
अविरत कष्ट आणि मेहनत घेतलेली अनेक माणसे आहेत.पण त्यांना तसे यश मिळत नाही...
कारण शोधायची प्रयत्न केला तर दिसते..त्यांना नशीबाची साथ मिळाली नाही..
तुम्ही म्हणणाल नशीब वगैरे काही झूट.
पण मित्रांनो शेवटी संधी शोधण्यासाठी ती मिळवावी लागते...
सहजपणे ती घरबसल्या चालून येत नाही..
जर तशी ती आली तर एखादा भाग्यवानच.
म्हणूनच गरज असते ती मार्गदर्शकाची...त्यालाच आपण सारे गुरू म्हणून संबोधतो.
अनेक जण मित्रमंडळी ज्या बाजुला जातात तो अभ्यासक्रम निवडतात..
मग बारावी नंतर लक्षात येते आपली साईड चुकली..
हिच निवड योग्य बाजुला तेव्हाच केली असती तर...
मार्ग अधिक सुकर झाला असता..
एकूणच सारा भार आहे तो तुमच्या शिक्षकांवर..
त्याप्रमाणे मार्गदर्शकावर..
यात तुमचे पाल्यही असू शकतात..
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment