Wednesday, October 5, 2016

कुर्ग परिसर पुन्हा पुन्हा `अनुभव`ण्यासारखा Hills of Karnataka



 भाग पहिला... 
टूर निघाली.....


दहा दिवसांची कुर्गची पावसाळी हवा अनुभवून परतलो तरी तिथला निसर्ग, तिथले नयनरम्य वातावरण आणि मूख्य म्हणजे कधी मुसळधार पाऊस ....पुढच्या क्षणाला केवळ पावसाळी ढगांची संगत..
 खरे तर पाऊस संपून आल्हाददायक थंडीचा अनुभव मिळेल या आशेने सारे गेलो ते २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरच्या अनुभवच्या हिल्स ऑफ कर्नाटका या सहलीसाठी..पण प्रत्यक्षात वर्षा सहलीचा पुरेपुर आनंद घेऊन खूपच तृप्ततेने निसर्गाच्या सान्नीध्यात राहून आल्याचा आनंद घेतला..

 मला तर कुर्ग खूप आवडले..तिथल्या म्हणजे मडीकेरीतल्या कॅपिटल व्हिलेज या २७ एकरात उभारलेल्या निसर्गाच्या कुशीत असलेल्या अतिशय छान..स्वच्छ अशा परिसरामुळे..खरोखर मनाली आणि मुन्नार सारखे वातावरण..तरीही कुठेही अधुनिकतेची संगत नाही..रस्ते आहेत..पण महाबळेश्वरसारखे.. बाजारपेठ आहे..पण त्यात व्यवसायिकता कमी...आणि तिथे चहाचे मळे..तर इथे कॉफिची लागवड आणि ओक व़क्षांच्या सावलित वाढलेले मिरिचे वेल..

अनुभवच्या तिन १३ आसनांच्या वाहनातील ते रोजचे फिरणे आता नाही याची खंत पुण्यात आल्यानंतर तर फार बोचते..




दुर्गेश विरकर आणि अभिषेक जमादार या अनुभवच्या आमची काळजी घेणा-या दोन मित्रांची आठवण सतत येते.











.हे सारे शब्दात मांडणे खूप कठीण पण तरीही तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे..याचे महत्वाचे कारण   कर्नाटकात फारसे कुणाला माहित नसलेली ही ठिकाणे.

 तिथला निसर्ग आणि तिथे मनमुराद भटकण्याचा छंद असलेल्या तुमच्यासारख्यांनी तो आपल्या नजरेतून अनुभवावा ही इच्छा.


पुण्यातून भुसावळ रेल्वेने पनवेलला गेलो..तिथे कुर्ल्यातून निघालेली मत्सगंधा एक्प्रेस आम्हाला मेंगलोरकडे घेऊन गेली..आम्ही उडुपीच्या आधी येणा-या मुल्की स्थानकावर उतरलो..तिथे अनुभवच्या मंडळांची ओळख पटली.
.तेव्हापासूनच आमचा `अनुभव`सह प्रवास करण्याचा सुखकारक संवादच घडला गेला. त्यांनी आमच्या सामानाचा ताबा घेतला आणि दीडतास उशीरा येणा-या आमच्यासारख्या सर्व कर्नाटकातले हे डोंगरी भाग पाहणा-या सहप्रवाशांना आपल्या मीनी गाडीतून २८ कि.मी. वरील मुडबीद्रीच्या 



पंचरत्नमध्ये वास्तव्यास ४५ मिनिटात दाखल केले.अनुभवचे तिथले कप्तान होते  दुर्गेश वीरकर आणि त्याच्या जोडीला अभिषेक जमादार...दुपारचे भोजन करून सहज बाहेर पडलो तर प्रवासात वाटेतल्या माणगावपासून बाहेर दिसत असलेला पाऊस आमच्यासह प्रवास करीत आमच्यासोबतच होता...( अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत..)


रोज प्रवास असला तरी पुरेशी विश्रांतीची काळजी अनुभव घेत होता..रोज सकाळी साडेसहाला चहाची आरोळी..नंतर साडेआठला वेगवेगळ्या चवीचे पदार्थांचा नाष्टा..आणि दुपारी दीड तो दोन दरम्यान गरम गरम भोजनाता आस्वाद ..दुपारी चहा त्याबरोबर काही ना काही तोंडात टाकायला..आणि रात्री साडेआट-नऊला रात्रीचे भोजन  .हे सारे देण्याचे तंत्र कुठेही बिघडले नाही..त्यामुळे एक झाले..कुणाचीही तब्येत बीघडली नाही. 

उलट घरी नसलेली शिस्त अंगी भिनली गेली..त्यातही  आग्रहाचे असे सारे जण होतेच..म्हणतात ना पहिले समाधान होते..ते उत्तम भोजनाने..




पोट समाधानी तर मन प्रसन्न...

अनुभवच्या अरूण भटांंसह सिरसीला रहाण्याचा अनुभव असल्याने..तीच परंपरा या सहलीच्या सर्व वास्तव्यात सांभाळली गेली.. इतकेच नव्ह..तर जरा नको तितके ऱूचकरी भोजनाचा आस्वाद आणि भरपूर विश्रांती.


.आणि जिथे नेले ते उत्तम निसर्गातले सौंदर्य...सारेच अनुभवने अनुभवण्यास दिले.
मला वाटते हे अनुभव कर्नाटकात जिथे नेतात..ते सारे इतर फारसे कुणी नेत असतील असे वाटत नाही..कुणाचा अपवादही असू शकेल..










 ही झाली प्राथमिक सुरवात..खरी सहल तर पुढे सुरू गोत आहे..तोपर्य़ंत वाट पहा.

(- क्रमशः)
   



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276




No comments: