Tuesday, August 25, 2009

उत्साहात दक्षतेकडे दुर्लक्ष नको!


स्वाईन फ्यूच्या साथीने गाजलेल्या पुण्यात आजपासून गणेशात्सवाला आरंभ झालाय.

आजच अडीच वर्षाच्या बालकाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालायाची बातमी आलीय.

ऐकून मन विषण्ण झाले. भावताली नजर टाकली. सार्वजनिक मंडळांचे गणपती वाजत गाजत मंडपात विराजमान होण्यासाठी ढोल- ताशांच्या पथकांच्या आणि बॅंडच्या तालावर मिरवत आणले जात आहेत. स्वाईन फ्लू मुळे गेले काही दिवस पुणेकर तोंडावर मास्क वापरतना दिसत होते. आज मात्र या गर्दीत

या साऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यासारखे दिसते. उत्साहाला उधाण तर आता येतेय.

साथीच्या रोगापासून सावध होण्याची प्रतिज्ञा घेणारा पुणेकर या गर्दीत नाचायला, पहायला तेवढात उत्सुक दिसतोय. नाही म्हणायला काही निवडक मंडळानी स्वाईन फ्लूमुळे यंदा सजावटीला लगाम लावून या साथी पासून घ्यायची काळजी कोणती याचा बॅनर झळकवला आहे.

मात्र ज्या प्रमाणात मंडळानी आणि पर्यायाने मंडळींनी काळजी घ्यायला हवी आहे तेवढी ती घेतली जात नाही.श्री गजानन पहातोयस ना, तुझीच आराधना चालू आहे. आता तूच त्यांना संभाळ रे बाबा!.सोमवार पासून शाळा, महाविद्यालये आणि इतके दिवस बंद असलेली चित्रपट आणि नाट्यगृहेही पुन्हा चालू होताहेत. काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. मात्र त्या पाळताहेत किती? जणू काही घडलेच नाही असा वावर सार्वजनिक ठिकाणी सुरू झाला.

ज्याला स्वाईन फ्लूच्या संकटाची जाणीव झालीय तो नक्कीच काळजी घेईल. पण मग इतरांचे काय?एक मात्र नक्की गणेशोत्सवातल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची यंदा वानवा आहे. गणपती पहायला धावणारा उत्साही भक्त नेहमीसारखा सह कुटुंब सह परिवार गणपती पहायली बाहेर पडेल काय?सार्वजनिक उत्सवाच्या वेळी घ्यायची काळजी घ्यावी असे सांगणारे बोर्ड झळकताहेत. त्याची अंमलबजावणी करण्यातच साऱ्यांचेच भले आहे.तुम्हाला काय वाटते ?


सुभाष इनामदार ,पुणे

No comments: