताच त्याची गरज आहे काय?

अगदी जीर्ण झाल्याशिवाय जुनी टाकून नवी घ्यायची नाही ..हा जणू पण असल्यासारखे..
प्रत्त्येकाला वाटते टेचात रहावे. इतरांवर प्रभाव पडावा असे झकपक रहावे.. अंगावर सेंट मारावा. झोकात , ऐटीत मिरवावे..
खर सांगू मला असे कधीच वाटत नाही..कारण शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा...
जुने दिवस आठवतात.. खिशात फारसे काही नव्हते तेव्हाही हे सारे असेच घडत होते. पैसा खर्च करताना याची आत्ताच आवश्यकता किती आहे ..हाच पहिला विचार येतो...आजही..
सहज लक्षात आली म्हणून सांगतो..
कामावर असताना..मला वरिष्ठांकडून बोलावणे आले...आहो, तुम्ही आता एका विभागाचे प्रमुख आहात. पायात बूट..कपडेही टापटिपीत आणि टाय वगैरे वापरत चला..तुम्हाला जर पैशाची अडचण असेल तर कंपनी परतफेडीच्या बोलीवर तेही देईल..
मी..त्यांना उलटटपाली निरोप पाठविला..की मी दिसण्यासाठी काम करत नसून कामासाठी आहे...मी असे कपडे वापरीन जे नोकरीनंतरही मला माझी ओळख देतील...तेव्हा हा विषय पुन्हा माझ्यासमोर नको...
झाले तेच..पुन्हा हा विषय निघाला नाही..पुढे अनेक वर्ष मी जसा आहे तसाच वावरलो..समाजात आणि त्या कार्यालयातही..
मला स्वतःला असे वाटते...कपड्यानी माणूस शोभतो..पण ते दिसणे यापेक्षाही कामातून दिसलात तर अधिक प्रभाव पडतो....
म्हणून सारे दिवस..हे असेच..विचार आणि रहाणीमान...
याला तुम्ही साधेपणा म्हणा वा शिष्टपणा...
मी आहे हा असा आहे... ना खंत..ना त्याचा खेद..



-
-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com

9552596276

No comments: