Saturday, December 24, 2016

आनंद कभी मरता नही..




आनंदरंग कार्यक्रमातून आनंद अभ्यंकर यांची स्मृती जपली...

आपल्या अभिनयाचा सुगंध मागे ठेऊन आनंद अभ्यंकर चार वर्षांनंतरही स्मरणात आहे,.हे पुण्यातल्या आनंदरंग कार्यक्रमाला पत्रकार संघात उपस्थित झालेल्या रसिकांच्या साक्षीने पटले. आनंद अभ्यंकर यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्या मार्फत आनंद ला आठविताना आजही अनेकांचे डोळे पाणावलेले पाहिले..
विशेषतः गेली ४० हून अधिक वर्षे पडद्यामागे राहून प्रकाशातल्या कलावंतांना सहाय्य करणारा भरत नाट्य मंदिराचा कलाकार..विठ्ठल नामदेव हुलावळे यांना या वर्षींचा आनंदरंग पुरस्कार लोकप्रिय अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या हस्ते दिला गेला.

प्रकाशात असलेल्या कलावंतांने पडद्याआडच्या कालवंतांचे असे पुरस्कार दैऊन कौतूक करावे हा विरळा योग यानिमित्ताने जुळून आला.

शुक्रवारी २४ डिसेंबर २०१६वा संध्याकाळी पुण्यातले पत्रकार संघाचे सभागृह तुडूंब भरले होते..तो या आनंदरंगच्या कार्यक्रमासाठी..



आनंदची आई आहिल्यादेवी अभ्यंकर आणि आनंदची पत्नी अंजली अभ्यंकर, मुलगी,मुलगा आणि आप्तेष्ट तसेच त्याचा खूपसा मित्रपरिवार मुद्दाम या कार्यक्रमात अग्रेसर होते.


यावेळी त्यांच्या आठवणी पुन्हा जागविल्या गेल्या.आनंदच्या वाटचालीचा ओघवता आढावा घेऊन त्याचे वेगळेपण सांगणारी अनंत कान्हो , राजेंद्र देशपांडे आणि अभ्यंकर यांचेबरोबर काम केलेले एक सहकारी यांनी घेतला.

विशेषतः वाहतूकीची शिस्त पाळली नाही तर किती दुर्दैवी घटना घडू शकते यांचे आनंद आणि त्यांच्यासह अक्षय पेंडसे यांच्या चार वर्षीपूर्वी एक्सप्रेस हायवेवर झालेल्या घटनेतून समाजाला कळेल..यासाठी वाहतूक चालविताना नियम पाळणे किती महत्वाचे आहे..याची जाणीवही एका चित्रफितीतून नगसेविका सौ. माधुरी कुलकर्णी यांनी एका चित्रफीतीतून सांगितले.

नीना कुलकर्णी यांनी आपला आणि आनंदचा कसा जवळचा स्नंह होता.हे सांगून त्याच्या काही आठवणीही सांगितल्या..
विनिता पिंपळखरे यांनी नीना कुलकर्णी यांच्या रंगभूमि, दूरदर्शन मालिका आणि चित्रपट या तिहेरी प्रवासाची ओळख रसिकांना करून देणारी मुलाखत यावेळी घेतली.

सत्यदेव दुबे आणि डॉ. विजया मेहता या दोन गुरूंकडून आपल्याला मिळालेल्या अभिनयाच्या धड्याविषयी त्या मोकळेपणाने बोलल्याआपल्या नाटका दरम्यानच्या आठवणींनाही त्यानी उजाळा दिला.
अभिनय हे कुणी सहजीपणे करण्याची गोष्ट नाही.त्यासाठी तुमची पुरेशी तयारी हवी..चांगला मार्गदर्शक हवा..आणि तुम्हाला इतरांच्या भूमिकेत जावून तीचे अंतरंग समजून घेण्याची कुवत हवी..असे मत व्यक्त केले..

तासभऱ चाललेल्या मुलाखतीत आपण दिग्दर्शकाची अभिनेत्री असून अत्ता कुठे आपल्याला अभिनयातले बारकावे कळाले लागले आहेत.. हे ही नम्रपणे नीना कुलकर्णी यांनी सांगीतले.
आज दुबे आणि विजया मेहता यांच्यासारखे गुरू नाहीत .ही खंतही त्यांनी व्यक्त केली.




















- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gnail.com

9552596276

Wednesday, December 21, 2016

`आनंदरंग` पुरस्काराचा मानकरी विठ्ठल हुलावळे




नाट्यसृष्टीची गेली ४० वर्ष करणारे भरत नाट्य मंदिराचे पडद्यामागचे कलावंत विठ्ठल नामदेव हुलावळे यांना शुक्रवारी २३ डिसेंबरला दिवंगत अभिनेते आनंद अभ्यकंर यांच्या नावाने दिला जाणारा आनंदरंग पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकलाकार नीना कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्यात पत्रकार संघात एका कार्यक्रमात दिला जाणार आहे..त्यानिमित्ताने

कट्यार काळजात घुसली या नाटकाचे नेपथ्य़ नाट्यसंपदा सारख्या संस्थेचे होते..रंगमंचावर प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर केला गेला होता.. त्याबरहुकूम नेपथ्य़ पुण्यात भरत नाट्यमंदिरात तयार केले गेले..योग्य वेळी तो फिरता रंगमंच हालायलाच हवा..ते काम पदड्यामागे समर्थमणे सामंभाळणारे जे काही पदड्यामागचे कलाकार होते..त्यात विठ्ठल हुलावळे हे आघाडीवर होते...नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे यांच्या चाणाक्ष नजरेतून आणि .मु वैद्य यांच्या मार्गदर्शनाने ती करामत आमचे त्यावेळचे सारेचजण चोख बजावत.,.
हा काळ सुमारे १९७७ असावा..त्यापूर्वी म्हणजे शांकुंतल आणि शारदा या नाटकाच्यावेळी पडद्यामागे हा विठ्ठल सतत झटत असायचा..उत्साह तसाच..उमेद आणि जिद्द या त्रिगुणी स्वभावाने भारलेला बॅकस्टेज कलाकार आणि भरत नाटय् मंदिर यांचे समीकरण १९७४च्या आधीपासून जमलेले..

खरे म्हणाल तर भरतचे नाटक  अगदी आजही विठ्ठलच्या हातभाराशिवाय पूर्ण होत नाही..ही अतिशयोक्तिची गोष्ट नाही..

अनेक लोकांची नावे माहिती असतात..पण तो कुठला, काय करतो, घरगूती परिस्थिती कशी यांची अनेक कलावंतांना वार्ताही नसते..त्यातलाच तो एक..विठ्ठल.. त्याला त्याच नावाने सारे लोक हाक मारित... पुढे पुढे दत्तोबा मिस्त्री, विठ्ठल हुलावळे ही त्यांची पूर्ण नावे कानावर आली..पण ती सतत वापरली जात नव्हती आजही नाहीत.

नेपथ्याची मांडामांड कशी करायची ते कोणते नेपथ्य तुम्हाला योग्य शोभेल यांची माहिती` विठ्ठल` शिवाय भरत मध्ये दुसरा फारसा कुणी जाणकार नसायचा..ही जाणकारी इतकी वाढत गेली की स्पर्धेच्या नाटकांपासून ते अगदी पुरूषोत्तम करंडकाच्या एकांकिका पर्य़ंत या पदड्यामागच्या कलावंताचे नाव सर्व कलाकारांच्या तोंडी झाले..आजही आहे...पुरुषोत्तम आणि स्पर्धेच्या नाटकात काम करणारे कलावंत हौशी त्यांची पुढे नाटकातली एंट्री कमी होत गेली..पण मोठमोठ्या हुद्यावर काम करणारे अनेक कलावंत आजही या कलावंतांना स्मरणात ठेऊन आहेत..हे विशेष.






विठ्ठलला कालवंत म्हणायचे यासाठी की तो केवळ पडद्यामागचा भाग सांभाळतो असे नाही तर कांही नाटकात तर तो छोट्या भूमिकाही करतो.. मला आठवते ती कट्यार मधला बद्रिप्रसाद..आणि इतरही..











तसा हा विठ्ठल मूळचा पिरंगूटजवळच्या गावचा...तिथे त्याची शेतीही आहे..नांगरणी,पेरणीसाठी तो आजही घरी जातो..त्याला पगार तो कीती..त्यात कसे भागायचे..म्हणून त्यांने महापालिकेतले माजी अधिकारी आणि पीडीएचे जुने कलावंत श्रीपाद आडकर यांच्या प्रभात रस्त्यावरच्या घरातली दोन चाफ्याची झाडे वार्षिक करार करून मिळविली..आणि आणि गेली २५ वर्षे  आज आडकर नसले तरी त्यांच्या मुलाच्या काळातही पहाटे ऊठून झाडावरीची फुले काढून भरतच्या समोर ती विकायचा जोड उद्योग त्याने सुरु ठेवली आहे..
त्याला काही काळ त्याच्या मुलानेही हातभार लावला..पण तोही आता आपल्या स्वतंत्र उद्योगाला लागला आहे.



पत्नीच्या अकाली निधनानंतर तसा तो एकाकी पडला..मुलीच्या लग्नानंतर मुलाचा आणि आपला प्रपंच तो उत्तम सांभाळतो..जावयांची साथही त्याला चांगली मिळाली..
पण स्वावलंबी स्वभाव. कष्टाची सवय आणि प्रामाणिक वृत्ती यामुळे आजही भरतच्या पगारावर त्यांची गुजराण सुरू आहे..

अनेक कलावंतांच्या तोंडात त्याचे नाव आजही असते..ते त्याच्या या उत्तम वर्तनाने. नाटकाचा सेट लावाय़ला आजही तो तेवढ्याच उत्साहाने पुढे असतो..भरत नाट्य मंदिराचे प्रयोग जिथे जिथे होतील तिथे हा विठ्ठल कायम कटेवर हात ठेऊन कामासाठी ऊभा दिसेल..


आपली खासगी नोकरी सांभाळून त्याने संस्थेच्या अनेक पदाधिका-यांचा विश्वास संपादन केला आहे..अनेकांच्या अडचणीला धावूनही गेला आहे.त्याची ही निष्ठा आणि कार्यतप्तरता पाहून नाटयपरिषद( मुंबई), सिंबयोसिस आणि बारामतीच्या नाट्यसंमेलनातही विठ्ठल नामदेव हुलावळे यांचा सत्कार केला गेला.
आज आनंद अभ्यंकरच्या नावाचा पुरस्कार मिळून तो अधिक समाधानी झाला आहे..


अशी अनेक अंधारात वावरणारी माणसे आहेत..जी उजेडात दिसणा-या कलावंतांच्यामागे सावलीसारखी उभी असतात..खरं तर असा असंख्य कलावंतांचा प्रातिनिधि म्हणूनच या विठ्ठल नामदेव हुलावळे यांना पुरस्कार प्रकाशात स्विकारताना
साठीच्या आसपास असलेल्या त्याला आपण सारे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊ या.





- सुभाष इनामदार पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, December 19, 2016

सुपारीवाले भावे आणि प्रसाद भावे




सातारा कन्याशाळेत नोकरी करणारे..आई निमर्लाताई भावे ..यांनी चालू केलेला भावे सुपारीचा कारखाना पुढे नावारुपाला आणणारा हा सातारचा उद्योजक..एक प्रसन्न व्यक्तिमत्वाचा माणूस..अदरातिथ्य जपणारा..अतिशय सह्दय ज्येष्ठ मित्र..समाजाकडे तटस्थपणे पाहणारा सामाजिक बांधिलकी जपणारे दिसखूलास व्यक्तिमत्व ..आणि अलीकडे अधिक प्रकर्षाने जाणविणारा गुण म्हणजे राजकारणत्या विविध विषयांनर आपली परखड मते प्रांजलपणे मांडणारा उत्तम विचारवंत पत्रलेखक..

असे हा सातारचे भूषण असणारे व्यक्तिमत्व म्हणजे..प्रसाद जगन्नाथ भावे सर..  हरपले याचे दुःख होते..

मी शाळेत असताना त्यांच्याकडे सुपारीच्या पुड्या करायला जाऊन..शाळेचा खर्च भागवित होतो..माझी आई त्यांच्याकडे सुपारी करायला.. भावीणबाईेना त्यांच्या आईला  मदत करायला जायची..तेव्हापासून ते अगदी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला सातारच्या शनिवार पेठच्या घरात गेल्यानंतर भाऊने केलेले स्वागत..आज सारे चित्र डोळ्यासमोर येते..खरं तर हा प्रवास सुमारे ५० वर्षांचा..तो कसा या अपु-या शब्दात सांगू..पण त्याची नोंद प्रसाद भावे गेले त्यांनिमित्ताने व्हायलाच हवी..

दोन वर्षापूर्वी त्यांची पत्नी गेली तेव्हा भेटायला गेलो..तसे त्यांनी सारे शांतपणे सांगितले..पण त्यांनीही भावे सुपारीचा व्यवसाय करण्यात किती मदत केली..नव्हे त्यांनी तो व्यवसाय अधिक वाढविण्यात पुरेपूर मदत केल्याचे दिसत होते..पण त्या गेल्या आणि प्रसाद एकटा पडला.(.खरं तर मी त्याला भाऊत म्हणत आलो..म्हणून एकेरी.). तोही आघात सोसला..आता वयपरत्वे आपल्याला हे सारे झेपणार नाही म्हणून आपल्या पुण्यातल्य़ा नातवाला सोबत घेऊन हा व्यवसाय पुढे नेत होता.. नवी उप्तादने ..लोकांच्या पसंतीला उतरवीत होता.. खरे म्हटले..तर बाहेर कुठेच जायचे नाही ..प्रवास करायचा नाही..असे ठरविले असले तरी ते पाचगणीला कुठे गेले..शेवटी तिथेच अखेर व्हावा ..ही दुर्देवाची गोष्ट.
आपल्या आईने सुरु केलेला हा घरगुती सुपारीचा व्यवसाय नोकरी असतानाही आणि निवृत्तीनंतरही विकसीत केला..फक्त फार व्याप वाढवायचा नाही..मागणी वाढली तर आपण पुरे पडणार नाही याची जाणीव ठेवत कुवतीनुसार ..काळानुसार बदल करत प्रसाद भावे यांनी हा व्याप आपल्यापुरता मर्यादित ठेवला..
पूर्वी मला आठवते..ती भावे सुपारी पुण्यात हेजीब यांचे दुकानात मिळायची..आता तर तर ग्राहक पेठे पासून मुंबईतल्या काही दुकानातही भावे सुपारी मिळते..

सुपारी खरेदी करण्यासापून त्याचे पॅकेींग पर्य़त सारे ते जातीने पहात असत..पूर्वी पाच पैशाचे सुपारी पॅकेटच जे लग्नात पेढ्याबरोबर देता येईल असे असायचे..
पुढे पुढे शरीर साथ देत नाही..बाहेर जाणे कमी करत रोजच्या जीवनात शिस्त आणली..रोज नियमित फिरायला जाणे..आवश्यक तेवढाच आहार घेणे..वेळेवर विश्रांती घेणे आणि वैद्कीय पथ्य पाळणे..सारे प्रसाद भावे यांनी केले.
बाहेरून आपल्याला काही होत असल्याचे किंचितही त्यांच्या चेह-यावर दिसून येत नव्हते..
माझ्या आईने सुपारी कारख्यान्यात केलेले कष्ट आठवून त्यांनी आम्हाला शेवटपर्य़त मदतीचा हात आणि आधार दिला..प्रसंगी मायची उबही पांघरली..

प्रसाद भावे यांचे कॉमर्सचे वर्ग काही वर्ष माझ्या शनिवार पेठेतल्या घरीही चालत..काही काळ मीही त्यांच्या वर्गाचा लाभ घेतला..
मी सातारा सोडल्यावरही हा लोभ कमी झाला नाही.. तसाच कायम राहिला.अगदी भावा प्रमाणे...आता त्याला ४२ वर्षे् उलटून गेली..प्रसाद भावे यांचे नाते अतुट राहीले..
आता मात्र ते गेल्याने त्यात अडथळा आला..मी पोरका झालो..

सातारला गेले की भावेंकडे जावून भाऊला भेटायचे हे नक्की असे..त्यांची विचारपूस मनाला दिलासा देणारी असे..अगत्यही तेवढेच असायचे..
कधी काळी प्रसाद भावे, अरूण गोडबोले आणि अरविंद भावे यांनी टाईम्स ऑफ इंडियाची एजन्सी घेतली होती..या  ट्रीओ एजन्सीत पेपर टाकण्याची माझी लाईनही असायची..अर्थात तीही मला भाऊ मुळे मिळाली..
पण आमचे संबंधही असेच वैयक्तिकच होते..प्रसाद भावे यांचे मित्र..नंदकिशोर नावंधर यांचे मुळे नावंधर यांनी बांधलेल्या राधिका चित्रपटगृहात बुकींग क्लार्कची नोकरी मिळाली होती..

एकूणच माझ्या व्यक्तिगत जीवनात प्रसाद भावे आणि त्यांचे आई-वडील आणि त्यांची पत्नी..तसेच आताची त्याची पुढची पिढी यांचे स्थान मोलाचै आहे. ते पुढेही राहणार आहे..


अलीकडे त्यांची पत्रे वाचकांच्या पत्र्यव्यवहारमध्ये वारंवार प्रसिध्द होत होती..तेव्हा त्यांची सामाजीक. राजकीय जाणीव किती होती याची प्रचितीही येत होती..
अभ्यासोनी प्रकटावे असे त्यांचे हे पत्रातले शेरे खरंच खूप मोलाचे असत.
त्यांना सातारा आणि हा सारा परिसर मित्र मंडळी..त्यांचे डॉ. बाबा उर्फ अनंत साठे यांच्यावर फार जीव..अखेरीस मात्र ते सातारापासून थोडे दूर गेले होते..
पण मनी मानसी सातारा हेच कायम होते..
असा या वृत्तीने उदार..मनाने श्रीमंत..पेशाने शिक्षक..आणि व्यवसायाने उप्तादक असे प्रसाद भावे आपल्यातून दूर निघून गेले..अनंताच्या प्रवासासाठी..
त्यांना आमच्या सारख्या असंख्य मदतीचा हात देणा-यांकडून हिच शब्दांजली वाहतो..त्यांच्या कु़टुंबीयांना हे दुःख सोसण्याचे बळ मिळो आणि भावे यांनी भावे सुपारीचा वाढलेल्या रोपाची वृध्दी होत राहो.हिच त्यांना श्रध्दांजली ठरेल.




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276