Friday, January 23, 2009

मधूप मुदगल यांचे श्रवणीय गायन

सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील तिसरा दिवस

मधूप मुदगल यांच्या गायनाने आरंभापासून रंगत गेला.

स्वरास्वराचा बारकाईने केलेला विचार. गमकयुक्त ताना.

आर्वतनातील शिस्त यामुळे त्यांचे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय झाले. हार्मोनियची साथ डॉ. अरविंद थत्ते यांची तर भरत कामत यांनी तबल्याची साथ केली.

- सुभाष इनामदार, पुणे

Thursday, January 22, 2009

रसिकांना रसिकांना भेटण्यासाठी "भारतरत्न" महोत्सवात "

शनिवारी संध्याकाळी मधुप मुद्‌गल यांचे गायन रंगत होते.
अचानक व्यासपीठाच्या उजव्या बाजूला धावपळ दिसली.
\एक पांढरी गाडी मंचाजवळ थांबली. कॅमेऱ्यांचे फ्लॅश उडायला लागले.
संगीत श्रोत्यांमधूनही चुळबुळ सुरू झाली.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी
"भारतरत्न' पं. भीमसेन जोशी रसिकांना भेटण्यासाठी दाखल झाले होते.
कांही काळ गाणे थांबविण्यात आले.
सर्वांचे लक्ष लागले होते गाडीत बसलेल्या पंडितजींकडे.
पंडितजी आल्याची घोषणा निवेदकाने केल्याबरोबर संपूर्ण सभागृह
त्यांना मानवंदना देण्यासाठी उठून उभे राहिले.पंडितजींना बोलवत नव्हते.
तरीही खास सुरक्षा व्यवस्था असलेल्या गाडीत बसलेल्या पंडितजींच्या हातात,
निवेदकाने माईक थोपविला.
अनेक वर्षांपासून आपल्या गायकीने रसिकांचे कान तृप्त करणारे पंडितजी म्हणाले,
""माझी पकृती बरी नसतानाही मी श्रोत्यांना भेटण्यासाठी येथे येण्याचा प्रयत्न केला'.
संपूर्ण श्रोतृवर्ग त्यांच्या या शब्दांनी धन्य झाला.
टाळ्यांच्या गगनभेदी गजरानेच त्याची जाणीव करून दिली.
कांही काळ पंडितजी गाडीतच बसले होते.
गायनाचा काही काळ आस्वाद घेतला.
कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मंचाजवळची ती पांढरी गाडी दिसेनाशी झाली.

Monday, January 19, 2009

पुण्यात दहशतवादी

सशस्त्र अतिरेकी पुण्यात आल्याची ही खबर आज तरी प्रत्यक्षात आलेली नाही.
पोलिसांचा शोध सुरू आहे.
बंदाबस्त चोख दिसतो आहे. खबरदारी चहुबाजुंनी घेतली आहे.
पुणेकर जागरूक पुण्यात दहशतवादी आल्याची खबर पोचली आणि पुणेकर जागृत झाले.
नागरीकांनी सतर्क रहावे यासाठी पोलिसांनी यंत्रणा मजबूत केल्याचे दिसले.
काल एक हवा निर्माण झाली होती. पोलिसांनी शहराची नाकाबंदी केली.
तातडीने शहरात वाहनांचे चेकिंग सुरू झाले.
मराठी चॅनेलवर काल सारखे तेच प्रामुख्याने दाखवत होते.
चौका चौकात बंदोवस्त वाढविला गेला होता.
काल रात्री तर तो अधिकच दिसत होता. पण रविवार तर शांतपणे गेला.
कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

आज सोमवार. कालची परिस्थीती आज नाही. तो आज बिनदिक्कत बाहेर पडलाय.
कुठलिही भितीची खूण न ठेवता.परिस्थतीला सामोरे जाण्यासाठी तो सतत तयार असतो.
आजही आहे. पुढेही राहिल.वरवर वाटणारा चिकित्सक पुणेकर देखील वेळी किती शूर
बनू शकतो याचा प्रत्यय लवकरच कृतीतून येईल.
काळजी नको .
संकट येणारच नाही.
आले तरी पुणेकर सामन्यासाठी तयार झालाय.
सशस्त्र अतिरेकी पुण्यात आल्याची ही खबर आज तरी प्रत्यक्षात आलेली नाही.
पोलिसांचा शोध सुरू आहे.बंदाबस्त चोख दिसतो आहे.
खबरदारी चहुबाजुंनी घेतली आहे. पुणेकर जागरूक आहे.
तो अधिक जागरूक होणाराय नक्की

Sunday, January 18, 2009

गच्चीवरील बागेतून स्वप्नं साकार...








छान सुंदर घर असावं. घराभोवती बाग असावी. बागेत रंगीबेरंगी फुले फुलवीत. एक कोपरा असा आसावा, की नव्या रचना इथे घडाव्यात. नवे प्रयोग इथे दिसावेत. घराला लागणारा भाजीपाला. काही प्रमाणात फळेही यावीत. घराच्या बगीच्यात बसून मस्त गप्पा छाटाव्यात. सहचारिणी सोबत असावी. मुलांनीही खेळून धुडगूस घालावा.

असे स्वप्नातले घर दिसणे आता कठीण. घरांच्या किमती परवडेनाशा झाल्यात. बंगला आता विसरा, चांगला फ्लॅटही चालेल. जमलीच तर बाल्कनी असावी. मिळालीच जर टेरेस तर उत्तमच. कुठेही राहिलात तरी निसर्गाला जवळ करण्यासाठी चार-पाच कुंड्यांतली झाडे तरी हवीतच. अशाच स्वप्नांचा पाठपुरावा करताना भेटले एक रो-हाऊस. पुढे-मागे जागा. तीन टेरेस आणि वर झेड आकाराची का असेना स्वतःच्या मालकीची गच्ची.

अशी फुलवली
-बागेसाठीजागा मिळाली याच्या आनंदात ती फुलविण्याचे कसबही आपणच करावेत, अशा निश्‍चयातून माती आणली. रोपे निवडली. कुंड्यांची रचना सर्व बाजूंनी चांगली दिसावी म्हणून तिरक्‍या विटाही लावल्या. गुलाब, पारिजात, तगर, नारळ, मोगरा, जाई लावली. वर्षभरात फुले दिसू लागली. ती किती येतात, यापेक्षा "आपल्या बागेतली' याचा आनंद अधिक मिळाला.कुठलेही खत न घालता पाण्याच्या योग्य नियोजनातून बागेतली हिरवळ वाढू लागली. नारळ, चिकू यांनी अजून दर्शन दिले नसले तरी रामफळाच्या आगमनाने छान वाटले.आडनाव इनामदार पण कुळ कायद्याने शेतीच्या सात-बारात नाव राहिले. एकरात शेती करण्याची संधी स्क्‍वे.फुटात घेतोय, असो. रो-हाऊसची संकल्पित सोसायटी काळाला मान्य नव्हती. शेजारी आणि मागे फ्लॅट आले. परिणामी बागेला मिळणारे ऊन गायब झाले. आजही झाडे आहेत, पण ती सकाळच्या वा दुपारच्या उन्हामुळे नाहीत, तर संध्याकाळी येणाऱ्या उन्हाच्या प्रकाशाने. बागेच्या नियोजनानुसार घराच्या परिसरातील राडारोडा काढून त्यावर पोयटा माती टाकून रोपे लावली. सिमेंटच्या जंगलात हिरवळ साकारली. पहिला उत्साह इतका होता, की रोपांमध्ये अंतर कमी झाले. त्यामुळे झाडांना उसासा घेण्यासही जागा उरली नाही; मात्र रोपांच्यासाठी लागणाऱ्या खताचे उत्पादन स्वतःच करायचे ठरविले होते. यासाठी चार वर्षे घरातल्या निवडलेल्या भाज्यांची देठे, पालापाचोळा, देवाचे निर्माल्य सारेच जिरविण्यासाठी बाजूच्या मातीचा उपयोग केला. त्यातले सिमेंटचे-विटांचे तुकडे, साराच भार कमी करून मातीचा अंश वाढवला. त्यावर पाण्याचा फवारा देऊन खताची निर्मिती केली. गांडुळे न सोडता खत तयार झाले. बागेतल्या झाडांना ते घातले. त्यातून रोपांची वाढ जोमाने झाली. इतकी की मधुमालतीचा, जाईचा वेल घरावर चढला. तीस-पस्तीस फुटांवर बहरत राहिला आहे. गुलाबी जास्वंद आणि पारिजातकाने इतके बहरणे, वाढणे थांबवावे असे वाटले. अखेरीस छाटणीचा मार्ग निवडावा लागला. वारंवार रोपांभावती आळे करणे चालूच होते. बागेतल्या पानांतून निर्माण होणाऱ्या नैसर्गिक खतानेही झाडांचा बहर वाढविला. काही झाडे काढून सोसायटीच्या बागेत हलवली. काही कुणाला देऊन टाकली.

आता दर्शनी भागातली हिरवळच सांगते की आता पुरे. मग काय गच्चीवर कुंड्यांतून रोपे लावायची कल्पना आली. यासंदर्भात माहितीसाठी "ऍग्रोवन'मधील लेख मार्गदर्शक ठरले.





सुभाष इनामदार, पुणे-५१
संपर्कः ९८८१८९९०५६