Saturday, December 24, 2016

आनंद कभी मरता नही..




आनंदरंग कार्यक्रमातून आनंद अभ्यंकर यांची स्मृती जपली...

आपल्या अभिनयाचा सुगंध मागे ठेऊन आनंद अभ्यंकर चार वर्षांनंतरही स्मरणात आहे,.हे पुण्यातल्या आनंदरंग कार्यक्रमाला पत्रकार संघात उपस्थित झालेल्या रसिकांच्या साक्षीने पटले. आनंद अभ्यंकर यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्या मार्फत आनंद ला आठविताना आजही अनेकांचे डोळे पाणावलेले पाहिले..
विशेषतः गेली ४० हून अधिक वर्षे पडद्यामागे राहून प्रकाशातल्या कलावंतांना सहाय्य करणारा भरत नाट्य मंदिराचा कलाकार..विठ्ठल नामदेव हुलावळे यांना या वर्षींचा आनंदरंग पुरस्कार लोकप्रिय अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या हस्ते दिला गेला.

प्रकाशात असलेल्या कलावंतांने पडद्याआडच्या कालवंतांचे असे पुरस्कार दैऊन कौतूक करावे हा विरळा योग यानिमित्ताने जुळून आला.

शुक्रवारी २४ डिसेंबर २०१६वा संध्याकाळी पुण्यातले पत्रकार संघाचे सभागृह तुडूंब भरले होते..तो या आनंदरंगच्या कार्यक्रमासाठी..



आनंदची आई आहिल्यादेवी अभ्यंकर आणि आनंदची पत्नी अंजली अभ्यंकर, मुलगी,मुलगा आणि आप्तेष्ट तसेच त्याचा खूपसा मित्रपरिवार मुद्दाम या कार्यक्रमात अग्रेसर होते.


यावेळी त्यांच्या आठवणी पुन्हा जागविल्या गेल्या.आनंदच्या वाटचालीचा ओघवता आढावा घेऊन त्याचे वेगळेपण सांगणारी अनंत कान्हो , राजेंद्र देशपांडे आणि अभ्यंकर यांचेबरोबर काम केलेले एक सहकारी यांनी घेतला.

विशेषतः वाहतूकीची शिस्त पाळली नाही तर किती दुर्दैवी घटना घडू शकते यांचे आनंद आणि त्यांच्यासह अक्षय पेंडसे यांच्या चार वर्षीपूर्वी एक्सप्रेस हायवेवर झालेल्या घटनेतून समाजाला कळेल..यासाठी वाहतूक चालविताना नियम पाळणे किती महत्वाचे आहे..याची जाणीवही एका चित्रफितीतून नगसेविका सौ. माधुरी कुलकर्णी यांनी एका चित्रफीतीतून सांगितले.

नीना कुलकर्णी यांनी आपला आणि आनंदचा कसा जवळचा स्नंह होता.हे सांगून त्याच्या काही आठवणीही सांगितल्या..
विनिता पिंपळखरे यांनी नीना कुलकर्णी यांच्या रंगभूमि, दूरदर्शन मालिका आणि चित्रपट या तिहेरी प्रवासाची ओळख रसिकांना करून देणारी मुलाखत यावेळी घेतली.

सत्यदेव दुबे आणि डॉ. विजया मेहता या दोन गुरूंकडून आपल्याला मिळालेल्या अभिनयाच्या धड्याविषयी त्या मोकळेपणाने बोलल्याआपल्या नाटका दरम्यानच्या आठवणींनाही त्यानी उजाळा दिला.
अभिनय हे कुणी सहजीपणे करण्याची गोष्ट नाही.त्यासाठी तुमची पुरेशी तयारी हवी..चांगला मार्गदर्शक हवा..आणि तुम्हाला इतरांच्या भूमिकेत जावून तीचे अंतरंग समजून घेण्याची कुवत हवी..असे मत व्यक्त केले..

तासभऱ चाललेल्या मुलाखतीत आपण दिग्दर्शकाची अभिनेत्री असून अत्ता कुठे आपल्याला अभिनयातले बारकावे कळाले लागले आहेत.. हे ही नम्रपणे नीना कुलकर्णी यांनी सांगीतले.
आज दुबे आणि विजया मेहता यांच्यासारखे गुरू नाहीत .ही खंतही त्यांनी व्यक्त केली.




















- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gnail.com

9552596276

No comments: