Sunday, April 16, 2017

सुमनताई तुम्ही गात राहिले पाहिजे

लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या नंतर कुणा गायिकेने भावगीत.चित्रपटसंगीतात स्वतःचे नाव केले ते सुमन कल्याणपूर...मात्र १९९५ सापून त्यांनी आपले जाहिर गाणे बंद केले..कारण काय...काहीही असो..पण आजही त्यांच्या आवाजात ती जादू आहे..जी रसिकांना भुलविते.

पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते जेव्हा त्यांना आज पुण्यात माणिक वर्मा पुरस्कार देण्यात आला..त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधताना मंगला खाडीलकर यांनी त्यांच्याकडून काही गाण्याच्या ओळी गुणगुणून घेतल्या..त्यावरुन आजही तो आवाज तेवढाच सुंरेल असल्याचे रसिकांच्या ध्यानी आले..
त्यांच्या मुलाखतीच्या शेवटी तर सर्व रसिकांनी उभे राहून त्या व्यासपीठावरुन जाईस्तोवर उठून त्यांना मानवंदना दिली...
सुमनताई आजुनही तुम्ही गात रहा....तो सूर आम्हाला तेवढाच आनंद देणारा ठरणार आहे..

No comments: