Saturday, November 5, 2011

दोन मने


कोणच्याही क्षणी मन मनाशी दोन संवाद करत असते. एक होकारार्थी आणि दुसरं अर्थाचत नकारार्थी.
तुम्ही कुठेही निघालात तरी ते याच विचाराने काहूर माजते. मात्र ते तुमच्या संवंदनाना जोपर्यंत पूर्ण जागे करत नाही तोपर्यंत त्याची जाणीव नेणतेपणी होत नाही. ती संभ्रमावस्था असते. पण एकदा का निर्णय घेतला मग ती निर्णयअवस्था सतत टोचत ठेवते.
म्हणूनच कांही माणसांचा निर्णय झटकनं होत नाही. मात्र निर्णय. हा एकदाच घ्यायचा असल्यामुळे तो घेतल्यावर त्यात नंतर मात्र ते बदल करत नाहीत.
प्रत्येक जणच आयुष्यात अवेक वेळा नव्हे क्षणोक्षणी निर्णयप्रक्रीयेत अडकत असतो. जसे आपण म्हणतो, बोलण्यापूर्वी विचार करा. अगदी दहा वेळा. पण एकदा शब्द तोंडातून निघाला की मग ‘ जिथून तो जातो तिथे त्याची खूण उरत नाही. पण जिथे जावून पोचतो तिथे मात्र जखम होते.”
साधे प्रवासाचे उदाहरण घेऊ. बराच वेळ तुमच्या शेजारी अनोळखी माणूस बसलाय. दोघेही अबोल. मनाने निर्णय घेतला की त्याला नाव तर विचार.
काय हो, तुमचे नाव काय?
का. तुम्हाला काय करायचयं?
पलिकडून उत्तर आलं.
तर तुम्हा केवळ `सॉरी` म्हणून शांत बसता. पण मन तुमच्या निर्णयाला आव्हान देत रहाते. ते डिवचत असते. कशाला गेलास त्याच्या वाटेला ? काही गरज होती. शात बसून राहिला असतास कर काय झाले असते. घेतलास ना हात दाखवून अवलक्षण करून. नाहीतरी खोडच आहे तुझी जुनी...नको तिथे डिवचायला जातोस आणि मला मात्र निराश करतोस.
एखाद्याचा चेहरा पाहूनच समजते की याच्याशी नको बोलायला.
हे ठरविणारे तुम्ही नसता. नकळत तुमचे मनच तुम्हाला अनाहूत सल्ला देत असते...अगदी क्षणोक्षणी!
मुळातच मोठ्या निर्णयाच्या वेळी तुम्ही मनाचे ऐकण्यापूर्वी किंवा त्याचा निर्णय होण्यापूर्वीच अनेकांशी संवाद साधता.
`त्या` घटनेमागचा पुढचा विचार समजून घेता मगच तुम्ही काय करायचे ते नक्की करता.

अशा एका अवचित क्षणी `ती` भेटते..
तुमची ओळख होते
थोडं पुढं जावून स्पर्श करुन बघण्याचा आदेश येतो..
स्पर्श वाढत जातात
जादुभरी बोटं फिरू लागतात
तुम्ही तुमचे रहात नाही
तुम्ही कुणाचे तरी मन
त्याचे विचार ऐकत असता...
सहाजिकच त्यातच हरवून जाता..
हुरहुर लागते. ओढ वाढते.. त्या वेदनाही मग गोड वाटू लागतात..
क्षणांचा सहवास... अधिकाधिक लाभावा अशी इच्छा होवून जाते.
तृप्ती होत नाही. अधुरेपणा सतत जाणवतो..
तिचे मन नव्हे.. तीच तुमच्यापाशी रिती होत असते..
भावना संवेदना बोलल्या जातात.
थोडं ओझं वाटतं. पण ते समजून घेणचं
पहिल्यांदाच वेगळं काही अनुभवून सोडतं.
तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याशिवाय घागर
एकमेकांची नाती अस्पष्ट दिसू लागतात
समाज यालाच प्रेमाची उपमा देत असावे.
सहज भेटलेलं ते फुल हुंगावसं वाटतें....

आणि मग.....

No comments: