Friday, August 22, 2008

"ओळख' चा शंभरावा प्रयोगही जाहिर

ओळख ना पाळख' या नाटकाबद्दल प्रशांत दमले इतका आशावादी आहे,
की महाराष्ट्रात याचे एक हजार प्रयोग होणारच असं तो म्हणतोय.
२५ डिसेंबर २००८ या दिवशी "ओळख ना पाळख'
या नाटकाचा शंभरावा प्रयोग आपण सादर करणार आहे.
या माझ्या निर्मितीनंतर निर्मात्यांना समजेल नाटकांबद्दल
प्रेक्षकांमध्ये "ओळख' कशी निर्माण करायची ती!
"ओळख ना पाळख' ही रहस्यमय थ्रिलर कॉमेडी आहे.



चला प्रशांतशी नाटकाच्या निर्मितीबाबत जाणुन घेऊयात !

मुलाखत- सुभाष इनामदार

तालवाद्यांनी केली करामत

"तालवाद्य कचेरी' अर्थात विविध तालवाद्यांची ओळख करून देणाऱ्या वेगळ्या सीडीचे प्रकाशन

सोंमवारी टिळक स्मारक मंदिरात करण्यात आले.
कार्यक्रमाचे नाव दिले ते नादरंग- सीडीचे प्रकाशन
तबलानवाज पं. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी टाळ, घंगरू, शंख, चकवा, मोठ्‌या झांजा, खंजिरी, डफ, चिपळ्या,
एकतारी, दिमडी, बगलबच्चा, डौर, चोंडकं, बंगाली एकतारी, पखावाज,
तबला, ढोलकी, ढोलक, मटका, चंडा, ढोल, हलगी, कबाश, बंगाली खोळ


अशी नानाविध वाद्यांचा खेळ करून रसिकांची मने जिंकली


ती या कार्यक्रमाचे प्रेरक आणि सादरकर्ते डॉ. राजेंद्र दुरकर यांनी.
त्यांना विविध तालवाद्यांची साथ केली ती पद्‌माकर गुजर,केदार मोरे,नितिन शिंदे,
गोविंद भिलारे आमि रांजेंद्र साळुंके यांनी.
दोन्ही कार्यक्रमाचे एकत्रित निवेदन केले ते दयानंद घोटकर यांनी.


कॅमेरा व स्टोरी - सुभाष इनामदार

व्हायोलिन वादनाची रंगली जुगलबंदी

सोमवारी टिळक स्मारक मंदिरात पिता आणि गुरू पं. भालचंद्र देव
त्यांची कन्या आणि शिष्या सौ, चारूशिला गोसावी
यांच्या व्हायोलिनवादनाची जुगलबंदी "हेरीटेज' या नावाने रंगत गेली.
गेली अनेक वर्षे ते दोघे व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करून कलेतले प्राविण्य सिध्द करीत आहेत.
व्हायोलिन वादनातले हुकुमी कौशल्य यामुळे वाद्यांवर पिता-कन्येंची हुकुमत कार्यक्रमातून दिसून आली..


प्रारंभी श्री रागाची सुबोध मांडणी करून दोघांनी एकेक नाट्यपद ऐकविले.


त्यांच्या सीडीचे प्रकाशन ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांच्या हस्ते इथे करण्यात आले.

पुरूषोत्तम करंडकाची प्राथमिक फेरी उत्साहात सुरू

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनातील नाट्यगुणांना प्रोत्साहन देणाऱ्या पुरूषोत्तम करंडक महाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला मंगळवार पासून उत्साहात सुरवात झाली. महाराष्ट्रीय कलोपासक ,पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेचे हे ४६ वे वर्ष आहे.

उत्साही वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी इथं क्‍लिक करा.

पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या ४३ महाविद्यालयांच्या ४४ एकांकिका भरत नाट्य मंदिरात होतील. ही फेरी ३१ ऑगस्ट पर्यंत चालेल. रोज संध्याकाळी पाच वाजता आणि रविवारी केवळ दोन सत्रात ही प्राथमिक फेरी होत आहे.अंतिम फेरी २० आणि २१ सप्टेंबरला तर पारितोषिक वितरण समारंभ नाट्यसंमेलनाध्यक्ष रमेश देव यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला भरतलाच होणार आहे.
दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना या एकांकिकेच्या सर्वच बाबी विद्यार्थ्यांनीच कराव्यात असा या स्पर्धेचा नियम आहे. यंदा २३ एकांकिका विद्यार्थ्यांनी लिहल्या असल्याची माहीती संस्थेचे सरचिटणिस हेमंत वैद्य यांनी दिली.
कांही विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला.
कडक शिस्तीसाठी ही स्पर्धा प्रसिध्द आहे. तिसऱ्या घंटेनंतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
सादरीकरण करणारे आणि पाहणारे सारेच उत्साहात असतात. प्राची घाटपांडे, प्रदिप वैद्य अणि उदय लागू हे प्राथमिक फेरीचे परिक्षक आहेत.
पुरूषोत्तमच्या स्पर्धेत भाग घेतलेले अनेक कलावंत आज कलाक्षेत्रात चमकले आहेत.

कार्यक्रमानंतर सावनी शेंडे यांनी बंदिशी अशा रंगविल्या !

"हृदयस्वर' या पुस्तकात प्रामुख्याने सावनी आणि तिची आजी कुसुम शेंडे रचित एकूण चाळीस बंदिशींचा समावेश आहे.
पारंपरिक बंदिशींचे महत्त्व आजही त्या मान्य करतात.
रागदारी संगीतात चारच ओळी असतात.
त्या ओळी जर स्पष्ट उच्चार करून जर म्हटल्या
आणि त्या शब्दांचा अर्थ घेऊन जर का राग फुलवला तर तो जास्त लोकांपर्यंत पोचतो अणि एकाच रागाचे वेगवेगळे भाव दिसतात.
आपण बंदिशींची रचना करताना या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिल्याचे सावनी सांगतात.
बंदिशी कशा सादर करायच्या याची एक सीडीही त्यांनी पुस्तकाबरोबर वाचकांना, अभ्यासकांना दिली आहे.

यातून आपोआपच शास्त्रीय संगीताचा प्रसारच होणार आहे.

कार्यक्रमानंतर सावनी शेंडे यांनी बंदिशी अशा रंगविल्या !

"ह्‌दयस्वर'चे सावनी शेंडे आणि कुसुम शेंडे यांच्या बंदिशीच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असे झाले.

"ह्‌दयस्वर'चे सावनी शेंडे आणि कुसुम शेंडे यांच्या बंदिशीच्या

पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असे झाले.

सावनी शेंडे या केवळ गायिकाच नाही, तर त्यांना बागेची आवड आहे, निसर्गाचे वेड आहे, हे त्यांच्याशी केलेल्या गप्पांतून समजते. निसर्गातून आपल्याला इतकी प्रेरणा मिळत असते, की त्याच्यातूनच काही बंदिशी घडल्या माझ्या, असे त्या सांगतात. घरातल्या वृक्षांवर तयार केलेली पक्ष्यांची घरटी दाखवितात. बागेतली उमलणारी नवी फुले लक्ष वेधतात. याशिवाय पेंटिंग, वेगवेगळ्या कागदी फुलांची निर्मिती करणे, असे छंदही त्या जपतात आणि जोपासतात.
साठ्येंच्या घरात गेल्यावरही सासूबाईंपासून नवऱ्यापर्यंत सारेच जण गुणी

सावनीचे कौतुक करत संगीतासह साऱ्याच कलांना प्रोत्साहन देतात