Friday, August 23, 2013

श्रावणात असायचे कहाणीचे पठण.

आजही आठवते ते जुने दिवस...
 श्रावणात असायचे कहाणीचे पठण.
सोमवारी उपवास असायचा संध्याकाळी लवकर भोजन
दुपारी शालेला सुट्टी यवतेश्वरला जाण्यासाठी
सातारच्या बोगद्याजवळ असलेल्या शंकरांच्या मंदिरात ही तोबा गर्दी चालत निघालो की तासाभरात यवतेश्वरी.
 किती भावीकता होती मनात स्वच्छ विचार होते. शंकराच्या पिंडीवर बेल वाहिली की मनालाही शांती मिळायची ...
गरजा कमी होत्या ..पैसाही हाती कुठे होता ...साध्याभोळ्या स्वभावाची माणसे प्रत्येकाच्या घरी असत आई-वडील, आजी-आजोबा, बहीण-भाऊ, सुखाने नांदत
एकमेकांत असूनही खासगीपणाची गरजच नव्हती भाकरी-आमटीची चव पुरणपोळीच्या वरताण होती.
कारण होते एक मनी होते समाधान..माणसात होती तेवढी जाण..
आजही मनात ते दिवस अधिक रुंजी घालतात.
श्रावणातल्या मंगळागोरीने घरे बहरुन जायची..
खेळ खेळणा-या मुलींचा ग्रुप पैसे देऊन बोलवावा लागायचा नाही..सारे कांही मनापासून उस्फूर्तपणे होत असायचे..
वाड्यातले वातावरणही तेवढेच खेळीमेळीचे असायचे.
एकाच्या घरचे कार्य म्हणजे सर्वांच्या घरातला तो आनंद असायचा...

काळाप्रमाणे आनंदही संकुचित झाला..ती घरे नाहीशी झाली..याबरोबरच ती मनेही..
मग विरंगुळा शोधला जाऊ लागला..
सारे कांही वेळेत...फार गाजावाजा न करता...

No comments: