Tuesday, September 17, 2013

आपण हे पाळू या...

आपण हे पाळू या...


आयुष्यात दुस-याच्या दुःखात
आणि सुखात
सहभाग घ्या..
...समाधान सहज मिळेल.

दुस-याला मदत करता आली नाही तरी चालेल...
पण विनाकारण डिवचणे चांगले नाही.

घरात आपल्यापासून इतरांना त्रास होईल
असे वागण्यापेक्षा
त्यांच्या आवडी-निवडी जपायचा प्रयत्न करा..

समाज कार्यात
स्वतःचा स्वाभिमान सोडून तन,मन
आणि जमेल त्या धनाने सामिल व्हा..
मन तृप्त होईल..

आनंदाच्या प्रसंगी आणि
 दुःखाच्या वेळी
मित्र , नातेवाईक आणि शेजारी यांच्याकडे जा...
माणूसपण जपले जाईल...

वेदना, विरह यापासून विरक्ति घेऊन
समाधानात सुख मानून..
मनशांत ठेवा



सुभाष इनामदार, पुणे

1 comment:

Movie Reviews said...

छान!आवडले!