Friday, April 17, 2009

पहा पण प्रेमाणे !


तुम्हाला वाटेल लिहायला चुकलय. पण छे हो. मुद्दाम तसच काढलय.

मराठी माणूस अशा पाट्या लिहून प्रेमाची भाषा करतोय. पण प्रत्यक्षात तो स्वतःकडेही तेवढ्या प्रमाने पहाताना दिसत नाही.

कारण काय? तर वृत्ती.भाषा संस्कृती वाढली पाहिजे. ती टिकली पाहिजे असे सांगणारा हा मराठी बाणा.


मोडेन पण वाकणार नाही. असे ब्रीद घेऊनच वागतोय. मी मराठी हे स्वाभीमानाचे बीरुद मीरवतोय. पण प्रत्यक्ष वागण्यात त्याचा स्वाभीमान कुठे कच खातोय तेच कळत नाही.त्याला सतत सांगावे लागते की, बाबारे तू मराठी आहेस. भाषा जप. संस्कृती सांभाळ. अभिमानाने मिरव. सारे सांगून थकलेय. राज ठाकरेंनी तर मराठी माणसांचा स्वाभीमान जागृत करण्याचे व्रतच घेतले आहे. पण मला सांगा. त्याला ते झेपेल काय? सर्वममावेशक असा त्याचा स्वभाव. इतरांकडे वर मान करुनही न पहाण्याचा धर्म.

बोलण्यात ताठपणा पण वागण्याच बुजरा असा हा मराठी माणूस. छत्रपती शिवाजी महारांजांनी त्यांचा स्वाभीमान जागृत व्हावा म्हणून महेश मांजरेकरांच्या रुपात मराठी चित्रपट क्षेत्रातून मराठी बाणा जागवायचा प्रयत्न केला गेलाय. पण मला खरे सांगा, तो स्वभीमानी मराठी माणूस असा जागा होईल.

तो चाकरमानी बनलाय. धंद्यात आमची अन्यत्र शाखा नाही हे बीरुद अभीमानाने मिरवतोय.

काळ बदलला तरी तो काही बदल करुन घ्यायच्या मनस्थितीत नाही. भ्रष्ट समाजात वावरतोय. त्यांना जाब विचारायला कचरतोय.खाली मान घालून इतरांचे इमान राखण्यात स्वतःला धन्य समजतोय.

बुध्दी हे ज्याचे शस्त्र आहे. इमान हे त्याच्या रक्तात आहे. सर्वमावेशक अशी त्याची वृत्ती आहे. आज तो निद्रीस्त आहे. त्याला जागविण्यासाठी अनेक क्‍लुप्त्या केल्या जाताहेत.

तुम्हाला वाटते तो जागा होईल. आहे. राहिल?

मतदानाच्या दिवशी तो त्याची ताकद दाखवेल? तुमचा काय अंदाज आहे.......

सुभाष इनामदार, पुणे

email- subhashinamdar@gmail.com

No comments: