Sunday, September 9, 2018

आपकी याद आती रही..



संगीतकार जयदेव यांच्या कारकीर्दीला शोभेल असेच...

 
संगीतकार जयदेव यांच्या जन्मशताब्दीचे निमित्ताने महिनाभर त्यांच्या चित्रपट संगीताचा अभ्यास करून ..त्या गाण्यांतील राग, उच्चारण आणि गाण्यांमधल्या जागा समजून घेऊन पुण्याच्या संगीत क्षेत्रात आपले नाव कोरलेल्या अपर्णा संत, प्रज्ञा देशपांडे आणि अनुराधा कुबेर या गायिकांनी शनिवारी पुण्यात सादर करून एक अप्रतिम कार्यक्रम रसिकांना अर्पण केला...

 

 

हिंदी चित्रपटसृष्टीत तीन वेळा रेश्मा आौर शेरा, गमन आणि अनकही या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीतकार म्हणून राष्टीय स्तरावर पुरस्कार मिळालेले जयदेवजी यांच्या लोकप्रिय आणि काहीश्या नवीन रचना घेऊन त्यांच्या संगीतातील वैविध्य़ टिपणारा एक वेगळा आणि दर्जेदार कार्यक्रम सादर झाला.




यात प्रभु तेरो नाम पासून, रात भी है कुछ भिगी भिगी..ये दिल और उनकी, तुम्हे देखती हॅूँ..तुम्हे हो हो..तू चंदा मै चांदनी, आपकी याद आणि शेवटी माता सरस्वती शारदे..पर्यंत..गाणी तिन गायिकांनी आपल्या तरल आणि भावपूर्णरित्या उत्तम संगीताच्या साथीने सादर करून दर्दी रसिकांच्या समोर कुशलतेने मांडली.


कुणी कोणची गाणी म्हटली ते मी महत्वाचे मानत नाही..अपर्णा संत, अनुराधा कुबेर आणि प्रज्ञा देशपांडे आपापल्या परिने उत्तम संगीत गुरू आहेत..पण या तिघिंनी एकत्र येऊन असा आगळा कार्यक्रम करण्याचे धाडस दाखविले , तेही उत्तमरित्या..हे खूप महत्वाचे आणि माझ्या दृष्टीने अधिक मोेलाचे.
प्रत्येकीचा पोत वेगळा पण या कार्यक्रमातून त्यांचा आवाज एक होऊन तो स्वर जयदेवजींच्या गाण्याशी तादात्म्य पावत पसिकांपर्यत पोहोचला हे मोलाचे.






संगीतकार जयदेव यांच्या जीवनप्रवासातील चढउताराचे प्रसंग सांगत सांगत दिलेली सांगेतिक मेजवानी फारच लज्जतदार अनुभवता आली. त्यांच्यावर सरस्वती प्रसन्न होती..पण लक्ष्मी रुसल्याचेही समजले..पण जी गाणी त्यांनी दिली त्यातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला किती उत्तम संगीताचा नजराणा बहाल केला ते यातून उमजले. 




डाॅ.मानसी अरकडी यांचे यथायोग्य , समर्पक निवेदन यातून जयदेवजी समजायला आणि त्यांच्या संगीतातील महानता समजू आली..




विवेक परांजपे, केदार परांजपे या दोघांची सिंथेसायझरच्या संगतीने गाण्यांना दिलेली संगत.  




प्रसन्न बाम यांची हार्मोनियमची साथ, राजेंद्र हसबनीस तबला संगत आणि ऋतुराज कोरे यांचे ढोलक आणि रिदम मशीनवरचे प्रभुत्व सारेच कार्यक्रमाला पोषक असेच होते.





त्यांना या क्षेत्राने थोडे हात आकसूनच दिले.. अखेरपर्यंत पेईंगगेस्ट म्हणून ते एकटेच राहिले.. पण आपली उत्तम गाणी रसिकांच्या चरणी देऊन ते कायम मनात भरून राहिले..
असा कार्यक्रम देऊन रसिकांच्या मनावर त्यांची कारकीर्द कायम कोरली गेली.









सुभाष इनामदार, पुणे


subhashinamdar@gmil.com

No comments: