Thursday, March 7, 2013

तिने सोसले बहुत..


माझ्या डोळ्य़ासमोर आत्ता चित्रपट पहावा असा प्रसंग समोर घडतोय...
सकाळपासून सर्वांच्या आधी ऊठून घरसारवण्यापासून ..पाणी बोहरुन आणण्यापर्य़ंत सारी कामे बिनबोभाट चालायची..मुखी यायचे केवळ देवाचे नाम ययवेगवेगळ्या स्तोत्रातून..कधी ंयकटेश. तर कधी हनुमानाचे....
तोंडात राम आणि
कामात हात
आपल्याला या घरी दिल्याच्या कधी तरी तिली पश्चाताप व्हायचा.. मिळवायच्या नावाने बोंब..किती गोष्टी घालविल्या याची यादीच नाही...किती होते..

सोने-चांदी.पण ते सारे गेले ..
आता अगदी लंकेची पार्वती झाले

पण तो शब्द पुन्हा उगाळत नसे..पुढे काम सुरु..

वर्षाकाठी दोन लुगडी...बस्स

बाकी मागणी अशी नाहीच..
सारे झटायचे ते मुलांसाठी .घरासाठी...
अखेरपर्यंत...सोसले...घालविली संपत्ती..ती हताशपणे पहात आली...पण हालाखीतही माऊलीने माणसं राखली..स्वतःचा स्वाभिमान परकोटीने जपला...लोकांच्या घरी काबाडकष्ट केले..त्यांच्याकडचे शिळे पदराखाली घेऊन आम्हाला खाऊ घातले...



आज आठवले तरी डोळ्य़ात पाणी साठते..
पण त्याही काळातला आनंद माझ्या नजरेत कधीच कमी झाला नाही..
उलट त्या दिवसांनी मला संस्कारित केले...समाजाकडे पाहम्याची दृटी दिली....

आज सारे काही आहे..पण आई नाही....तिची आठवण या शब्दातून काढतो...
जागतिक महिला दिनाच्या दिवशी पुन्हा हेच स्मरण...त्या माऊलीच्या पोटी भरल्यापोटी..जन्म घतली..ही साठा उत्तराची कहाणी....आता कथा बनू पहात आहे..


स्मरते उरी सारे
तुझी आठवण भारी


खरच. स्पर्शातली जादू कुणाजवळ असेल ?
उत्तर एकच... आई !
ममता,माया आणि खरा आपलेपणा
ओलाव्याचा तो स्पर्श
अनेक समस्यांवरचा तो एकच उपाय
आईचा मायेचा स्पर्श !
आईशी भांडलो.. अबोला धरला
पोट बरोबर नव्हते तेव्हा आईने पोट चोळण्यासाठी हात फिरवला
आणि काय आश्‍चर्य इतके छान वाटले की बरे वाटायला लागले.
वय झाले .आकाराने वाढलो.
नोकरीत पद मिळाले
तरी आईच्या त्या हातातील जादूई स्पर्शाने ती किमया घडविली.

लहान होतो पण वजनही भरपूर होते.
सतत कुठेतरी पडायचो.
हाताला,पायाला जखम व्हायची.
एकदा तर रोज दवाखान्यात न्यावे लागायचे.
आईच्या कमरेवर स्वार होउन पट्टी करायसाठी जावे लागायचे.
त्या आठवणी आजही ताज्या होतात.



आजही तीची आठवण होते
मन जाते भूतकाळात,रमतो मी स्पर्शात.
आईच्या त्या आठवतातून काळ उमटतो.
गरीबी दिसते पण टोचत नाही.
मिलोची भाकरी आणि पातळ आमटीत निवडून घ्यावेत अशीच डाळ असायची
पण त्या भाकरी-आमटीची चव कशालाच येणार नाही.
हे घडते त्याची किमयागार म्हणजे आई.
त्या मातेला वंदन,
तीच्या आठवांची सोबत आणि तीच्या स्पर्शाची महती
सारेच आनंददायी आणि अगणतीत असेच.
आई,आज नाही.पण मनात ..घराघराच्या चराचरात भरून राहिली आहे.
माते तुझ्या कुशीत मी धन्य झालो.




-सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com




No comments: