Wednesday, February 6, 2008

स्पर्शातली जादू कुणाजवळ असेल ?

खरच. स्पर्शातली जादू कुणाजवळ असेल ?
उत्तर एकच... आई !
ममता,माया आणि खरा आपलेपणा
ओलाव्याचा तो स्पर्श
अनेक समस्यांवरचा तो एकच उपाय
आईचा मायेचा स्पर्श !
आईशी भांडलो.. अबोला धरला
पोट बरोबर नव्हते तेव्हा आईने पोट चोळण्यासाठी हात फिरवला
आणि काय आश्‍चर्य इतके छान वाटले की बरे वाटायला लागले.
वय झाले .आकाराने वाढलो.
नोकरीत पद मिळाले
तरी आईच्या त्या हातातील जादूई स्पर्शाने ती किमया घडविली.
लहान होतो पण वजनही भरपूर होते.
सतत कुठेतरी पडायचो.
हाताला,पायाला जखम व्हायची.
एकदा तर रोज दवाखान्यात न्यावे लागायचे.
आईच्या कमरेवर स्वार होउन पट्टी करायसाठी जावे लागायचे.
त्या आठवणी आजही ताज्या होतात.
पुरणपोळी,बेसनाचे लाडू,करंज्या खाव्या तर आईच्या हातच्याच

पदार्थात काय किती घातले
यापेक्षा मन आणि आपलेपणाचे तिखट-मिठ आणि साखर जी आईने त्यात मळली त्याला
तोड नाही.
आजही तीची आठवण होते
मन जाते भूतकाळात,रमतो मी स्पर्शात.
आईच्या त्या आठवतातून काळ उमटतो.
गरीबी दिसते पण टोचत नाही.
मिलोची भाकरी आणि पातळ आमटीत निवडून घ्यावेत अशीच डाळ असायची
पण त्या भाकरी-आमटीची चव कशालाच येणार नाही.
हे घडते त्याची किमयागार म्हणजे आई.
त्या मातेला वंदन,तीच्या आठवांची सोबत आणि तीच्या स्पर्शाची महती
सारेच आनंददायी आणि अगणतीत असेच.
आई,आज नाही.पण मनात ..घराघराच्या चराचरात भरून राहिली आहे.
माते तुझ्या कुशीत मी धन्य झालो.

subhashinamdar@gmail.com

Monday, February 4, 2008

तू फक्त लढ म्हण..

दिलास एक मुद्दा आणि लावलास एक ठोका
परप्रांतियांना झोंबला आणि झाला एकच ठेका
दगड उचलले ,काचा फुटल्या
हाताला काम,पोलिसांचा घाम
थोडी दहशत, थोडा हंगामा
झोबलेल्यांचा झाला,एकच गलका
वाहतूक रखडली,थोडी ठप्प
सगळीकडेच झाले सारे चिडीचूप्प
कधीतरी जागा होणारा वाघ होता
का वाघाचे रूपात आलेला एक भास होता
कांही झाले तरी गडबड मात्र झाली
पहाता पहाता तांरांबळही झाली
मराठी माणूस आता तरी जागा झाला
उप्रत थंडी पण मुंबईत तो लढता झाला
झाले आता ते पुरे झाले
नाही तरी आता होणार काय म्हणाले ?


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com