Thursday, July 14, 2016

श्री संत दर्शन मंडळ..श्रीराम साठे यांच्याविना...


गुरूवारी सकाळी मला पुण्यातल्या संगीत मार्गदर्शीका आणि गायक कलावंत जयश्री कुलकर्णी यांचा फोन आला..संत दर्शन मंडळांचे श्रीराम साठे कर्करोगाने आजारी आहेत..त्यांच्या मदतीसाठी आम्ही एक कार्यक्रम उद्या भारतीय विद्या भवन मध्ये करीत आहोत..तुम्ही नक्की या..
आम्ही त्यांच्या उपचारासाठी आमच्याकडून आर्थिक मदत केली आहे.पण त्यांच्यासाठी अधिक मदत मिळावी ही इच्छा आहे..म्हणून  हा कार्यक्रम.

हा फोन सकाळी ८ चा..आठ वाजून ५४ मिनिटांना पुन्हा एक त्यांचा मिस कॉल आला..पण मी कामात असल्याने उचलू शकलो नाही..नंतर कळाले त्यांचे निधन झाले..

आषाढी एकादशीला संतदर्शन मंडळाचा कार्यक्रम झाला नाही असे होत नसे .यंदाही होईल..पण तिथे श्रीराम साठे नसतील...त्यांचे स्मरण होईल इतकेच.

आता भारतीय विद्या भवनातला कार्यक्रम  शुक्रवारी  संध्याकाळी त्यांना  श्रध्दांजली म्हणून केला जाईल. पण त्यात राम..रामभाऊ..नसतील..

आपल्या दक्षिणमुखी मारूतीपाशी असलेल्या बाजीराव रस्त्यावरच्या जुन्या पुणेरी पध्दतीच्या घरी त्यांचे शास्त्रीय संगीत विद्यालय...गेली अनेक वर्षी ते शास्त्रीय संगाताचे शिक्षण देण्याचे काम करत आहेत..काही वर्ष  तर ते एकटेच रहातात.. गेली कित्येक वर्षे पुण्यातल्या नवोदित..पण आता चांगल्या रितीने ओळखल्या जाणा-या कलावंताकडून  संतांचे अभंग..आषाढी..कार्तिकीच्या दिवशी करून आपल्या श्री संत दर्शन मंडळाच्या वतीने महाराष्ट्रात  करीत होते..
गेली तीन एक वर्ष त्यांना पकृतीच्या कारणास्तव..वय ८१ . सारे झेपेनासे झाले. .म्हणून झेपेल तसे त्याकडे पहायचे..विद्यार्थीवर्गही अल्पसा..पण जेवढे शक्य झाले तेवढे ते मार्गदर्शन करायचे..

काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या कारर्किर्दीचा धावता आढावा घेणारे  पुस्तक लिहले..प्रसिध्दही केले..
अतिशय साधे रहाणे..प्रत्येक संगीताचा कार्यक्रम आर्वजून पहायाचे..गप्पा अघळ-पघळ..पण रुची शास्त्रीय संगीताली..
लेंगा, वर पांढरा नेहरू शर्ट आणि वर काळे जॅकेट ..डोळ्यावर चष्मा अशा वेशात ते संत दर्शन मंडळाच्या कार्यक्रमासाठी जातीने फिरत..अगदी आपल्या कार्यक्रमाचे स्थानीक  देण्यासाठी ते स्वतः  ते सकाळमध्य़े जातीने आलेले मी पाहिले आहे..
आता आपल्या हातून फारसे होत नाही याची खंत बाळगून त्यांनी आपल्या संस्थेची जबाबदारी तरुण तढफदार गायक राजेश दातार यांच्यावर सोपविली होती..स्वतः निवृत्तीधारकाच्या वेशात सामावून गेले होते..
त्यांना कर्करोगाने ग्रासले होते..काही दिवस ते आजारीही होते..

स्वतःसाठी काहीही न मागता संगीताची सेवा करण्यासाटी    काही मदत करा असे सांगणारा हा हाडाचा कलावंत माणूस विरळा..
त्यांच्या साधेपणात जी माणूसकी दडलेली आहे..ती पुढे संपलेल्या अवस्थेत असेल.
संस्थेचे..पर्य़ायाने संगीताची परंपरा जी आपली भारतीय आहे खास तीचे जतन आणि संवर्धन व्हावे ही आयुष्यभर तळमळ केली..त्यासाठी खरच स्वतःचे जीवन दिले..
त्यांच्या निधनाची मोठी बातमी होणार नाही ..पण एका छोट्या प्रमाणात त्यांच्या निधनाची..पर्यायाने त्यांच्या कार्याची  दखल सारेच जण घेतील..

स्वतः पं.. भिमसेन जोशी यांचे शिष्यत्व   मानणारे ते एक साधक..अनेक वर्ष त्यांच्या अनेक कार्यक्रमात ते तंबोरा वादन करायचे.. कधी तरी मंडळाच्या कार्यक्रमात गायची संधी घेतली तर ते एखादी बंदिश पंडीतजींचे स्मरण करून हमखास आपल्या थोड्याश्या घेग-या आवाजात ते ती सादर करीत असत.

त्यांच्यासारख्या जिद्दीच्या. ध्येय्याने प्रेरित झालेली माणसे पाहिली की मन भरून येते..डोळ्यात कणव येते..त्यांच्या कार्याला वाकून सलाम करावासा वाटतो..

श्रीराम साठे यांची आठवण आमच्या मनात नेहमीच असेल..त्यांना माझी ही भावपूर्ण शब्दांजली..



- सुभाष इनामदार, पुणे
सांस्कृतिक पुणे
subashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, July 10, 2016

Mahesh Elkunchwar speak about Go.Ni. Dandekar







जेव्हा
ज्येष्ठ नाटकाकर..साहित्यिक महेश एलकुंचवार थेट रसिकांच्या भावनेला साद घालून
सांगतात..तेव्हा खरचं गोपाळ निळकंठ दांडेकर..साहित्यक्षेत्रातल्या आप्पांच्या
साहित्याबद्दलचा मराठी अभिमान जागा होतो..गोनिदांच्या नावाने दिला जाणारा मृण्मयी
पुरस्कार जेव्हा ते विजया मेहता यांच्या स्विकारतात..तेव्हा तर मान ताठ मानेने उंच
होत जाते.
शुक्रवारी
८ जुलैला..पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरातल्या उपस्थितांचे हात टाळ्यांसाठी  सतत सिध्द होत होते..त्यांच्या जन्मशताब्दी
सोहळ्याची सांगता या निमित्ताने झाली..पुरस्काराचे हे २६ वे वर्ष..निरा-गोपाळ
पुरस्कार दिला गेला तो जळगावच्या मॅगसेसे  पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांना..तर यंदा
प्रथमच आप्पांच्या नावे प्रोत्साहन पुरस्कार दिला गेला तो बबन गिंडे या तरुण
कादंबरीकाराला..
गोनिदांच्या
कन्या आणि जावई डॉ. विणा आणि विजय देव यांच्या पुढाकारने मृण्मयी पुरस्कार दरवर्षी
८ जुलैला दिला जातो..गो. नि. दांच्या साहित्यावर प्रेम करणारे रसिक..वाचक यांचा हा
स्नेहमेळाच इथे भरलेला असतो..यंदा..ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दिपा
श्रीराम, नाटककार गो.पु. देशपांडे यांचे सारखे मान्यवर रसिकांमध्ये  उपस्थित असताना असा सोहळा अनुभवणे हे ही
भाग्याचेच होय..
अतिशय
भावनापूर्ण पुरस्काराचे भाषण करून गो नि दांच्या साहित्याचे श्रेष्ठत्व सिध्द करणारे
विचार महेश एलकुंचवारांच्या कडून ऐकायला मिळाले..यावेळी माचीवरचा बुधा या
चित्रपटाचे धावता ट्रेलरही उपस्थितांना दाखविण्यात आला..जुलै ते जुलै असे
किल्ल्यांवरचे अनुभव सांगणारी दीनदर्शीकाही इथे प्रकाशित केली गेली.
तर
आपल्या अध्यक्षिय भाषणात ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि श्रेष्ठ कलावंत विजया मेहता
यांनी जो मनस्वी संवाद केला त्याला तोड नाही.. केवळ गोनिदांच्या परिवाराकडून मदत
स्विकारून हा सोहळा २५ वर्षे सातत्याने करणा-या सर्वांना आपण जे काम करीत आहात ते
खूप महत्वाचे असल्याचे सांगून..आपले आणि आप्पांचे मैत्र कसे होते याविषयी
विजयाबाईंनी त्यांच्या उत्तम शैलीत रंगमंचावरून जे वक्तव्य केले ते ऐकण्यासारखे
होते. आप्पांचे व्यक्तिमत्व हे अतिशय विरळा आणि अनोखे असल्याचे  त्या सांगतात.. मी त्यांना एक मुक्त फिरस्ता
म्हणत असे. ते मुक्त शोधक होते..ते कधी काय शोधत असतील हे कधीही कळायचे नाही.. गो
नि दांच्या शितू कादंबरीवरून जे नाटक लिहले त्याची मी दिग्दर्शीका आणि त्यातली
शीतूची भुमिकाही मी केली..पण ती भूमिका मला आप्पांनी समजून दिली..मी शहरी..मला
खेडयातल्या जीवनाचा अनुभव नाही..जोपर्यंत कलावंताला त्या भुमिकेचा गाभा सापडत नाही
तोपर्यत चाचपडत असतो..तमे माझे झाले..पण शितू करताना मला त्या भुमिकेचा
स्पर्शअनुभव करून दिला तो आप्पांना..कोकणातल्या खेड्यात नेले..तिथला निसर्ग वाचून
दाखविला..तिथल्या स्त्रीयांचा अनुभव दिला..त्या मातीत शेणाने सारविल्या जमीनीचा तो
ओलावा दिला..माझ्या लेखी आप्पांसारखा नाटककार मला भेटला नसता तर कलावंत आणि
दिग्दर्शिका म्हणून कमी पडले असते... पहिल्यांदाच कोकणी बोली भाषा ..त्यांच्यातली
देवाणघेवाण आमच्यापर्यंत पोहोचली .  केवळ
नाटकच नाही तर मला माझे पती हरी खोटे गेल्यानंतरचा ओलावा दिला तो आप्पांनी..
त्यावेळी मी तूला भेटायला आलो हे जाणवूच दिलं नाही.. मला तेव्हा त्यांनी जो आधार
दिला तो शेवटपर्यत रहाणार...
असाच
काहीसा भावनोक्तट अनुभव महेश एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदी नाटक दिग्दर्शीत
करताना कसा येत गेला ते विजया मेहता यांनी अतिशय खुलवून सांगितले..


सा-या
कार्यक्रमाची सूत्रे हाताळली ती गो नि दांची नात अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल
कुलकर्णी यांनी.. महेश एलकुंचवारांचा परिचय करून दिला तो वीणा देव यांनी तर निलिमा
मिश्रा हिच्या कार्याची ओळख करून दिली ती विजय देव यांनी..



- सुभाष इनामादर, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276