
बालगंधर्व रंगमंदिरी मंगळवारी एक खास समारंभ साजरा होत आहे..त्यानिमित्त...
संगीत सौभद्रचा प्रयोग विमलाबाई गरवारे हायस्कुलच्या संमेलनात त्यांनी प्रथम केला आणि मराठी रंगभूमिची पताका आपल्या खांद्यावर घेतल्याचे तेव्हा जाणविले..तो झेंडा घेऊन आज पन्नास वर्षे झाली...संगीत नाटकांची आणि स्वतःची कीर्ति एकांड्या शिलेदारासारखी मिरवत आजही त्या डौलाने मिरवत आहेत...
त्यांच्या उमेदीच्या काळातल्या भूमिकांनी संगीत रसिक वन्स मोअरची दाद देत...
दादा ते आले ना...हे वाक्य अशा काही थाटात उच्चारत की आठवण यावी ती बालगंधर्वांची .आठवण व्हावी आपली आई आणि मार्गदर्शक जयमालाबाईंची.....
जयराम आणि जयमाला शिलेदार या संगीत नाटकतल्या नामवंत कलावंतांच्या घरी दोन कन्या रत्ने जन्माला आली ती म्हणजे लता आणि कीर्ती.....त्या दोघींनी आपल्या कलासेवेचा वारसा केवळ जपलाच नव्हे तर वाढविला..सजविला आणि नटविलाही...
आज कीर्ती शिलेदार त्या कारकीर्दीच्या पन्नाशीच्या प्रवासात अखंड मिरवित आहेत. जयमाला शिलेदार यांच्या मार्गदर्शनासारखा दुसरा गुरु नाही हे त्या जाणतात..मानतात..म्हणूनच संगीत नाटकांची पताका आपल्या शिरावर घेऊन त्या आजही रसिकांच्या तृप्त जेह-यावर समाधान सहजपणे आणण्यात यशस्वी होत आहेत...
मायबाप प्रेक्षक हेच आपले सारे काही हे मानून ही संगीत सेवा करत अनेक शिष्यांना त्या तयार करीत आहेत..पण आज संगीत नाटकांचा वर्गच कमी होत आहे...इच्छा असूनही प्रयोग कमीत कमी कालावधीत सादर केले जात आहेत...आजूनही ती धग रसिकांच्या मनात आहे..तिचे जतन करत कीर्ती शिलेदार आणि त्यांची संगीत संस्था करीत आहे..
http://www.blogger.com/img/blank.gif
त्यांच्या यशामागे कष्टाची परंपरा आहे...गुरुंचे मार्गदर्शन आहे...रसिकांची पावती आहे आणि आई-वडिलांची पुण्याई आहे..
स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, शाकुंतल, एकच प्याला, विद्याहरण, स्वरसम्राज्ञी, सौभद्र किती नावे घ्यावीत तेवढया नाटकात त्यांच्या भूमिका आहेत...शिवाय नाट्यसंगीत ऐकणारा चाहता वर्गही निर्माण झाला आहे...
परंपरेची जोपासना यापुढेही उत्तम घडावी हिच नटेश्वरापाशी इच्छा..
सुभाष इनामदार ,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
http://www.esakal.com/esakal/20120725/4971840578510423152.htm
1 comment:
nice
Post a Comment