Monday, April 7, 2025

आप्पासाहेब जळगावकर हार्मोनियम फाउंडेशनच्या वतीने जन्मशताब्दी..!

 

आपा जळगावकर यांच्या वादनात असलेल्या गुणवैशीष्ट्यांबद्दल अधिक अभ्यास व्हावा.. डॉ. विकास कशाळकर वादनामध्ये सलगता असावी लागते ती त्यांच्या वादनात आढळते..हार्मोनियम वादनात त्यांनी जे वेगळे काम केले..त्याचा अभ्यास व्हायला हवा.. कसे, कुठे आणि किती वाजवायचे हे त्यांनी दाखवून दिले.

प्रत्येक गाण्यातली वैशिष्ट्य आत्मसात करून त्यांनी आपल्या वादनातून त्यांनी सर्व घराण्यातील गायकांना साथ केली..असे हार्मोनियम वादक कोणत्या पद्धतीने वाजवित होते यावर संशोधन होणे अपेक्षित आहे, असे मत डॉ. विकास कशाळकर यांनी ज्येष्ठ वपेटी वादक आप्पासाहेब जळगावकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त सुरू झालेल्या पहिल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

शुक्रवारी पुण्यात भरत नाट्य मंदिरात आप्पासाहेब जळगावकर हार्मोनियम फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त खास सभा आयोजित केली होती. यावेळी कशाळकर बोलत होते.




आप्पासाहेबांच्या आठवणी.. सांगताना त्यांनी साथ करताना छोटा मोठा कलाकार असे काहीही बघितले नाही.. सगळ्यांबरोबर त्यांनी प्रेमाने वाजविले..असे नृत्य गुरू शमा भाटे यांनी सांगितले.
पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी दिग्गज कलाकारांना साथ करताना ते करताना कार्यक्रम अधिक चांगला कसा होईल हे पाहणारे पेटीवादक आप्पासाहेब जळगावकर..



गाण्यातील सर्व घराण्यावर प्रेम करून त्या त्या घराण्यातले बारकावे त्यांनी आत्मसात केले..सहज वादन.. हार्मोनियमयला नवीन आयाम दिला...प्रतिष्ठा प्राप्त करून दिली..असे गौरवपूर्ण उद्गार काढले.
भरतचे अध्यक्ष आणि तबलावादक पांडुरंग मुखडे...भीमसेन जोशी यांच्या बरोबर ३५ वर्षे साथ करणारे आप्पा जळगावकर यांची आठवण त्यांनी सांगितली.
भीमसेन जोशी यांच्या बरोबर दौरा करून घरी परतल्यावर जी तान पेटीतून निघू शकली नाही त्याचा रियाज करीत असल्याची आठवण मुखडे यांनी सांगितली.
यावेळी मंचावर जळगावकर यांचे शिष्य प्रमोद इनामदार उपस्थित होते. राम कोल्हटकर यांनीही
मंचावर हजेरी लावली.


पेटीला पंख देणारे स्वर गंधर्व.! या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्यावर संशोधन करून डॉक्टरेट मिळविलेले हार्मोनियम वादक डॉ .ऊपेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी आप्पांवर तयार केलेली चित्रफित दाखविण्यात आली.
डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी शैलेश वर्तक यांच्या तबला साथीने आपल्या हार्मोनियम वादनाचे कौशल्य सिद्ध केले..
त्यांनी मियां मल्हार आणि नाट्यगीत सादर केले.





पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने रसिकांना आगळी संगीत मेजवानी मिळाली.
प्रथम सूर साधे..बंदिश आणि साहेला रे..आणि शेवटी पद्मनाभा नारायणा या भजनाने रघुनंदन पणशीकर यांनी रसिकांना तृप्त केले.
त्यांना तबला साथ केली ती .. पांडूरंग मुखडे यांनी तरपेटीची साथ..कुमार करंदीकर यांनी केली होती..
संपूर्ण वर्षभर आप्पासाहेब जळगावकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त १२ कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती..कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारे संजय गोखले यांनी सांगितले.

- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

अभिजित पंचभाई गीतरामायण नवीन कलावंतांना शिकविणार..!









स्वये श्री राम प्रभु ऐकती..ने अभिजित पंचभाई सादर केलेल्या विसाव्या वर्षीच्या गीत रामायण कार्यक्रमाची सांगता झाली ती ..गा बाळांनो श्रीरामायण..या भरून टाकणाऱ्या गीताने..
श्रीराम साठे यांनी संत कृपा मार्फत आयोजित केलेल्या गीतरामारणातील गीतांच्या स्पर्धेत भाग घेतलेल्या दोन तरुणांनी पहिला आणि दुसरा क्रमांक पटकविला..आणि त्यांच्याच प्रेरणेनी गीतरामायण कार्यक्रम करण्याची प्रेरणा राजेंद्र गलगली आणि अभिजीत पंचभाई यांनी २००५ मध्ये घेतली..आणि तीच परंपरा एक व्रताप्रमाणे पार पाडत असलेले आज त्याचा इतिहास घडवून राम नवमीच्या दिवशी आपल्या संचासह तो साजरा करीत रसिकांना राम कथा काळानुरूप ऐकवत असतात..
आता हेच गीतरामायण नवीन गायकांना शिकविण्याची तयारी अभिजित पंचभाई यांनी रविवारी सादर केलेल्या कार्यक्रमात जाहीरपणे मान्य केली असून तसा त्यांनी रसिक..प्रेक्षकांना पुण्यातील कार्यक्रमात दिला.




यंदा वाल्मिकी गीतरामायणाचे अभ्यासक रवींद्र खरे यांनी या राम कथेचे कालानुरूप विचार सांगत केलेले निरूपण हा या कार्यक्रमातील महत्वाचा भाग ठरला.



यंदा.. संगीतकार मिलिंद गुणे..आणि निरुपणकार रविंद्र खरे यांच्या हस्ते श्री राम प्रतिमेला आणि हनुमंताच्या स्थानाचे पूजन करून पहिले गायन स्वये श्री राम प्रभु ऐकती ने वाल्मीकी रामायण गाण्याला सुरवात केली.
अभिजित पंचभाई, राजेंद्र गलगले..देवयानी सहस्त्रबुद्धे,अमिता घुगरी, माधवी तळणीकर या गायकाबरोबर
दिप्ती कुलकर्णी ,चारूशीला गोसावी, उद्धव कुंभार, आशय पाध्ये ,प्रणव पंचभाई,, तसेच उत्तम ध्वनी प्रदर्शन करून हेमंत..शीतल यांनी कार्यक्रम अधिक आपलासा केला.





अयोध्या मनू निर्मित नगरी
दशरथा घे हे पायस दान
राम जन्मला ग सखे
चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला
स्वयंवर झाले सीतेचे
नकोस नौके परत फिरू
माता तू वैरिणि ..अभिजित
पराधीन आहे जगती..राजेंद्र
मागणे हे एक रामा
आपल्या त्या पादुका..अभिजित




सूड घे त्याचा लंकापती..अमिता घुगरी
मज आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा.. देवयानी सहस्रबुद्धे
वाली वध ना खल निर्दालन ..राजेंद्र
मज सांग अवस्था दुता रघुनाथची..माधवी तळणीकर
सेतू बंधारे सागरी..अभिजित..राजेंद्र
सुग्रीवा हे साहस असले..राजेंद्र
भूवरी रावणवध झाला..सर्व.. कोरस


शेवटचे गीत..
रघुरायाच्या नगरी जाऊन..गा बाळांनो श्रीरामायण..सादर झाले..
भाव..शब्द..आणि लय..यांची उत्तम तयारी करून सगळ्याच गायकांनी गीतरामायणातील गाणी भावपूर्ण आणि तन्मयतेने सादर केली..
त्याला साथ दिली ती अभिजित जायदे यांच्या पासून सर्वच तयारीच्या साथीदारांनी.

- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com