Saturday, December 31, 2011

मराठी असे आमुची मायबोली


मराठी असे आमुची मायबोली

जरी आज ती राजभाषा नसे.

नसो आज ऐश्वर्य या माउलीला

यशाची पुढे दिव्य आशा असे.

.

जरी पंचखंडातही मान्यता घे

स्वसत्‍ताबले श्रीमती इंग्रजी.

जरी मान्यता आज हिंदीस देई

उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी.

.

मराठी असे आमची मायबोली

जरी भिन्न धर्मानुयायी असू .

जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे

हिला बैसवू वैभवाच्या शिरी.

.

-- माधव जूलिअन (1894 - 1939) कविता संक्षेप

.

maraat'hi ase aamuchi maayboli

j'ari aaj' ti raajbhaashaa nase.

naso aaj' aishvarya yaa maaulilaa

yashaachi pud'he divvya aashaa ase.

.

j'ari panchakhand'aatahi maannyataa ghe

svasattaabale shrimati ingraji.

j'ari maannyataa aaj' hindis dei

udele nave raasht'ra he hindavi.

.

maraat'hi ase aamuchi maayboli,

j'ari bhinna dharmaanuyaayi asu.

jaganmaannyataa his arpu prataape

hilaa baisavu vaibhavaachaa shiri.

.

-- maadhav julian (1894 - 1939) kavitaa sankshep

................................. 2 ...................................

पारतंत्र्यकालात वरील कविता आली.... लोकप्रिय झाली.

कोल्हापूर, सांगली वगैरे संस्थानात मराठी राजभाषा

होती. पण ते अपवाद होते. इंग्रजी साम्राज्य पंचखंडात

अनेक देशात पसरलेले होते. भारताची राजभाषा इंग्रजी

होती.. ही व्यथा कवितेत आली.

.

paaratantryakaalaat varil kavitaa aali... lokapriya

zaali... kolhaapur, saangli vagaire sansthaanaat

maraat'hi raajbhaashaa hoti... pan' te apavaad

hote... ingraji saamraajja panchakhand'aat anek

deshaat pasarlele hote... bhaarataachi raaj-

bhaashaa ingraji hoti... hi vyathaa kavitet aali.

................................. 3 .................................

काही शब्द गैरलागू झाले. कारण 1960 मध्ये महाराष्ट्र

राज्य आले.... मराठी काही प्रमाणात राजभाषा झाली.

तरीही इंग्रजी पंचखंडात आहे, पण स्वसत्‍ताबले नाही.

ब्रिटीश साम्राज्य संपले.... पण 1940 नंतर जगभर

इंग्रजीप्रसार अमेरिकन तंत्रज्ञान व उद्योग यामुळे होत

गेला. भारताने स्वखुषीने इंग्रजी स्वीकारली.

.

kaahi shabda gairlaagu zaale... kaaran' 1960

madhe mahaaraasht'ra raajja aale... maraat'hi

kaahi pramaan'aat raajbhaashaa zaali... tarihi

ingraji panchakhand'aat aahe, pan' svasattaa-

bale naahi... brit'ish saamraajja sample... pan'

1940 nantar jagbhar ingrajiprasaar amerikan

tantradnyaan va udyog yaamul'e hot gelaa...

bhaarataane svakhushine ingraji svikaarli.

................................. 4 ................................

सर्व काम मायबोलीत करावे, पण ! भारत बहुभाषी

देश आहे.. विशाल उद्योगांस विपुल धनराशी लागते.

देशभर पसरलेले भागधारक यांना लाभांश व रिपोर्ट

कोणत्या भाषेत पाठवायचे ? महान संशोधन संस्थांचे

कार्य कोणत्या भाषेत ? अशा कित्येक प्रश्नांचे उत्तर

इंग्रजी ! ती जगाची आणि सुशिक्षित भारतीयांची संपर्क

भाषा आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषात पुरेसे

प्रवीण व्हावे. इंग्रजी व तिच्यामधील तंत्रज्ञान, विज्ञान

यांनी मुद्रण, दूरसंदेश, फोटो वगैरेत क्रांती केली. ती

मराठी साहित्य, कला यांना देखील उपयोगी झाली.

.

sarva kaam maaybolit karaave, pan' !.. bhaarat

bahubhaashi desh aahe... vishaal uddyogaans

vipul dhanaraashi laagte... deshbhar pasarlele

bhaagdhaarak yaannaa laabhaansh va riport'

kon'tyaa bhaashet paat'hvaaych'e ?.. mahaan

sanshodhan sansthaanch'e kaarya kon'tyaa

bhaashet ?.. ashaa kittek prashnaanch'e uttar

ingraji !.. ti jagaachi va sushikshit bhaarati-

yaanchi samparka bhaashaa aahe... maraat'hi

va ingraji yaa donhi bhaashaat purese pravin'

vhaave... ingraji va tichaamadhil tantradnyaan,

vidnyaan yaani mudran', durasandesh, phot'o

vagairet kraanti keli... ti maraat'hi saahittya,

kalaa yaannaa dekhil upayogi zaali.




http://www.mngogate.com

Friday, December 30, 2011

नवी प्रेरणा.... घेऊया


नव वर्षाच्या नव्या आशेला नवी स्वप्ने पडावी
मनातल्या नव किरणांना आयुष्याच्या वाटेवर पसरवत
उद्याचा उषःकाल होणार आहे....
कोमेजलेल्या कळ्या आता नव्या उमेदीने फुलणार आहेत...
संस्कृतीच्या पाऊलखुणा अस्पष्ट होत धूसर बनल्या आहेत
नवयुवकांच्या नजरेमधुनी नवी संस्कृती पाझरत आहे...
नव्या-जुन्चांचा संगमाला नवपालवी बहरणार आहे...
गतस्मृतींना विसरुन जावू
नवी नजर मिळवूया...
स्वागत करुया नववर्षाचे
नवी चेतना , नवी प्रेरणा.... घेऊया...





सुभाष इनामदार,पुणे.

रसिकांना जिंकणारी तू


कलेतली हिरकणी तू
कलावंतातली शिरोमणी तू

वादनातली तरबेज तू
मंचावरची तारका तू

वादनात चपखल तू
आपल्याच नादात तू


नाकासमोर चालणारी तू
वेध कलेचा घेणारी तू

रसिकांना जिंकणारी तू
वाहवा मिळविणारी तू

स्वरातली आर्तता तू
सूरावटीच्या मस्तीत तू

स्वभावात साधी तू
चेह-यात नम्र तू


यशाचे शिखर गाठणार तू
तेव्हाही आठवणार ना तू ?




सुभाष इनामदार, पुणे

Tuesday, December 27, 2011

फुलून आले मन


फुलून आले मन माझे, ते तुला कळणार नाही
जाणीवांच्या पलिकडले मन माझे कळणार नाही

उरीच्या वेदनेला फुंकर ही घालून जा
आत रुजलेल्या फुलाला एकदा जोजावित जा

कधी कळणार तुला माझ्या मनीची भावना
समजून घशील तेव्हा थंड झाली भावना




subhash inamdar
subhashinamdar@gmai.com
9552596276

Sunday, December 25, 2011

जन्म अपुरा पडावा यापुढे...




जन्म अपुरा पडावा यापुढे...
माझ्या कुशीत विसावलीस तेव्हा
आकाशही ठेंगणे भासले
उरात धडधड, मनात समाधान
सहज सुलभ भावनांचा तो आवेग
अथांग सागराच्या लाटेला
कधी आवर घालता येतो ?

चेह-यातून तुझा भाव ओसंडत होता
एकरूपतेचे सारे निकष धुळीत मिळवत
सारा एकांताचा प्रवास माझ्या कुशीतून
भरधाव वेगाने धावत होता

देहाचे बंधन झुगारुन
समाधानाने डोळे बोलत होते
अबोल प्रित भासमय वाटत होती
याक्षणांसाठी सारे आयुष्य
प्रत्येकजणच वेचत असेल काय़?
माझीही अवस्था कांहीशी तशीच असेल काय ?

सारा प्रत्यय शरीरीतून स्पर्शत होता
आवेगाच्या मिठीतून सुटण्याची धडपड
मीही आता भारावलेपण जपत
अनुभवत, एकांताची पोकळी
भरुन आसमंतातून
तुझ्याकडे एकाग्रतेने ते पहात
सुखाचे ते क्षण वेचत होतो

आयुष्यातले ते क्षण
आसंडून वाहत होते
प्रेमाच्या वाटेत बसून
स्वर्गसुखाचा वर्षाव झेलत होते

भेटायची यापूर्वीही मला
पण ही ओढ आगळी होती
श्र्वासात गुंतूनही
कणन् कण भारावून सोडत होती

असेच एकत्र येउ या
एकांताची ही ओंजळ
तृप्त मनाने पिऊया
जगाचा विसर संपवून
स्वतःसाठी जगूया
शरीरी शिरशिरी सखये
पिऊन मस्त झिंगूया

मदन, मेनकेची जोडी
आज इथे दिसते आहे
तीव्र भावनेला
उरी तुझ्या कवटाळते आहे

बंध ना तुटावे कधीही
ना विरह व्हावा यापुढे
तुझ्या मिठीत विरघळण्यासाठी
जन्म अपुरा पडावा यापुढे


सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

भान हवे


काव्याला शब्दातून बाहेर काढायला हवे
मनमोकळं वागायला शिकायला हवे..

मन सांगते ते ऐकावे
जन सांगतात तसे वागावे..

सांगण्यासारखो खूप आहे
पण, देण्यासारखे एकच आहे..

देताना घेणा-याचेही भान हवे
पेलताना ताकदीचा अंदाज हवा

नव्या जन्मात फुलण्याचे स्वप्न हवे
समाजात वावरताना देहाचे भान हवे

कसे, कुठे कशासाठी प्रश्न विचारायला हवेत
नदी, समुद्राच्या किना-यावरचे शांतपण हवे...

मागितले ते सर्व मिळायला हवे
अपर्ण केल्यापलिकडले विसरायला हवे..

साधनेला सुचितेचे भान हवे
कलावंतात कलेचे भाव हवे...




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@.gmail.com
Mob. 9552596276

दाराआड डोकावताना


दाराआड डोकावताना नजरेत काय होते ?
हूरहूर, प्रेम, व्याकूळता की ओढ होती ?
झपाटलेल्या एकांताची ती साक्ष होती....

विसरुन न येणारा चेहरा पाहताना थोडी भिती होती
साशंकता, संशय दूर सारणारी ती तीव्र भावना होती..

अकर्षकता, प्रेमभाव सारे कसे एकवटलो होते
आशेच्या सोज्वळ नजरेत ते सारेच व्यक्त होत होते...

काळजी करणारा स्वभाव आत मात्र व्यकूळ होता
गुंतून तुझ्यात अखेरपर्यंत विरही मात्र होता...

वेदनेतून उमलत होते प्रेम चेह-यावर दिसत होते
चंद्राच्या शीतलतेची, सूर्याच्या प्रखरतेची किरणेही त्यात सामावली होती...

पुन्हा पुन्हा आठवताना डोळ्यासमोरुन जात नाही
मनातल्या मनात साठवताना स्निग्धता तरीही ओसरत नाही....



subhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

आले पाहिजे


भावनेला आवर घालता आला पाहिजे
शब्दातूनच त्या प्रकटल्या पाहिजेत
प्रेमाला विरोध करता आला पाहिजे
स्पर्शाला दाबून धरता आले पाहिजे
व्यवस्थेचे, समाजाचे बंधन मानले पाहिजे
दिसताना ते कुणालाच कळले ना पाहिजे
दाटून आलेल्या ओलाव्याला दाबता आले पाहिजे
साठवून ठेवलेल्या क्षणांना विसरता आले पाहिजे
नकळत घडलेल्या चूका दुरुस्त केल्या पाहिजेत
दुस-या मनाचे कधीतरी ऐकता आले पाहिजे
सरळ चालताना पाहता आले पाहिजे
सोपे, सहज बोलता आले पाहिजे
स्वप्नातही कधीतरी जगता आले पाहिजे
वास्तवाचे भान तेव्हाही ठेवता आले पाहिजे
समजून आहे, मला बदलता आले पाहिजे
आतल्या त्या मनात समजावता आले पाहिजे



subhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

आयुष्याच्या वळणावर


आयुष्याच्या वळणावरती
एक ठिकाण नक्की असते
उमलून येते फांदीवरती
त्याचे जाणे पक्के असते...

नसे कुणाला पृथ्वीवरती
कायमचे वरदान असते
कुणाकुणाला क्षणापुरती
फुल परी ते भेट असते...

काटे रुतता रक्तापरी ते
व्रण तो कायम नसतो
फांदीवरच्या फुलापरी `तो`
जिवलग अलगद स्थिर नसतो...

जीवनाच्या श्वासापरी `तो`
क्षण घटकांचे उरी नसे तो
भासला आपुला परी `तो`
वळणावरचा थांबा असतो....


subhash inamdar,Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

आठवणी सुखावणा-या




आठवणी सुखावणा-या
गुंतून, जखडणा-या
बेधुंद, नशील्याही
कधी न संपणा-या
तर कधी त्रोटक

क्षणन् क्षण स्वप्नासारखा
वाचायला गेलं तर घरंगळून जाणा-या
तो स्नेह, जिव्हाळा
लळा लावतो
ती व्य़ाकुळता घायाळ करते
दूरचे दिवे धूसर भासतात
आठवणींचे पंख जवळून भिडतात

तरीही, त्या साठवण्यात अर्थ भरलाय
उधळून आयुष्य, अपुरेपण उरलय....


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276