Monday, September 23, 2013

प्रत्येकाच्या मनात ...

शोध घेत आहे..कुठे स्वतःला रमवावं..काय नव करावं ज्यामुळे मनही मानेल आणि काही काम केल्याचा अनुभव येईल..एके काळी काम इतकं असायचं की पडल्यापडल्या कधी डोळा लागला ते कळायचंही नाही..आज मात्र उलटं आहे..आज काय काम काय याचा विचार करावा लागतो. खरं विचार करायचा झाला तर अनुभव असा आहे...कुठलेही काम कमी नाही हे मनात ठरवून काय केलं तर..त्याचा आनंद अधिक घेता येतो.. घरातलीही खूप कामे असतात..ती सहजपणे आपण करुन घरातल्या वातावरणात स्वतःला रमवून घेऊ शकता..


प्रत्येकाचा एक दिवस असतो
तेव्हा कुणी कुणाचा नसतो
उरतो तो स्वतः असतो
विचार न करताही तो दिसतो
मनताही त्याचा विचार पक्का असतो
तिथे कुठलाही अविचार नसतो
फक्त निग्रह कायम असतो

माणसावरचे प्रेम आतप्रोत असते
सारे काही त्या शब्दात सांधते
कितीही झाले तरी त्याचा एक काळ असतो
त्याचा आग्रह मग निग्रह असतो
कुणाचे राज्य त्याच्यावर नसते
तो स्वतंत्रपणे भासत असतो

प्रत्येकाच्या मनात असा दिवस येतो
काहीना काही सांगून जातो
नकळत सारे घडत असते
त्याचेसाठी सारे काही असते
त्याला विचारत सारे काही सुरु असते
त्याचे मत मग महत्वाचे असते


- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: