Wednesday, September 27, 2017

भारताकडे लता मंगेशकर आहे..

 काही क्षण.. लता मंगेशकर यांच्या सोबत


माझ्या वैयक्तिक आवडीतून सुरु झालेला एक उपक्रम म्हणजे मी गेली पंधरा वर्षे ‘थीम कॅलेंडर’ प्रसिद्ध करतोय. भारतीय अभिजात संगीताबरोबरच विविध प्रकारचे संगीत आवडत असल्याने जवळपास सर्वच कॅलेंडर्सचे विषय संगीतातील ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्ती व त्यांचे सांगीतिक कार्य या भोवती गुंफलेले असे आहेत. स्वाभाविकपणे यात मंगेशकर हा विषय येणे अपरिहार्यच होतं. योग्य संधीची मी वाट पाहत होतो. अशी संधी मला चालून आली २०१० च्या ‘स्वर-मंगेश या कॅलेंडरमुळे.

मंगेशकर कुटुंब हे एक असे कुटुंब आहे की त्याच्या तीन पिढ्या संगीतात आहेत. आणि ही पाच भावंडे तर भारतीय सिनेसंगीतावर सहा दशकांहून अधिक काळ राज्य करीत आहेत. अजूनही त्यांच्या सुरेल गळ्यातून येणाऱ्या स्वरांनी रसिकांचे कान तृप्त होत आहेत.  थीम ठरली. साठ वर्षांची वाटचाल दाखवायची तर एक जुना व एक आत्त्ताचा असे फोटो लागणार. लतादीदी व मीनाताई यांचे रेकॉर्डिंगच्या वेळचे फोटो माझ्या संग्रही नव्हते. ते काढणे आवश्यक होते. आशाताई, उषाताई व पंडितजी यांचे फोटो विविध कार्यक्रमात मी टिपले होते. जुने फोटो मिळवायला लागणार होते. मी मनातल्या थीमवर कामही सुरू केले. नाव ठरले – ‘ स्वर मंगेश ’.


मी  पंडितजींना मनातील कल्पना सांगितली. त्यांना ती आवडली. अडचण एकच होती ती म्हणजे दीदींचा आताचा फोटो लागणार होता. मी पंडितजींना म्हणालो की जेव्हा कधी दीदींचे  रेकॉर्डिंग असेल त्यावेळी मला सांगा. मी तेथे येईन. पंडितजी म्हणाले – “ पाकणीकर, तुम्ही फारच अवघड काम मला सांगताय.”
मी त्यांना लगेचच म्हणालो – “ दीदींना सांगू शकेल अशी या जगात एकच व्यक्ती आहे. आणि ती म्हणजे तुम्ही!”. यावर “ मी विचारतो दीदीला” असे म्हणून तो विषय थांबला.

मध्ये बराच काळ गेला. ते जेव्हा जेव्हा भेटत तेव्हा मला म्हणत “ पाकणीकर, तुम्ही फारच अवघड काम मला सांगताय. मी तुम्हाला नंतर फोन करतो”. पण ती गोष्ट त्यांच्या लक्षात मात्र असेच.

१० ऑक्टोबर २००९. वेळ संध्याकाळी ७.०० ची. मी परत एकदा आठवण करण्याच्या उद्देशाने पं. हृदयनाथ यांना फोन केला. ते मुंबईतच होते. त्यांच्या लक्षातही होतेच. मला म्हणाले मी फोन करतो तुम्हाला.



रात्री पावणे अकरा वाजता त्यांचा फोन आला. “ मी दीदींशी बोललोय. तिला कल्पना आवडलीयं. तिने तुम्हाला १४ ऑक्टोबरला रेकॉर्डिंगला बोलावलंय.” माझे एक फार मोठे काम पंडितजींनी केले होते.

‘स्वर मंगेश २०१० ‘ लवकरच रसिकांच्या भेटीस येणार होते.

१४ ऑक्टोबरच्या संध्याकाळी जुहूचा ‘स्वर लता’ स्टुडिओ. आदरणीय दिदी रेकॉर्डिंग करायला येणार होत्या. व्यंकटेश स्तोत्र रेकॉर्ड होणार होतं. मी माझे दोघेही बंधू हेमंत व हरिष व माझा सहाय्यक जितेंद्र असे स्वरलता स्टुडिओत पोहोचलो. मी जितेंद्रला सांगितले की दीदींचा मूड कसा आहे ते पाहून मी तुला इशारा करीन. तो जर उत्तम असेल तर मग तू - मी त्यांचे फोटो घेत आहे असे काही फोटो काढ. मला ते हवे आहेत. फोटोसेशनचे फोटो!  आम्ही आधीच पोहोचलो असल्याने स्टुडिओत जावून लायटिंग करून तयार होतो.

बरोबर सहा वाजता  भारतरत्न लता मंगेशकर स्वरलता स्टुडिओत पोहोचल्या. मध्यंतरीच्या दिड-दोन वर्षात त्यांना भेटलो नव्हतो. त्याच काळात त्यांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन झाले होते. पण तेव्हा कोणाला  त्यांना भेटायची परवानगी नव्हती. पण आज त्या अत्यंत प्रसन्न मूडमध्ये होत्या. मला म्हणाल्या “ किती दिवसांनी भेटत आहात?” त्यांचा तो मूड पाहून मी जितेंद्रला इशारा केला. त्याने त्याचे काम सुरू केले. दिदी सर्व पाहत होत्या. त्यांच्या समोर कागद होते. रेकॉर्डिंगच्या आधीची तयारी. हेडफोन लावलेला.... मला हे सर्व टिपायचं होतं.

“ आपण रेकॉर्डिंगच्या आधीच फोटो काढू !“ भारतातला सर्वात सुरेल आवाज सांगत होता. मायक्रोफोन समोर साक्षात भारतरत्न लता मंगेशकर उभ्या होत्या. मी फोटो काढण्यास सुरुवात केली. मला त्यांचे गातानाचे भाव टिपायचे होते. पण समोरील लिहिलेल्या कागदाकडे बघून त्या तो मनातल्या मनात वाचत होत्या. मी काही फोटो टिपले पण त्यात ‘एक्स्प्रेशन‘ नव्हते. मी नम्रपणे त्यांना तसे सांगितले व डिजिटल कॅमेरा  असल्याने त्यांना ते फोटो दाखवलेही. त्या स्वतः एक उत्तम प्रकाशचित्रकार असल्याने त्यांना माझी अडचण लगेचच समजली. पुढच्याच क्षणी त्यांच्या दिव्य स्वरात व्यंकटेश स्तोत्राच्या शब्दांनी स्टुडिओ भरून गेला. कानात स्वर साठवावे का चित्र कॅमेऱ्यात पकडावे या द्विधा अवस्थेत मी.

पुढच्याच ‘फ्रेमने’ माझे काम झाले होते. आम्ही सर्व त्या अलौकिक क्षणाचे साक्षीदार आहोत का स्वप्नात आहोत हे मनाला समजत नव्हते.    

त्या दिवशी विविध कोनातून विविध भाव असलेली अनेक प्रकाशचित्रं मला टिपता आली. डिजिटल असल्याने ते फोटोही त्यांना दाखवता आले. बरोबरच त्यांच्या जुन्या रेकॉर्डिंगचे फोटोही त्यांनी दिले. एक कधीही न विसरता येणारा अनुभव घेऊन आम्ही पुण्याला परतलो.



३० डिसेंबर २००९ रोजी ‘प्रभुकुंज’ सोसायटीच्या हॉल मध्ये सर्व मंगेशकरांच्या उपस्थितीत लतादीदींच्या हस्ते ‘स्वर मंगेश २०१० ‘ कॅलेंडरचे प्रकाशन झाले. या कॅलेंडरच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांना सुमारे पन्नास मिनिटांची मुलाखतही दिली. पुन्हा एकदा अवर्णनीय असा अनुभव. मला तेव्हा काय माहित होतं की हे कॅलेंडर सर्व मंगेशकरांना आवडणार असून मला पुढील तीन वर्षे त्यांच्यासाठी तीन थीम्सवर कॅलेंडर करायची संधी मिळणार आहे? प्रकाशनाच्या कार्यक्रमातच दिदींनी जाहीर केले की पुढच्या वर्षीही आम्ही कॅलेंडर प्रसिद्ध करणार आहोत.

आणि पुढे गानसम्राज्ञीची तीन कॅलेंडर्स ‘ तेरे सूर और मेरे गीत -२०११ ’ , ‘एक मै और एक तू-२०१२  ‘ व ‘हमसफर-२०१३‘  रसिकांच्या  भेटीस आली. प्रत्येक वेळचा त्यांच्या सहवासाचा अनुभव काळजाच्या कुपीत जपून ठेवावा असा.

माझी, माझ्या आधीची व त्याही आधीची अशा तीन पिढ्या अतिशय भाग्यवान! या कलावंतांची कला प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या पिढ्यांना मिळाली. गेली साडे सहा दशके मंगेशकर कुटुंबीयांनी संगीत रसिकांना आपल्या अलौकिक, दिव्य स्वरांनी मोहून टाकलंय. दीदींच्या एका कार्यक्रमात वर्णन करताना महानायक अमिताभ बच्चन असे म्हणाले होते की “ भारतीयांना कोणी विचारले की तुमच्याकडे सर्वोत्तम असे काय आहे ? तर त्याचे उत्तर असेल भारताकडे ‘लता मंगेशकर’ आहे.”
असा हा सर्वोत्तम, सुरेल व दैवी स्वर आज वयाची ८८ वर्षे पूर्ण करतोय.
लतादीदी .... आपल्याला उदंड आयुष्य व आरोग्य लाभो ही मनःपूर्वक शुभेच्छा !  






- सतीश पाकणीकर
- sapaknikar@gmail.com
- www.sateeshpaknikar.com
- M: 98230 30320

Sunday, September 24, 2017

कर्नाटक पहावा केवळ `अनुभव`सोबत..



ती परंपरा कायम



कर्नाटकातल्या सागरी किनारीची सफर म्हणजे  कोस्टल कर्नाटक करून पुण्यात आम्ही दहाजण परतलो..पण खरंच आजही त्या सहलीत लुटलेल्या आनंदी क्षणांची पुर्नभेट सतत व्हावी. त्यातले काही तुमच्यापर्य़त सांगावेत असे मनापासून वाटते.


याची कराणे अनेक. एकतर  अनुभवचे यश ज्यांच्या मुळे गेली बारा वर्ष वाढत गेले..त्याचा मूऴ पाया रचला तो अरूण भट यांनी..खरच अवलिया माणूस. निसर्गवेडा. पुन्हा गावाकडे चला सांगतात , बोलतात अनेक जण..पण भटांनी मुंबईतल्या अनेकांना कर्नाटकातल्या सिरसीत निसर्ग उभा करून कर्नाटकातली इतरांना दिसलेली स्थळे शोधली.. 

त्या रस्त्यावरून जेव्हा अनुभवच्या मंडळींना डोळे उघडून निसर्गातल्या आनंदाकडे पहायला शिकविले..निसर्ग वाचायला शिकविला. बरोबर स्वदिष्ट महाराष्ट्रीयन आणि कर्नाटकीय पदार्थांचा आस्वाद दिला. आणि पुन्हा येवो अशी हाक दिली..


आज त्यांच्यामागे ती परंपरा कायम राखत त्यांच्या सुविद्य पत्नी, जावई, मुलगी आणि सारा अनुभवचा सहकारी वर्ग. तिच वाट त्याच जिद्दीने आणि चिकाटीने पुढे नेली आहे..त्यांचे स्वागत करून त्यांच्या या यशाचे साक्षिदार बनण्याचे ठरवून ते अनुभवून परत येताना त्यावर काही शब्दात सांगावे यासाठी हा प्रपंच केला..








चार वर्षापूर्वी आम्ही बारा जण अनुभवच्या पुण्यातल्या कार्यालयात मुकुंद चौगुले यांना भेटून कर्नाटकातल्या नविन पर्यटन स्थळांची सफर करण्यासाठी नावे नोंदली..तेव्हा अरूण भट कोण..त्यांची व्यवस्था काय काहिच माहित नव्हती..मात्र इतरांचे अनुभव ऐकून त्यांच्या डिस्कव्हर कर्नाटक सहलीसाठी तयार झालो.. त्याचा अनुभव http://subhashinamdar.blogspot.in/2014/01/blog-post_22.html

या ब्लॉगवर आहेच..



यांच्या सहलीचे वैशिष्ठ आणखी एक..त्या शनिवारी सुरू होतात आणि पुढच्या रविवारीच संपतात..आठवड्याच्या कालावधीत पहिले दोन दिवस ओळखीत जातात..पुढचे दिवस भटकण्यात आनंद घेत कधी निघून जातात..आणि आपण त्या परिवारात कधी एकरूप होऊन जाता..ते कळत नाही .तोपर्य़तच हा सुखद अनुभव संपतो.. पुन्हा जाण्याच्या ओढीने..


कोस्टल कर्नाटका या सहलीला तयार झालो याचे अधिक मोठे कारण अरूण भट यांनी उभारलेल्या पाच एकरावरच्या सिरसितल्या जंगलातल्या जागेवर उभे केलेले `ग्रीन वर्ल्ड` मध्ये चार रात्र मुक्काम.. तिथे राहून आलेल्या कुणालाही विचारा की तुम्ही निसर्गात राहूनही या राहिणीमानात किती छान रमता ते.




दोन दिवस रहातो ते..मुर्डेश्वरच्या अतिभव्य अशा शंकराच्या शिल्पाच्या परिसरात आर एन शेट्टी यांनी उभारलेल्या समुद्राच्या काठावरच्या गेस्ट हाउस मध्ये..म्हणायला ते गेस्ट हाऊस पण ते रहाण्यासाठी खूपच सुरेख आहे.. इथल्या प्रत्येक खोलीतून समुद्राचा नजारा दिसतो..आणि दुसरीकडे मुर्डेश्वर मंदिराचे धार्मिक दर्शन घडते.

https://www.ghumakkar.com/murudeshwar-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/





आम्ही काही पुणेकर मंडळी पुण्याहून पनवेलला गेलो तिथून मत्स्यगंधा ने कुमठाला उतरलो..तिथून अनुभवचे जगदिश पाटील आणि सहकारी  सिरसितल्या ग्रीन वर्ल्ड कडे मुक्कासाठी घेऊन गेले..




अदरातिथ्यात लपेटलेल्या तिथल्या अनिरुध्द शेट्ये आणि प्राची भट यांच्या अनुभवाचे साक्षिदार बनलो.. तोच आपलेपणा..तोच आग्रह.. आणि जातिने विचारपूस..

आमच्याबरोबरच्या काही महिलांना अगदी माहेरपणाचा आनंद देणारा..हा विसावा..मायेचा आणि ममत्वाचा वाटला..


मग काय दोन बावीस  आणि दोन बारा सिटच्या मोटांरींतून बनवासीचे मधुकेश्वर मंदिर..ज्याला कर्नाटकातले दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते..


तिथे जाताना पाहिलेली लसणाची लागवड, काही प्रमाणात उस आणि सुपारी, नारळाची शेती..



भव्य प्राचिन अशा मधुकेश्वर मंदिराच्या प्रवेशव्दारी उभा असलेला भव्य रथ.. 







मंदिरातला नंदी..जो ऐका डोळ्याने शंकारकडे एका डोल्याने पार्वतीकडे पहातो..





जोग फॉल.. 
जो गिरसप्पाचा धबधवा म्हणून पुस्तकातून वाचलेला आहे..सिरसीपासून एकशेवीस कि.मि. दूर.. कारवार जिल्यातला हा जोग फॉल..शरावती नदीचे उगमस्थान शिमोगातल्या तिर्थहळ्ळे आहे. चार धारांमधून पाणी खाली कोसळते..राजा, रोरर, रॉकेट आणी राणी अशी त्यांची नावे ठेवली आहेत..देशातला दुसरा नंबराचा हा धबधबा आहे.. हवा चांगली होती..प्रवासही सुखकर..आणि वातावरणही उत्तम.


उंचेलीचा धबधवा 
जो. 80 कि.मि.वर सिरसीपासून आहे..


तिथे वाटेत..सहस्त्रलिंगम दिसते..शाल्मला नदिच्या पात्रात हजार शिवलिंगे कोरलेले हे ठिकाण सोंडा गावात आहे.



तिथून पुढचा प्रवास होतो तो..खाली खोल खोल जात उंचेलीकडे. खळाळणारे पाणी सभोवताल्या डोंगरावरून खाली कोसळते..ते पहाण्यासाठी आधी अर्धा कि.मि.. उतरत जाणे..मग सुमारे पाचशे पायरी खाली उतरणे..मग दिसतो..तो कोसणारा पाण्याचा प्रवाह.. आम्ही गेलो..तेव्हा पावासाचा शिडकावा..मध्येच उन.. अशातच दिसते..ते इंदर्धनुष्य..मन प्रसन्नतेने भरते..पण वर चढताना होणारी दमणुकही सहन करावी लागते.


याणाचा भस्माचा डोंगर.  


जो सिरसीपासून साठ कि.मि. वर आहे. .अतिप्राचिन ..पुराणकालिन.. भस्मासूराचा वध करून शंकराने पार्वतीला तिथे पाठविले..म्हणून तिथे भस्मासूराची राख होते..म्हणून त्याला भस्माचा डोंगरही म्हणता.. 


तिथे.भव्य अशी प्रदिक्षणा गुफा आहे. खाली.शंकराचे भैरवेश्वर मंदिरही आहे..


सिरशीतल्या मनकर्णिका मंदिरातल्या मुकांबिका देविचे दर्शन आणि थोडी खरेदी करून..सिरसीतून मुक्काम हलवून निसर्गाचे वारे खाते आपण कुमठा मार्गे होनावरला येतो.


.सुखद गारवा अंगावर घेत..आता शरावती नदीच्या पात्रातले बोटिंग करतो.. आणि पुढे गाकर्ण महाबलेश्वरच्या दर्शनासाठी उतरतो..



शंकराचे आत्मलिंग तिथे आहे असे मानले जाते. रावणाने शंकराला प्रसन्न करून  शिवलिंग लंकेला नेताना  वाटेत गणपतीच्या हातून ते कसे इते स्थापन झाले याची आख्यायिका आपणाला माहित आहेच.







तिथल्या महावलेश्वराचे दर्शन घेऊ..श्री गणपतीच्याही भाविकतेने पाया पडून पुढे मुर्डश्वराकडे मुक्कामाला निघतो..  


पनवेल कन्याकुमारी महामार्गावर धावणारी आमची गाडी जेव्हा मुर्डेश्वराच्या जवळ येऊन पोहोचते..तेव्हा दिसणारी भव्य शंकराचे शिल्प मनात साठून रहाते..




समुद्राकाठच्या गेस्ट हाउसवर विश्राम करून भगवान शंकराच्या मंदिरात संध्याकाळच्या आरतीला आणि नंतरच्या प्रदिक्षेणाला हजर राहण्याचे भाग्य लाभते.  


एकशे तेवीस फूट शंकराचे भव्य शिल्प आणि  दोनशे सदतीस फूट उंच सोळा मजली असेलेले मंदिराचे गोपूर अरबी महासागराच्या विशाल पाण्यावरही आपली सत्ता कायम कोरले गेले आहे..



काही प्रकाशचित्रातून तेच रूप साकारताना पाहण्याचा मनस्वी आनंद आम्ही घेतला..  



 शंकराच्या शिल्पाखालील गुहेत साकारलेले गाकर्ण महाबलेश्वराचे..म्हणजे शंकराची हु पुराणकाथाही चित्रमय स्वरूपात अनुभवणे हाही आनंद घेतला..  






मुर्डेश्वरच्या मुक्कामात एडगुंजीचा महागणपती..बेंदूरचा  सूर्यास्तचा देखावा.. 


पण आम्हाला ढगाळ हवामानामुळे  तो दिसला नाही.पण नदीचे सागरातले समर्पित होणे..या उंचावरच्या परिसरामुळे शक्य झाले..वाटेवर मोरांचेही दर्शन घडले..


आणि उपुंदा नदी  अरबी समुद्रात मिळते तो देखावा मात्र अगदी स्पष्ट दिसू शकाला..


मग अखेरीस झाले ते सोमेश्वर सागर तिरावरचे समुद्र दर्शन..कांहींनी त्यात स्नाहनही केले..तर काहींनी सागर लाटांचा आनंद घेतला.






शिरालीचा गणेश आणि महामाया मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर आमच्या गाड्यांचा ताफा चालला  चित्रापूरच्या सारस्वत मठाकडे.. 

मठातली धार्मिकता मुलांचे वेदपठण आणि श्री शंकराच्या पिंडींचे होम हवन पाहतान मन प्रसन्न होते.. मठाशेजारच्या तलावाकडेही आमची नजर गेली..

तिथली निरव शांतता आणि स्वच्छता पाहून मनाचा मुक्काम इतेच कायमचा असावा असे वाटत राहिले..  मठा शेजारी. साकरलेले प्राचिन मूर्ति आणि शिल्प कलेचे नमुने पहातच राहिलो.तिथला भव्य रथ..जा केवळ हनुमान जयंतीला बाहेर काढला जातो..त्याची कालकुसर केवळ अप्रतिम होती..पण केवळ पाहण्यापुरते..त्याची प्रतिमा साठनूव ठेऊ शकत नव्हतो..ते एका स्वांमिंचे एकट्याचे संग्रहालय होते..




सगळ्या प्रवासाच्या आठवणी काढत सारेजण...मुर्डेश्वराच्या शंकराच्या प्रतिमेला मनोमन नमस्कार करून पुन्हा कोकण रेल्वेच्या मंगलोर ते कुर्ला..मस्त्यगंधाने पनवेलकडे निघालो..


प्रत्येकाची एकमेकांशी ओळख होणेही महत्वाचे होते..तेही झाले..आणि सगळ्यांसाठी अनिरूध्द शेट्ये यांनी सादर केलेला जुन्या हिंदी गाण्यांंचा चित्रमय कार्यक्रमही सर्वांना आवडला..
विशेष करून सिरसिचे गायक श्रीधर हेगडे यांचे अभंग  आणि संतरचनाही सगळ्यांनाच आनंद देत होत्या


विशेष करून अनिरुध्द शेट्ये, प्राची भट..जगदीश पाटील, राम पटकुरे, अभिषेक जमादार, सागरसह सारे रथाचे सारथी..जे केवळ सारथी नसतात..तेच पुढे सामानाची नेआण करून तुम्हाला सुंदर भोजनही आग्रहाने वाढतात.. गाडीतून उतरपल्यापासून ते गाडीत सामान चढवेपर्य़त..त्यांच्यामुळेच ही सफर सगळ्यांचा मनात कायमची कोरली गेली.


पुन्हा एकदा कर्नाटकात लपलेल्या नयनरम्य  निसर्गाचे रुप अनुभवण्यासाठी तिथले प्राचिन जीवन आणि परंपरा पाहण्याचे वचन मनोमन घेऊन.



-सुभाष इनामदार, पुणे
9552596276