Wednesday, July 7, 2010

भक्तिचा हा सागर ...


टाळांच्या नादाने . वारकरी पंथाच्या अभंगाने. भुरळ पडते. हरपून जातो.
पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील एका दिंडीत आजही मी मनाने आहे.
वारकरी पंथांचे भजन चालता-चालता ते गात होते. काय सूर होता खडा. काय नाद होता . संथ ..तरीही टाळांच्या एकेक लडीतून नादांची आवतरणे कानात घुमत होती. मृदुंगाच्या तालाची लय अजून ठेका धरत आहे. गाण्याची उत्तम तयारी . शिष्यांकडून तेवढीच तयारीची खात्री. गरु शिष्याची ही वीण इथेही होती. . सारेच. साठवून मी मनातही तो अभंग आजही गात आहे. शब्द होते.' केली बहूत पर निंदा....'.
पालख्यांच्या गर्दीत ती दडून गेली तरीही त्याचा सूर आजही हाळी घालतोय .

कोकण म्हणू नका. लातूर म्हणू नका.
नाव घ्याल ते गांव इथ हजर .

रस्ता अडनूवच वारकरी शनिवार वाडा ते मंडई परिसरात दाटी करून मनसोक्त हिंडत होते. कधी नुसतेच तर कुणा भजनाच्या नादात.
कुणी चहा देते. तर कोणी बिस्कीटांचा पुडा. दिंडीत सामवलेल्या वारक-यांच्या मुखात कांही जावे यासाठी अगदी बोलावून , वाट अडवून खाणे-पिणे देण्यासाठी व्यापारी वर्ग उत्सुक होता.
जो लक्ष्मी रस्ता तुकाराम महाराज पालखीच्या काळात अबोल झाला होता तो वारक-यांच्या हालचालीने जिवंत- चैतन्यमय बनला होता.
फुटपाथवर चहा देणारा मुलगाही आधी गरम चहा घ्या म्हणजे अभंग म्हणायला हुरूप येईल हे सांगत होता.
मग काय एका भक्तिंच्या साधकांनी टाळ-मृदंगावर मारली थाप आणि सुरू केला अभंग . अगदी दहा मिनिटे. ते गात होते. वारकरी ठेक्यातली मजा सारेच अनुभवत होतो.' पंढरी नामाचा बाजार...' ताला ठेक्यात नामाचे उच्चारण सुरू होते.

पालख्यांच्या मुक्कामीपणाने भक्तिचा हा सागर भावाच्या लहरींवर झुलत होता.
हे सारे शब्दात सांगणे अवघड. ते अनुभवण्यासाठी एकदा पुण्यात येवूनच ते याची डोळ पहा.. साठवा आणि भक्तिच्या शक्तिचा उत्साह जीवनात साठवून ठेवा.


सुभाष इनामदार, पुणे.


subhashinamdar@gmail.com

9552596276

No comments: